शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

डोंबिवली अल्पवयीन तरुणीवरील बलात्कार प्रकरण: राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2021 18:58 IST

pravin darekar News: डोंबिवलीतील अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना ही माणूसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेवरुन पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की, राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे

कल्याण - डोंबिवलीतील अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना ही माणूसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेवरुन पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की, राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे अशी टिका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज येथे केले.

डोंबिवलीतील अल्पवयीन तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर राज्यात खळबळ माजली आहे. या घटनेच्या पाश्र्वभूमीवर विरोधी पक्ष नेते दरकरे यांनी आज मानपाडा पोलिस ठाण्यात धाव घेतली. यावेळी त्यांनी पोलिस उपायुक्त सचीन गुंजाळ आणि तपास अधिका:यांची भेट घेतली. या भेटीपश्चात विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी सांगितले की, यासारख्या गंभीर घटना घडू नयेत. याकरीता ठोस पाऊले उचलण्यात यावीत. राज्यातील अशा  प्रकारची गुन्हेगारी रोखण्याकरीता आणि महिला सुरक्षिततेकरीता कृती आराखडा तयार करण्यात यावा अशी मागणी पोलिस प्रशासनासह राज्य सरकारकडे करण्यात येणार आहे. कल्याण डोंबिवली परिसरात अंमली पदार्थाची विक्री केली जाते ही बाब भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी निदर्शनास आणून दिली आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. याकडेही पोलिस प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

मानपाडा परिसरात दोन पोलिस ठाण्यांची गरज आहे. पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे आहे. यंत्रणा तोकडी आहे. राज्य सरकारकडे दोन पोलिस स्टेशनचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. पोलिसांचा मनुष्यबळ कमी असताना त्यांचे हातपाय बांधून त्यांना पळायला सांगणो हे देखील योग्य नाही. पोलिस देखील माणसंच आहेत. हा मुद्दा दरेकर यांनी उपस्थीत करताना डोंबिवलीतील अल्पवयीन तरुणीवर 9 महिन्यापासून अत्याचार होत असताना पोलिसांचे गुप्तहेर खाते काय करीत होते असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला आहे. अशा प्रकारचे गंभीर गुन्हे घडत असताना पोलिसांना पुरेसे मनुष्यबळ पुरविले गेले पाहिजे. पुण्याती पोलिस अधिकारी कृष्ण प्रकाश यांनी भर चौकात खून होत नाही. तोर्पयत कायदा व्यवस्था धोक्यात आलेली नाही हे त्यांचे वक्तव्य सरकारच्या बाजूने सहमती दर्शविणारे आहे याकडे दरेकर यांनी लक्ष वेधत कृष्ण प्रकाश यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. 

महिलांच्या सुरक्षिततेसाठी असलेला शक्ती कायदा आज दीड वर्षे झाली तरी आणू शकलो नाही. शक्ती कायदा आणणारे गृहमंत्री कुठे आहेत. तेच माहित नाहीत. हा कायदा अंमलात याचला हवा होता. सरकार कशाला प्राधान्य देते. त्यांचा प्राधान्य क्रम काय आहे तेच कळत नाही. कायद्याद्वारेच नराधमांची मुस्कट दाबी नाही केली तर अशा प्रकारच्या घटना घडतच राहतील याकडे दरेकर यांनी लक्ष वेधले. कोरोना काळात मुलांचे शिक्षण ऑनलाईन आाहे. तरुणांकडूनही मोबाईलचा जास्त वापर केला जातो. काही अॅपवर बंदी आणण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करणार असा प्रश्न दरेकर यांच्याकडे उपस्थित केला असता काही अॅपवर नियंत्रण  आणण्याची मागणी सरकारकडे केली जाईल असे दरेकर यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :pravin darekarप्रवीण दरेकरdombivaliडोंबिवली