शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

Raju Patil : "अनधिकृत बांधकामातून पैसा ओरबाडतात, मग सोयी सुविधा का नाही?" , संतप्त मनसे आमदार राजू पाटील यांचा केडीएमसी प्रशासनाला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2021 13:57 IST

Raju Patil : पिसवली येथील गावदेवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या विकासाकरिता मनसे आमदार पाटील यांनी आमदार निधीतून निधी दिला आहे. 

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेचे अधिकारी अनधिकृत बांधकामातून पैसा ओरबाडतात. मग 27 गावातील ग्रामीण भागात सोयी सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष का केले जाते?, असा संतप्त सवाल मनसेचे आमदार राजू पाटील यांनी महापालिका प्रशासनाला विचारला आहे. पिसवली येथील गावदेवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या विकासाकरिता मनसे आमदार पाटील यांनी आमदार निधीतून निधी दिला आहे. 

भाजपचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोईर यांच्या प्रभागात मंजूर करण्यात आलेल्या डांबरी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आमदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी या परिसरातील मान्यवर उपस्थित होते. आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले की, 27 गावात बेकायदा बांधकामे केली जातात. ही बेकायदा न तोडण्यासाठी अधिकारी पैशाची मागणी करतात. पैसा उकळतात. अधिकारी बेकायदा बांधकामधारकांकडून पैसा उकळतात. त्याच महापालिकेचे प्रशासन या भागातील नागरी सोयीसुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याकडे आमदार पाटील यांनी लक्ष वेधले आहे.

ही 27 गावे ग्रामपंचयात आणि जिल्हा परिषदेत होती. तेव्हा या गावातील रस्ते चांगले होते. ही गावे 2015 साली महापालिका हद्दीत समाविष्ट केली गेली. तेव्हापासून या गावातील रस्ते विकासावर महापालिकेने काही एक पैसा खर्च केलेला नाही. या गावातीर रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. त्यामुळे मला आमदार निधीतून या गावातील रस्ते विकासासाठी निधी द्यावा लागला आहे. नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी यापुढेही मी निधी देणार असल्याची ग्वाही पाटील यांनी यावेळी दिली. 

27 गावातील नागरिकांना सोयी सुविधा दिल्या जात नाहीत. मात्र या गावांतील नागरिकांना महापालिकेने दहा पट जास्तीचा मालमत्ता कर आकारला आहे. हा कर 27 गावातील नागरिक भरू शकत नाही. त्यांच्यावरील जाचक कर रद्द केला जावा अशी मागणी संघर्ष समितीने करीत कालच महापालिकेवर मोर्चा काढला होता. या मागणीला मनसेचा पाठिंबा आहे. नागरिकांना सोयी सुविधा पुरविला जात नसताना दहा पटीने मालमत्ता कर आकारला जातो. भूमीपूत्रंच्या जागेवर आरक्षणो टाकली जात आहे. त्यांच्या जागेवरील विकासाला वेसण घातली जात आहे. दुसरीकडे बड्या बिल्डरांना ग्रोथ सेंटरच्या नावाखाली विकासाची मुभा दिली जात आहे. त्यामुळे या भागातील नागरी सोयी सुविधांवर त्याचा अतिरिक्त ताण पडत आहे, हा मुद्दाही पाटील यांनी यावेळी अधोरेखित केला.

टॅग्स :Raju Patilराजू पाटीलkalyanकल्याण