शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

१० जून रोजी ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यात भव्य मानवी साखळीचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 14:10 IST

विमानतळास दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी

कल्याण-नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे या मागणीकडे राज्य सरकारचे लक्ष्य वेधण्याकरीता १० जून रोजी ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यात भव्य मानवी साखळीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहित भाजपचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील यांनी दिली आहे. सर्व पक्षीय संघर्ष समितीच्या वतीने ही मानवी साखळी तयार केली जाणार आहे.

यासंदर्भात माहिती देण्याकरीता प्रगती महाविद्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी भाजप नेते पाटील यांनी ही माहिती दिली. याप्रसंगी समितीचे पदाधिकारी गंगाराम शेलार, गुलाब वङो, संतोष केणो, अजरून चौधरी, भास्कर पाटील, गजानन मांगरुळकर, नंदू म्हात्रे, दत्ता वङो आदी उपस्थित होते.यावेळी भाजप नेते पाटील यांनी सांगितले की, कोरोना नियमावलीचे पालन करुन ही मानवी साखळी तयार केली जाणार आहे. दहीसर मोरी ते शिळ, शिळ ते नेवाली, नवी मुंबई ते दिघा अशा विविध ठिकाणाहून ही साखळी तिन्ही जिल्ह्यातून केली जाणार आहे. लाखो लोक त्यात सहभागी होणार आहे. घोषणआबाजी न करता शांततेच्या मार्गाने सरकारचे लक्ष वेधले जाणार आहे.

जगन्नाथ पाटील यांनी सांगितले की, दि. बा. पाटील हे लोकनेते होते. त्यांनी नवी मुंबईत ओबीसी, भूमीपूत्र, सिडकोसह अन्य प्रकल्प बाधितांना आंदोलन उभे केले. त्यामुळे भूमीपूत्रांना न्याय मिळाला. नवी मुंबईत येथे एक अधिवेशन २०१२ साली पार पडले होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दि. बां. पाटील यांचे नाव विमानतळास देण्याबाबत सरकार दखल घेईल असे आश्वासित केले होते. २०१६ साली भाजप खासदार कपील पाटील यांनी केंद्र सरकारकडे संसदेत मागणी करुन विमान तळास दि. बा.  पाटील यांचे नाव देण्याचा विषय ठेवला होता. २०१८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणी लक्ष घालून हा विषय केंद्राकडे पाठविला होता. श्याम म्हात्रे यांनी केंद्र सरकारकडे या विषयी पत्रव्यवहार केला होता. तेव्हा त्यांना सरकाकडून प्रतिउत्तर आले होते. सर्व पक्षीय संघर्ष समितीने विमान तळास दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी विद्यमान महाविकास आघाडी सरकारकडे केली आहे. सरकारकडून त्याबाबत अद्याप ठोस काही निर्णय घेण्यात आलेला नाही. शिवसेनेकडून विमानतळास शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी आहे. ठाकरे यांच्या नावाला आमचा विरोध नाही. मात्र शिवसेनेच्या मागणीच्या आधीपासून दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी त्याही आधीपासूनची आहे. सरकारने त्याचा विचार करावा. नाव देण्याचा विषयी राज्य सरकारने ठराव करुन केंद्र सरकारकडे पाठविणे अपेक्षित आहे. याकडे जगन्नाथ पाटील यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :Airportविमानतळ