शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
3
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
4
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
5
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
6
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
7
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
8
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
9
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
10
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
11
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
12
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
13
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
14
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
15
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
16
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
17
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
18
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
19
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
20
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
Daily Top 2Weekly Top 5

'कल्याण लोकसभेतील मतदारांशी संपर्क करून केंद्र, राज्याच्या योजनांची जनजागृती करा'

By अनिकेत घमंडी | Updated: April 6, 2023 18:01 IST

कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांचे आवाहन; पक्षाच्या ४३ व्या वर्धापनदिनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद 

अनिकेत घमंडी/डोंबिवली

डोंबिवली: लोकसभा निवडणुकीला अवघे वर्ष राहिले असून आता वर्षभर लोकसभा निवडणुकीपर्यन्त भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातील लाखो नागरिकांशी संपर्क साधून केंद्रातील मोदी तसेच राज्यातील शिंदे फडणवीस सरकारच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती द्यावी असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी भाजपच्या ४३व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने गुरुवारी।केले.

पक्षाच्या कल्याण येथील जिल्हा कार्यालयामध्ये सकाळीच पक्षाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत ध्वजारोहण केले, त्यानंतर कॅबिनेट मंत्री चव्हाण, माजी आमदार नरेंद्र पवार, प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले व जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले, त्यावेळी ते बोलत होते. त्यानिमित्ताने त्यांच्या हस्ते पक्षाच्या जुन्या, ज्येष्ठ जाणत्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. जुन्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आज ही पक्षात काम केल्याचा अभिमान वाटतो असेही चव्हाण म्हणाले. त्यांच्याहस्ते माजी जिल्हाध्यक्ष के.आर.जाधव, माजी जिल्हाध्यक्ष दिनेश तावडे, माजी नगरसेवक रमाकांत उपाध्ये, माजी नगरसेवक सुरेश भोईर, सिताराम कदम, निर्जा मिश्रा, कपिल देव शर्मा राजेंद्र बेहेनवाल, इंदुमती सूर्यवंशी, चंद्रशेखर तांबडे ,सुधा जोशी हेमल रवानी यांसह २५ जुन्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला . त्या सत्कार समारंभ वेळी रवींद्र चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.

कांबळे यांनी पेढे वाटून, फटाके फोडून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. या लोकसभेतील पक्षाच्या सर्व बूथ समित्यांवर स्थापना दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत सर्वाधिक मतदान मिळवण्याचे उद्दिष्ट पक्षाने ठेवले आहे. त्यासाठी महाविजय २०२४ हे अभियान पक्षाने सुरु केले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी  प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ७५ हजार घरी जाण्याचा कार्यक्रम संघटनेमार्फत राबविण्यात येणार असल्याचे आवाहन कांबळे यांनी।केले. ७८२००७८२०० या दूरध्वनी क्रमांकाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती  ऍप मार्फत मतदारांपर्यंत पोहचवली जाईल.  विविध समाज घटकांमध्ये जनजागृती करून भाजपचा मतदानाचा टक्का वाढवण्यावर भर देण्याचे देश, प्रदेश पातळीवरचे नियोजन असल्याचे पवार म्हणाले.

टॅग्स :BJPभाजपा