शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

१० जून रोजी ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यात भव्य मानवी साखळीचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 14:10 IST

विमानतळास दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी

कल्याण-नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे या मागणीकडे राज्य सरकारचे लक्ष्य वेधण्याकरीता १० जून रोजी ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यात भव्य मानवी साखळीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहित भाजपचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील यांनी दिली आहे. सर्व पक्षीय संघर्ष समितीच्या वतीने ही मानवी साखळी तयार केली जाणार आहे.

यासंदर्भात माहिती देण्याकरीता प्रगती महाविद्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी भाजप नेते पाटील यांनी ही माहिती दिली. याप्रसंगी समितीचे पदाधिकारी गंगाराम शेलार, गुलाब वङो, संतोष केणो, अजरून चौधरी, भास्कर पाटील, गजानन मांगरुळकर, नंदू म्हात्रे, दत्ता वङो आदी उपस्थित होते.यावेळी भाजप नेते पाटील यांनी सांगितले की, कोरोना नियमावलीचे पालन करुन ही मानवी साखळी तयार केली जाणार आहे. दहीसर मोरी ते शिळ, शिळ ते नेवाली, नवी मुंबई ते दिघा अशा विविध ठिकाणाहून ही साखळी तिन्ही जिल्ह्यातून केली जाणार आहे. लाखो लोक त्यात सहभागी होणार आहे. घोषणआबाजी न करता शांततेच्या मार्गाने सरकारचे लक्ष वेधले जाणार आहे.

जगन्नाथ पाटील यांनी सांगितले की, दि. बा. पाटील हे लोकनेते होते. त्यांनी नवी मुंबईत ओबीसी, भूमीपूत्र, सिडकोसह अन्य प्रकल्प बाधितांना आंदोलन उभे केले. त्यामुळे भूमीपूत्रांना न्याय मिळाला. नवी मुंबईत येथे एक अधिवेशन २०१२ साली पार पडले होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दि. बां. पाटील यांचे नाव विमानतळास देण्याबाबत सरकार दखल घेईल असे आश्वासित केले होते. २०१६ साली भाजप खासदार कपील पाटील यांनी केंद्र सरकारकडे संसदेत मागणी करुन विमान तळास दि. बा.  पाटील यांचे नाव देण्याचा विषय ठेवला होता. २०१८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणी लक्ष घालून हा विषय केंद्राकडे पाठविला होता. श्याम म्हात्रे यांनी केंद्र सरकारकडे या विषयी पत्रव्यवहार केला होता. तेव्हा त्यांना सरकाकडून प्रतिउत्तर आले होते. सर्व पक्षीय संघर्ष समितीने विमान तळास दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी विद्यमान महाविकास आघाडी सरकारकडे केली आहे. सरकारकडून त्याबाबत अद्याप ठोस काही निर्णय घेण्यात आलेला नाही. शिवसेनेकडून विमानतळास शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी आहे. ठाकरे यांच्या नावाला आमचा विरोध नाही. मात्र शिवसेनेच्या मागणीच्या आधीपासून दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी त्याही आधीपासूनची आहे. सरकारने त्याचा विचार करावा. नाव देण्याचा विषयी राज्य सरकारने ठराव करुन केंद्र सरकारकडे पाठविणे अपेक्षित आहे. याकडे जगन्नाथ पाटील यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :Airportविमानतळ