शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

बाहेरगावच्या लेट गाड्यांना प्राधान्य, लोकलचा खोळंबा; मध्य रेल्वेकडून देण्यात आली कबुली 

By अनिकेत घमंडी | Updated: August 16, 2024 07:10 IST

रेल्वेचे वेळापत्रक सांभाळणे ही तारेवरची कसरत, अनेक तांत्रिक अडचणींमुळे वेळापत्रक पाळले जात नाही

अनिकेत घमंडी, लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: देशभरातून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या कसारा, कर्जतला येईस्तोवर आधीच त्यांना विलंब झालेला असतो. त्यामुळे त्या बाहेरगावच्या गाड्यांऐवजी लोकलला प्राधान्य दिले, तर दूरवरून आलेल्यांचा आणखी खोळंबा होईल. त्यामुळे लोकलपेक्षा बाहेरगावाहून येणाऱ्या गाड्यांना अगोदर पुढे जाण्याची संधी दिली जाते.

परिणामी, मुंबईकडे जाणाऱ्या व येणाऱ्या लोकल दररोज उशिरा धावतात, अशी धक्कादायक कबुली मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक रजनीशकुमार गोयल यांनी दिली. रेल्वेचे वेळापत्रक सांभाळणे ही एक तारेवरची कसरत असून, अनेक तांत्रिक अडचणीमुळे वेळापत्रक पाळले जात नाही. त्याला आमचा नाइलाज आहे, असे आर्जवही गोयल यांनी रेल्वे प्रवासी संघटनेपुढे केले.

प्रशासनाचे रडगाणे

लोकल सेवा दररोज किमान १५ मिनिटे ते कमाल एक तास उशिरा सुरू असल्याच्या निषेधार्थ २२ ऑगस्ट रोजी प्रवासी संघटनांनी आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले. प्रवासी संघटनांनी हे आंदोलन करू नये, यासाठी रेल्वे प्रशासनाने बैठक आयोजित केली होती. मात्र, बैठकीत रेल्वे प्रशासनाने स्वतःचेच रडगाणे गायले. परिणामी, प्रवासी संघटनांचा पंचसूत्री कार्यक्रम कागदावरच राहिल्याची खंत दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष ॲड.आदेश भगत यांनी व्यक्त केली.

आंदोलनावर ठाम

बैठक ही उपनगरी लोकल प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठीहोती, पण ते सोडून रेल्वेने त्यांच्या तांत्रिक अडचणींचा पाढा वाचला. लांब पल्ल्याच्या गाड्यांना प्राधान्य द्यायचे तर द्या, पण लोकल प्रवासी हे सुमारे ४५ लाख आहेत, त्यांचा विचार प्राधान्याने करायला हवा, अशी प्रतिक्रिया ठाणे रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी दिली. बैठकीतून काहीही निष्पन्न झाले नसल्याने २२ ऑगस्टला आंदोलन करण्यावर संघटना ठाम आहे.

रेल्वे प्रशासनाने एवढी वर्षे एकदाही संघटनांना बोलावले नाही; मात्र, आंदोलनाची हाक दिल्यावर बैठकीला बोलावले. याचा अर्थ त्यांना विरोध नकोय. पण, रेल्वेने समस्या सोडवायला हव्यात. ते सोडून स्वतःचे रडगाणे ऐकवून काय साध्य होणार? आम्हाला जादा लोकल फेऱ्या हव्यात, त्याचे काय करता ते सांगा.- मनोहर शेलार, संस्थापक अध्यक्ष, उपनगरी रेल्वे प्रवासी एकता संस्था (महासंघ)

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेkalyanकल्याणdombivaliडोंबिवली