शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
2
Arvind Kejriwal : "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी
3
'तू नागपूरला ये नाहीतर मी बारामतीला येतो'; सुनील केदार यांचं अजित पवारांना चॅलेंज
4
मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, पण...; एकनाथ खडसेंची राजकारणातून निवृत्ती?
5
"मुंबई आणि भारतासाठी...", वर्ल्ड कपच्या तोंडावर इरफानला सतावतेय मोठी चिंता
6
या आठवड्यात सोन्याचे भाव कमी होतील की वाढतील? वाचा सविस्तर
7
'मालकाकडं बघून बैल खरेदी केल्याचं एक तरी...' आर आर आबांच्या रोहितने थेट पीएम मोदींना डिवचलं
8
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
9
Mothers Day : सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली'
10
पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये अमेरिकाही हरवेल असं वाटतंय; PCB चा माजी अध्यक्ष संतापला
11
Exclusive: काँग्रेसचे शहजादे माओवाद्यांची भाषा बोलत आहेत; PM मोदींनी सांगितला NDA आणि इंडी आघाडीतला फरक
12
"ती स्वतःबद्दल इतकं बोलते की..."; विक्रमादित्य सिंह यांचा कंगना राणौतला खोचक टोला
13
ना तेंडुलकर, ना जयसूर्या! वसीम अक्रमने सांगितला ९० च्या दशकातील सर्वोत्तम फलंदाज
14
'NOTA चं बटण दाबा'; इंदूरमध्ये भाजपला धडा शिकवण्याचे काँग्रेसचे आवाहन!
15
अस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी PM मोदींचा वाराणसीत मेगा प्लॅन
16
"बाबा लवकर गेला हे एकार्थी चांगलं झालं, कारण...", वडिलांविषयी असं का म्हणाली सखी गोखले?
17
"ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, राणेंना रोखण्याची..."; फडणवीसांचा गौप्यस्फोट
18
Ashok Gehlot : राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
19
"आम्ही या हंगामात...", पराभवानंतर Hardik Pandya भावूक, दिली प्रामाणिक कबुली
20
माधुरीचा साधेपणा! 'साजन'मधील ड्रेस परिधान करुन पोहोचली पुरस्कार सोहळ्याला; 33 वर्ष जुना video viral

भारताच्या शिक्षण क्षेत्रात गेल्या दहा वर्षांत आमूलाग्र बदल: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन

By अनिकेत घमंडी | Published: February 24, 2024 8:34 PM

कल्याणजवळील खासगी शिक्षण संस्थेच्या मुंबई कॅम्पसचे उद्घाटन 

अनिकेत घमंडी, कल्याण: भारताच्या शिक्षण क्षेत्रासाठी गेल्या दहा वर्षात मोदी सरकारकडून अतिशय भरीव असे काम करण्यात आल्याने शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले असल्याचे वक्तव्य केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले. कल्याणजवळील कांबा येथे एका शिक्षण संस्थेच्या मुंबई कॅम्पसचे अर्थमंत्री सीतारामन यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले.

२०१४ मध्ये देशामध्ये मोदी सरकार आल्यापासून दरवर्षी एक नवीन आयआयटी, आयआयएम उघडले जात आहे, भारतात दर आठवड्याला एक नवीन विद्यापीठ बांधले जात आहे, दर तिसऱ्या दिवशी एक अटल टिंकरिंग लॅब उघडली जाते - प्रत्येक दुसऱ्या दिवशी एक नवीन महाविद्यालय बांधले जात आहे, दररोज एक नवीन आयटीआय तयार होत आहे आणि स्किल इंडिया मिशन अंतर्गत आतापर्यंत १.४ कोटी तरुणांना प्रशिक्षण देण्यात आल्याची आकडेवारी त्यांनी यावेळी जाहीर केली. या सर्व बाबींचा विचार करता भारतात शिक्षण क्षेत्रासाठी केंद्र सरकार किती मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध करून देत आहे. तसेच या सर्वांची केवळ घोषणा करून सरकार थांबत नाहीये तर अर्थसंकल्पातही त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची खबरदारीही सरकार घेत असल्याचे त्यांनी त्यावेळी अधोरेखित केले.

त्यासोबतच केंद्र सरकार विविध देशांसोबत शैक्षणिक पात्रता फ्रेमवर्कच्या आखणीसाठीही सक्रीय पाठबळ देत असून त्यामूळे सामंजस्य कराराद्वारे आपल्या विद्यार्थ्यांना परदेशात घेणे शक्य होईल. आम्ही अलीकडच्या काळात फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आणि यूएई या देशांसह अनेक द्विपक्षीय सामंजस्य करार आणि करारांवर स्वाक्षरी केली आहे. आणि इतर अनेक देशही या वाटाघाटी प्रक्रियेत असल्याचे सीतारामन यांनी स्पष्ट केले. या उद्घाटन प्रसंगी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला, पद्यभूषण राजश्री बिर्ला, नीरजा बिर्ला यांचीही उपस्थिती होती. -

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनnirmala sitharamanनिर्मला सीतारामन