शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

१० जून रोजी ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यात भव्य मानवी साखळीचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 14:10 IST

विमानतळास दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी

कल्याण-नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे या मागणीकडे राज्य सरकारचे लक्ष्य वेधण्याकरीता १० जून रोजी ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यात भव्य मानवी साखळीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहित भाजपचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील यांनी दिली आहे. सर्व पक्षीय संघर्ष समितीच्या वतीने ही मानवी साखळी तयार केली जाणार आहे.

यासंदर्भात माहिती देण्याकरीता प्रगती महाविद्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी भाजप नेते पाटील यांनी ही माहिती दिली. याप्रसंगी समितीचे पदाधिकारी गंगाराम शेलार, गुलाब वङो, संतोष केणो, अजरून चौधरी, भास्कर पाटील, गजानन मांगरुळकर, नंदू म्हात्रे, दत्ता वङो आदी उपस्थित होते.यावेळी भाजप नेते पाटील यांनी सांगितले की, कोरोना नियमावलीचे पालन करुन ही मानवी साखळी तयार केली जाणार आहे. दहीसर मोरी ते शिळ, शिळ ते नेवाली, नवी मुंबई ते दिघा अशा विविध ठिकाणाहून ही साखळी तिन्ही जिल्ह्यातून केली जाणार आहे. लाखो लोक त्यात सहभागी होणार आहे. घोषणआबाजी न करता शांततेच्या मार्गाने सरकारचे लक्ष वेधले जाणार आहे.

जगन्नाथ पाटील यांनी सांगितले की, दि. बा. पाटील हे लोकनेते होते. त्यांनी नवी मुंबईत ओबीसी, भूमीपूत्र, सिडकोसह अन्य प्रकल्प बाधितांना आंदोलन उभे केले. त्यामुळे भूमीपूत्रांना न्याय मिळाला. नवी मुंबईत येथे एक अधिवेशन २०१२ साली पार पडले होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दि. बां. पाटील यांचे नाव विमानतळास देण्याबाबत सरकार दखल घेईल असे आश्वासित केले होते. २०१६ साली भाजप खासदार कपील पाटील यांनी केंद्र सरकारकडे संसदेत मागणी करुन विमान तळास दि. बा.  पाटील यांचे नाव देण्याचा विषय ठेवला होता. २०१८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणी लक्ष घालून हा विषय केंद्राकडे पाठविला होता. श्याम म्हात्रे यांनी केंद्र सरकारकडे या विषयी पत्रव्यवहार केला होता. तेव्हा त्यांना सरकाकडून प्रतिउत्तर आले होते. सर्व पक्षीय संघर्ष समितीने विमान तळास दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी विद्यमान महाविकास आघाडी सरकारकडे केली आहे. सरकारकडून त्याबाबत अद्याप ठोस काही निर्णय घेण्यात आलेला नाही. शिवसेनेकडून विमानतळास शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी आहे. ठाकरे यांच्या नावाला आमचा विरोध नाही. मात्र शिवसेनेच्या मागणीच्या आधीपासून दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी त्याही आधीपासूनची आहे. सरकारने त्याचा विचार करावा. नाव देण्याचा विषयी राज्य सरकारने ठराव करुन केंद्र सरकारकडे पाठविणे अपेक्षित आहे. याकडे जगन्नाथ पाटील यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :Airportविमानतळ