शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

पाणी नाही तर मतदानही नाही, नांदीवलीच्या महिला रहिवाश्यांचा निर्धार; दहा वर्षे झाली केवळ आश्वासन

By अनिकेत घमंडी | Updated: March 15, 2024 11:59 IST

पंधरा दिवसांपूर्वी खासदार श्रीकांत शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार राजू पाटील यांच्यासह शहरांतील नेतेमंडळीनी मंत्रालयात सर्व शासकीय यंत्रणांची बैठक घेऊन पाणी द्यायलाच हवे असे महापालिका, एमआयडीसी अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले होते.

 डोंबिवली: पाणी नाही तर मतदानही नाही अशी ठाम भूमिका घेऊन नांदीवली येथील टोलेजंग सोसायट्यांमधील शेकडो रहिवासी एकत्र आले आहेत. सातत्याने केवळ आश्वासन मिळत असल्याने लोकसभा निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाच्या उमेदवारांना अश्वासन द्यायला येऊ नका आधी पाणी घेऊन या असा पवित्रा नागरिकांनी घेतला आहे. 

पंधरा दिवसांपूर्वी खासदार श्रीकांत शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार राजू पाटील यांच्यासह शहरांतील नेतेमंडळीनी मंत्रालयात सर्व शासकीय यंत्रणांची बैठक घेऊन पाणी द्यायलाच हवे असे महापालिका, एमआयडीसी अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले होते. तिथे हो हो करून अधिकाऱ्यांनी पुन्हा पहिले पाढे पंचावन्न म्हणत काहीही काम केले नाही. गेल्या आठवड्यात महापालिका पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आले आणि म्हणाले आठ दिवस थांबा, आम्ही थांबलो पण काहीही फरक पडलेला नाही. पोरखेळ सुरू आहे का असा सवाल संतप्त महिलांनी केला. आणि त्यामुळेच नो पाणी नो व्होटिंग असा नारा देत त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. शेकडो महिलांना तेथील रहिवासी दक्ष नागरिक सुप्रिया कुलकर्णी यांनी एकत्र केले आणि समस्येला वाचा फोडण्यासाठी निर्णय घेण्याचे आवाहन केल्याचे सांगण्यात आले. महिलांनीही तात्काळ प्रतिसाद देत समस्या आहे त्यावर उपाययोजना का काढली जात नाही. 

आयुक्त डॉ इंदूराणी जाखड या सुद्धा एक महिला आहेत, त्यांच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत, पण प्रत्यक्षात काहीच केले जात नाही. राजकीय नेते असोत की अधिकारी सगळे केवळ आश्वासन देऊन वेळ मारून नेतात. आधिकार्यांनी येथे येऊन प्रत्यक्ष रहावे म्हणजे समस्या काय आहे हे समजेल. एसी दालनात बसून काहीही कळणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया महिलांमधून उमटली. 

टँकरने किती पाणी मागवायचे, तब्येतीचा प्रश्न निर्माण होतो, सध्या शालांत परीक्षांचा काळ सुरू आहे, नेते, अधिकारी यांना त्याचे काहीच का वाटत नाही. समस्या सोडवा आणि दिलासा द्या अशी मागणी महिलांनी केली. 

 सर्वोदय ओर्चीड सोसायटीच्या सुचित्रा अय्यर, तृप्ती जाधव महालक्ष्मी आर्केड सोसायटीच्या चंद्रकांत इंदुलकर, राजू त्रिमुखे, अंबर तीर्थ सोसायटीच्या शकुंतला खिल्लारे, मनीषा राणे, धनश्री प्रथमा सोसायटीच्या अमोल राणे, विष्णू सोनवणे, कृष्णकुंज सोसायटीधून नयना हरिया, मेघा मुलंकर कृष्णविहार सोसायटीचे सुनिता विश्वकर्मा, विना सर्वांणकर, शांताराम दर्शन सोसायटीचे सत्यवान शिरवाडकर, शैला ताम्हणे, छाया चव्हाण आदींसह शेकडो महिला एकत्र येऊन आमच्या हक्काचे पाणी आम्हाला मिळायलाच हवे असे म्हणून संताप व्यक्त केला. 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईElectionनिवडणूक