शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

मतदारांची नावे गहाळ, डोंबिवलीकर ठोठावणार न्यायालयाचा दरवाजा

By अनिकेत घमंडी | Updated: May 22, 2024 16:20 IST

....त्यासाठी सोमवारपासून दोन हजार मतदारांनी प्रतिसाद दिला असून, डोंबिवली परिसरातील सुमारे सतराशे नागरिकांनी सहभागी होणार असल्याचे कळवल्याची माहिती याचिका करण्यासाठी पुढाकार घेतलेले अक्षय फाटक यांनी दिली.

 

डोंबिवली : मतदार याद्यांमधून नावे गहाळ झाल्याबद्दल नागरिकांनी निवडणूक आयोगावर तीव्र संताप व्यक्त केल्याची दखल घेऊन डोंबिवलीतील दक्ष नागरिक एकत्र येऊन २ जूनपूर्वी न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. त्यासाठी सोमवारपासून दोन हजार मतदारांनी प्रतिसाद दिला असून, डोंबिवली परिसरातील सुमारे सतराशे नागरिकांनी सहभागी होणार असल्याचे कळवल्याची माहिती याचिका करण्यासाठी पुढाकार घेतलेले अक्षय फाटक यांनी दिली.

  आयोगावर आक्षेप असून, आयोगाने नेमकी काय पद्धत अवलंबली हे स्पष्ट करावे, तसेच संबंधित मतदाराला कळवले होते का? जर फोटो नसेल तर त्याबाबत काय कार्यवाही केली होती? बँक केवायसी करत असेल तर तसे लेखी कळवते, ग्राहकाला वेळ देते, तसे आयोगाने संबंधित मतदारांना कळवले होते का? थेट नाव गहाळ होणे, करणे, हा लोकशाहीचा सर्वांत मोठा उत्सव म्हणवल्या जाणाऱ्या नागरिकांच्या मूलभूत हक्कावर गदा आणणारा, अन्यायकारक नाही का? या मुद्द्यांवर याचिका दाखल होईल, असे त्यांनी सांगितले. याबाबतची माहिती आयोगाने द्यावी, यासाठी माहिती अधिकाराचा वापर करण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच ती माहिती आयोगाने २ जूनपूर्वी द्यावी जेणेकरून ४ जूनच्या निवडणूक निकालापूर्वी याचिकेची सुनावणी होऊ शकेल, असे फाटक म्हणाले.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगVotingमतदान