शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

"...अन्यथा नागरिकच रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यातील दगड पालिकेच्या दिशेने भिरकावतील"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2021 16:13 IST

Dombivli : कोपर पुलामुळे पूर्व पश्चिम वाहतूक विभागली जाऊन कोंडी कमी व्हावी. संथ पद्धतीने चाललेल्या कामाला गती देण्याची गरज आहे, असे चव्हाण म्हणाले.

डोंबिवली: महानगरपालिका क्षेत्रात रस्त्यांवर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. डोंबिवली-कल्याणकर नागरिकांचा अंत पाहू नका, लवकरात लवकर रस्ते दुरुस्ती करा, नाहीतर हेच रस्त्यावर पडलेले सुटे दगड नागरिकांच्या हातात असतील आणि महापालिकेच्या दिशेने भिरकावले जातील. महापालिकेच्या नाकर्तेपणामुळे तो दिवसही दूर नाही, असा इशारा भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आमदार रविंद्र चव्हाण यांनी महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांना शनिवारी खड्ड्यांसदर्भात दिलेल्या पत्राद्वारे दिला आहे.

खड्डेमय रस्त्यांसंदर्भात आयुक्तांना माहीत असेलच पण त्यांच्या अधिकाऱ्यांना याची जाणीव कधी होईल? आणि ते स्वतःहून उपाययोजना करतील याची आजपर्यंत वाट पाहत होते का? माझा अपेक्षाभंग झाला नाही, कारण ते आपणहून हे काम करतील अशी माझी अपेक्षाच नव्हती त्यांनी ते केलेही नाही. यावरून आपले अधिकारी आणि प्रशासक म्हणून आपण पुन्हा एकदा नगर सुविधा क्षेत्रात नापास झाला आहात, अशी खरमरीत टीका चव्हाण यांनी केली. 

महापालिका क्षेत्रात पडणारा पाऊस आणि रस्त्यांवर पडणारे खड्डे प्रशासनास चांगलाच परिचयाचा आहे. रस्त्यांच्या डागडुजीसाठी तंत्रज्ञान उपलब्ध असते. मास्टेक कार्पेटसारखे तंत्रज्ञान वापरून खड्डे भरणे सहज शक्य असताना आणि खड्ड्यांसाठी बजेट तरतूद देखील असताना पावसाळ्यापूर्वी निविदा काढून खड्डे का भरले नाहीत? रस्त्यांची झालेली चाळण यासाठी आपले सुस्त प्रशासन आणि बेदरकार वृत्ती जबाबदार आहे. खड्ड्यात पडून कल्याण डोंबिवलीतील अपघात होण्याचे प्रमाण मुंबई महानगर क्षेत्रात सर्वाधिक असते. 

यापूर्वी रस्त्यावरचे खड्डे, इतस्त्तः पडलेले दगड धोंडे यामुळे वाहतूक खोळंबा तर होतोच पण रस्त्यावर पसरलेल्या दगडांनी वाहनचालक गंभीर जखमी झालेत आणि नागरिकांचे बळीही खड्ड्यांनी घेतले आहेत. याकरिता महापालिका प्रशासन दोषी आहेच पण दुर्दैव असे की झालेल्या घटनांमधून पालिका प्रशासन काहीच बोध घेत नाही एवढी यंत्रणा संवेदनाहीन, निष्काळजी आणि मुर्दाड झालेली असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. 

कोपर उड्डाणपूल तात्काळ खुला करा डोंबिवली पूर्व व पश्चिमेला जोडणाऱ्या कोपर पुलाचे काम जलदगतीने पूर्ण करून ऑगस्ट अखेर वाहतुकीसाठी खुला करणे अत्यावश्यक झाले आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे वाहतूक कोंडीने डोंबिवलीकर त्रस्त झाले आहेत. कोपर पुलामुळे पूर्व पश्चिम वाहतूक विभागली जाऊन कोंडी कमी व्हावी. संथ पद्धतीने चाललेल्या कामाला गती देण्याची गरज आहे, असे चव्हाण म्हणाले.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीkdmcकल्याण डोंबिवली महापालिका