शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

डोंबिवली अल्पवयीन तरुणीवरील बलात्कार प्रकरण: राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2021 18:58 IST

pravin darekar News: डोंबिवलीतील अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना ही माणूसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेवरुन पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की, राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे

कल्याण - डोंबिवलीतील अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना ही माणूसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेवरुन पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की, राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे अशी टिका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज येथे केले.

डोंबिवलीतील अल्पवयीन तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर राज्यात खळबळ माजली आहे. या घटनेच्या पाश्र्वभूमीवर विरोधी पक्ष नेते दरकरे यांनी आज मानपाडा पोलिस ठाण्यात धाव घेतली. यावेळी त्यांनी पोलिस उपायुक्त सचीन गुंजाळ आणि तपास अधिका:यांची भेट घेतली. या भेटीपश्चात विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी सांगितले की, यासारख्या गंभीर घटना घडू नयेत. याकरीता ठोस पाऊले उचलण्यात यावीत. राज्यातील अशा  प्रकारची गुन्हेगारी रोखण्याकरीता आणि महिला सुरक्षिततेकरीता कृती आराखडा तयार करण्यात यावा अशी मागणी पोलिस प्रशासनासह राज्य सरकारकडे करण्यात येणार आहे. कल्याण डोंबिवली परिसरात अंमली पदार्थाची विक्री केली जाते ही बाब भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी निदर्शनास आणून दिली आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. याकडेही पोलिस प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

मानपाडा परिसरात दोन पोलिस ठाण्यांची गरज आहे. पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे आहे. यंत्रणा तोकडी आहे. राज्य सरकारकडे दोन पोलिस स्टेशनचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. पोलिसांचा मनुष्यबळ कमी असताना त्यांचे हातपाय बांधून त्यांना पळायला सांगणो हे देखील योग्य नाही. पोलिस देखील माणसंच आहेत. हा मुद्दा दरेकर यांनी उपस्थीत करताना डोंबिवलीतील अल्पवयीन तरुणीवर 9 महिन्यापासून अत्याचार होत असताना पोलिसांचे गुप्तहेर खाते काय करीत होते असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला आहे. अशा प्रकारचे गंभीर गुन्हे घडत असताना पोलिसांना पुरेसे मनुष्यबळ पुरविले गेले पाहिजे. पुण्याती पोलिस अधिकारी कृष्ण प्रकाश यांनी भर चौकात खून होत नाही. तोर्पयत कायदा व्यवस्था धोक्यात आलेली नाही हे त्यांचे वक्तव्य सरकारच्या बाजूने सहमती दर्शविणारे आहे याकडे दरेकर यांनी लक्ष वेधत कृष्ण प्रकाश यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. 

महिलांच्या सुरक्षिततेसाठी असलेला शक्ती कायदा आज दीड वर्षे झाली तरी आणू शकलो नाही. शक्ती कायदा आणणारे गृहमंत्री कुठे आहेत. तेच माहित नाहीत. हा कायदा अंमलात याचला हवा होता. सरकार कशाला प्राधान्य देते. त्यांचा प्राधान्य क्रम काय आहे तेच कळत नाही. कायद्याद्वारेच नराधमांची मुस्कट दाबी नाही केली तर अशा प्रकारच्या घटना घडतच राहतील याकडे दरेकर यांनी लक्ष वेधले. कोरोना काळात मुलांचे शिक्षण ऑनलाईन आाहे. तरुणांकडूनही मोबाईलचा जास्त वापर केला जातो. काही अॅपवर बंदी आणण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करणार असा प्रश्न दरेकर यांच्याकडे उपस्थित केला असता काही अॅपवर नियंत्रण  आणण्याची मागणी सरकारकडे केली जाईल असे दरेकर यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :pravin darekarप्रवीण दरेकरdombivaliडोंबिवली