शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

कामगारच नव्हे तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्री कंत्राटीने भरा; मनसेची मागणी

By सदानंद नाईक | Updated: October 6, 2023 16:55 IST

महाराष्ट्र शासनाने कुशल व अकुशल कामगारांची भरती कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेऊन त्यासाठी विविध ९ कंपन्यांची निवड केली आहे.

उल्हासनगर : महाराष्ट्र शासनाने सर्व शासकीय कार्यालयात अतिकुशल, कुशल, अर्धकुशल व अकुशल ही कर्मचाऱ्यांची पदे ठेकेदारा मार्फत कंत्राटी पद्धतीवर भरण्याचा घेतला. मात्र कामगाराच नव्हेतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री आदी पदेही कंत्राटी पद्धतीने भरण्याची मागणी केंद्रीय व राज्य निवडणूक आयोगाकडे केली. 

महाराष्ट्र शासनाने कुशल व अकुशल कामगारांची भरती कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेऊन त्यासाठी विविध ९ कंपन्यांची निवड केली आहे. शासनाच्या या धोरणामुळे शिक्षित व उच्चशिक्षित तरुणांची कुचंबना होणार आहे. उच्चशिक्षण घेऊन सुद्धा ठेकेदाराच्या हाताखाली शासकीय नोकरीत काम करावे लागणार या भावनेतून शिकलेले तरुण राज्यातील शेतकरी प्रमाणे आत्महत्या करण्याची शक्यता मनसेने व्यक्त केली. त्यामुळे शासकीय कंत्राटी कामगारांचा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा. अशी मागणी मनसेचे जिल्हा सचिव संजय घुगे, जिल्हा अध्यक्ष धनंजय गुरव यांनी महाराष्ट्र सरकारकडे केली.

महाराष्ट्र शासनाने काढलेला कंत्राटी कामगारांचा शासकीय निर्णय रद्द केला नाहीतर, केंद्रीय व राज्य निवडणूक आयोगाने यापुढे महाराष्ट्रात निवडणुका न घेता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार, खासदार, कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, नगरसेवक ही सर्व पदे निविदा काढून ठेकेदारा मार्फत भरण्यात यावीत. अशी मागणी पक्षा तर्फे करण्यात येणार असल्याची माहिती बंडू देशमुख यांनी दिलीं आहे. यामुळे शासनाच्या पैशाची मोठया प्रमाणात बचत होऊन, ते पैसे महाराष्ट्राच्या विकास कामासाठी वापरता येतील. असेही देशमुख म्हणाले. 

यावेळी पक्षाचे सचिन बेंडके, सुभाष हटकर, मैनऊद्दीन शेख, कामगार नेते दिलीप थोरात, तन्मेश देशमुख, अक्षय धोत्रे, योगीराज देशमुख, प्रमोद पालकर, देवा तायडे, विक्की जिप्ससन यांच्यासह सुधीर सावंत, संजय नार्वेकर, अजय वानखेडे, अमित सिंग, रवि बागूल, निलेश धिवरे, बापू पलंगे, हेमंत मेरवाडे, श्याम फिस्के यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरMNSमनसे