शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

डोंबिवली, ठाकुर्ली रेल्वेस्थानक गाठण्यासाठी अडथळ्यांची शर्यत; फेरीवाल्यांवर कधी होणार कारवाई? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2022 20:10 IST

डोंबिवली पूर्वेला राथ रस्त्यावर तसेच पश्चिमेलाही मुंबई व कल्याण दिशेकडे तसेच मधल्या पादचारी पुलांचे प्रवेशद्वार आहेत.

डोंबिवली : पूर्वेला डॉ. राथ रोडवर डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलांच्या प्रवेशद्वारांपाशी रस्त्यावर दुचाकी, रिक्षा यांचे बेकायदा पार्किंग केले जात आहे. त्यामुळे प्रवाशांना स्थानक गाठण्यासाठी अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. मात्र, या पार्किंगकडे हाकेच्या अंतरावर असलेल्या वाहतूक नियंत्रण शाखेचे सपशेल दुर्लक्ष होत असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. अशीच अवस्था ठाकुर्ली स्थानकाच्या पूर्वेला होत असून, तेथेही नाहक बॅरिकेड्स लावल्याने प्रवाशांना त्रास होत आहे.

डोंबिवली पूर्वेला राथ रस्त्यावर तसेच पश्चिमेलाही मुंबई व कल्याण दिशेकडे तसेच मधल्या पादचारी पुलांचे प्रवेशद्वार आहेत. या पुलांच्या जिन्यांवर जाण्यासाठी नागरिकांना दुचाकी, रिक्षा आदींच्या बेकायदा पार्किंगचा त्रास होत आहे. विशेषतः मधल्या पुलाजवळ पूर्वेला व पश्चिमेलाही रिक्षा उभ्या केल्या जात आहेत. 

रेल्वेस्थानक परिसर हा अत्यंत गजबजलेला असल्याने एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिक व प्रवाशांना बाहेर पडणे कठीण होऊ शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे येथील पार्किंग कायमचे बंद करावे, अशी मागणी प्रवासी करीत आहेत.दरम्यान, ठाकुर्लीतील दक्ष नागरिक मंदार अभ्यंकर यांनी तेथील बॅरिकेड्स संदर्भात मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मंगळवारी ट्विट करून ही समस्या मांडली आहे. त्यावर त्वरित योग्य ती कार्यवाही होईल, असे आश्वासन त्यांना मिळाले आहे.

फेरीवाल्यांवर कधी होणार कारवाई? 

डॉ. राथ रोडवर फेरीवाल्यांचीही संख्या वाढली आहे. त्यांचाही अडथळा ठरत आहे. त्यांच्याविरोधात केडीएमसी प्रशासन कारवाई कधी करणार? असा सवालही केला जात आहे.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीkalyanकल्याण