शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

'वामनदादा हा आभाळा ऐवढा माणूस'; कवी किरण येले यांचे उद्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 15:22 IST

Waman Kardak : कल्याण सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात पु. ल. कट्टय़ाच्या वतीने लोककवी वामन कर्डक यांच्या जन्मशताब्दी सोहळ्य़ास आजपासून सुरुवात झाली.

कल्याण - लोककवी वामनदादा कर्डक हा जनसामान्यांचा आवाज होता. ते रस्त्यावरील कवी होते. त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची छत्रछाया लाभली होती. त्यामुळे हा माणूस आभाळा ऐवढा मोठा होता असे उद्गार लोककवी वामन कर्डक जन्मशताब्दी महोत्सव समितीचे अध्यक्ष कवी किरण येले यांनी येथे काढले. 

कल्याण सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात पु. ल. कट्टय़ाच्या वतीने लोककवी वामन कर्डक यांच्या जन्मशताब्दी सोहळ्य़ास आजपासून सुरुवात झाली. ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांच्या हस्ते या सोहळ्य़ाचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर, कवी प्रशांत मोरे, कायद्याने वागा चळवळीचे अध्यक्ष राज असरोंडकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवियत्री वृषाली विनायक यांनी केले.  

महोत्सव समितीचे अध्यक्ष आणि कवी येले यांनी सांगितेल की, मी देखील रस्त्यावरचा कवी आहे. वामनदादा हे देखील रस्त्यावरचे कवी होते. ते ख:या अर्थाने लोक कवी असल्याने त्यांची जन्मशताब्दी रस्त्यावर भरगच्च कार्यक्रम घेऊन साजरी करण्याचे नियोजन होते. त्याठिकाणी नंदीबैलवाले, वैदू, पोतराज, गोंधळी आदींना घेऊन शुभारंभ करायचा होता. कोरोना नियमावली आणि पावसामुळे ते शक्य नाही. मात्र ही जन्मशताब्दी देशभर पोहचवायची आहे. वर्षबर वामनदादांच्या साहित्याचा जागर चालवायचा आाहे. ऑफलाईन पद्धतीने जमले नाही तर ऑनलाईन पद्धतीने विविध स्वरुपाचे कार्यक्रम घेतले जाणार आहे. त्याला सगळयांचीच साथ हवी आहे असे आवाहन केले. 

कवी म्हात्रे यांनी साहित्यातही बुद्धी आणि श्रम अशी विभागणी आहे. त्यात श्रमाच्या साहित्याला फारसे महत्व दिले गेले नसले तरी वामनदादांचे साहित्य हे जनमानसात रुजलेले आहे. शुभारंभाच्या कार्यक्रमानंतर लगेच कवी संमेलन घेण्यात आले. त्यात कवी संदेश ढगे यांनी बादशहा नावाची कविता वाचली. वामनदादांसारखे कविता करण्याचे धाडस करणो शक्य नसल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. घरातील विजेची बिल जरी जास्त आले तरी आपला आवाज निघत नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले.

कवी माधव डोळे यांनी सांगितले की, वामनदादा हे थेट बाण मारायचे. त्यांच्यासारखे बाण मारमारी गझल त्यांनी सादर केली. कवी आकाश यांनी प्रेमकविता सादर केली. कवी रमेश आव्हाढ यांनी स्वातंत्र्यावरची कविता सादर केली. तर कवी अरुण म्हात्रे यांनी रानाच्या झाडातून जाते माङया माहेराची वाट ही हळूवार भावना टिपणारी वामनदादांची कविता सादर करुन सगळ्य़ांची वाह वाह मिळविली. 

टॅग्स :kalyanकल्याण