शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
5
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
6
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
7
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
8
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
9
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
10
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
11
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
12
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
13
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
14
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
15
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
16
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
17
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
18
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
19
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
20
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल

डोंबिवली अल्पवयीन तरुणीवरील बलात्कार प्रकरण: राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2021 18:58 IST

pravin darekar News: डोंबिवलीतील अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना ही माणूसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेवरुन पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की, राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे

कल्याण - डोंबिवलीतील अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना ही माणूसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेवरुन पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की, राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे अशी टिका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज येथे केले.

डोंबिवलीतील अल्पवयीन तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर राज्यात खळबळ माजली आहे. या घटनेच्या पाश्र्वभूमीवर विरोधी पक्ष नेते दरकरे यांनी आज मानपाडा पोलिस ठाण्यात धाव घेतली. यावेळी त्यांनी पोलिस उपायुक्त सचीन गुंजाळ आणि तपास अधिका:यांची भेट घेतली. या भेटीपश्चात विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी सांगितले की, यासारख्या गंभीर घटना घडू नयेत. याकरीता ठोस पाऊले उचलण्यात यावीत. राज्यातील अशा  प्रकारची गुन्हेगारी रोखण्याकरीता आणि महिला सुरक्षिततेकरीता कृती आराखडा तयार करण्यात यावा अशी मागणी पोलिस प्रशासनासह राज्य सरकारकडे करण्यात येणार आहे. कल्याण डोंबिवली परिसरात अंमली पदार्थाची विक्री केली जाते ही बाब भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी निदर्शनास आणून दिली आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. याकडेही पोलिस प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

मानपाडा परिसरात दोन पोलिस ठाण्यांची गरज आहे. पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे आहे. यंत्रणा तोकडी आहे. राज्य सरकारकडे दोन पोलिस स्टेशनचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. पोलिसांचा मनुष्यबळ कमी असताना त्यांचे हातपाय बांधून त्यांना पळायला सांगणो हे देखील योग्य नाही. पोलिस देखील माणसंच आहेत. हा मुद्दा दरेकर यांनी उपस्थीत करताना डोंबिवलीतील अल्पवयीन तरुणीवर 9 महिन्यापासून अत्याचार होत असताना पोलिसांचे गुप्तहेर खाते काय करीत होते असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला आहे. अशा प्रकारचे गंभीर गुन्हे घडत असताना पोलिसांना पुरेसे मनुष्यबळ पुरविले गेले पाहिजे. पुण्याती पोलिस अधिकारी कृष्ण प्रकाश यांनी भर चौकात खून होत नाही. तोर्पयत कायदा व्यवस्था धोक्यात आलेली नाही हे त्यांचे वक्तव्य सरकारच्या बाजूने सहमती दर्शविणारे आहे याकडे दरेकर यांनी लक्ष वेधत कृष्ण प्रकाश यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. 

महिलांच्या सुरक्षिततेसाठी असलेला शक्ती कायदा आज दीड वर्षे झाली तरी आणू शकलो नाही. शक्ती कायदा आणणारे गृहमंत्री कुठे आहेत. तेच माहित नाहीत. हा कायदा अंमलात याचला हवा होता. सरकार कशाला प्राधान्य देते. त्यांचा प्राधान्य क्रम काय आहे तेच कळत नाही. कायद्याद्वारेच नराधमांची मुस्कट दाबी नाही केली तर अशा प्रकारच्या घटना घडतच राहतील याकडे दरेकर यांनी लक्ष वेधले. कोरोना काळात मुलांचे शिक्षण ऑनलाईन आाहे. तरुणांकडूनही मोबाईलचा जास्त वापर केला जातो. काही अॅपवर बंदी आणण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करणार असा प्रश्न दरेकर यांच्याकडे उपस्थित केला असता काही अॅपवर नियंत्रण  आणण्याची मागणी सरकारकडे केली जाईल असे दरेकर यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :pravin darekarप्रवीण दरेकरdombivaliडोंबिवली