शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

...अजून किती दिवस पाण्यासाठी वणवण करायची? मनसे आमदारांनी वेधले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष

By प्रशांत माने | Updated: May 5, 2023 19:07 IST

राज्य सरकारने केडीएमसीसाठी मंजूर केलेला १४० व अमृत योजनेसाठी आरक्षित असलेला १०५ एमएलडी पाणी कोटा अद्याप देण्यात आलेला नाही.

कल्याण: राज्य सरकारने केडीएमसीसाठी मंजूर केलेला १४० व अमृत योजनेसाठी आरक्षित असलेला १०५ एमएलडी पाणी कोटा अद्याप देण्यात आलेला नाही. परिणामी पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. या संदर्भात वेळोवेळी पाठपुरावा करून देखील लक्ष दिले गेलेले नाही. त्याची झळ सोसावी लागत असून अजून किती दिवस पाण्यासाठी वणवण करायची? असा सवाल मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंद आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलाआहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा देशात पर्जन्यमान कमी होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा हा ३१ ऑगस्टपर्यंत पुरण्यासाठी ३२ टक्के तूट येत आहे. ही तूट भरून काढण्यासाठी ठाणे लघुपाटबंधारे विभागाने उल्हास नदीतील पाणी नियोजनासाठी मंगळवार पासून आठवड्याच्या दर मंगळवारी २४ तास सोमवारी रात्री १२ वाजल्यापासून मंगळवारी रात्री १२ पर्यंत केडीएमसी क्षेत्रात पाणी पूरवठा बंद असणार आहे. यामध्ये बारावे,मोहाली ,नेतीवली व टिटवाळा जलशुद्धीकरण क्षेत्रातून कल्याण पूर्व व पश्चिम,कल्याण ग्रामीण(शहाड,वडवली,आंबिवली टिटवाळा ) डोंबिवली पूर्व पश्चिम परिसरात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. 

दरम्यान केडीएमसीसाठी मंजूर आणि आरक्षित असलेला हक्काचा पाणी पुरवठा सुरु झाला नसल्याने कल्याण डोंबिवली परिसराला पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. ही परिस्थिती ओढावू नये म्हणून मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील याबाबत लक्षवेधी मांडली होती. मात्र त्याकडे देखील दुर्लक्ष झाल्याने आता कल्याण डोंबिवलीकरांना पाणी टंचाईच्या दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत असल्याकडे आमदार पाटील यांनी लक्ष वेधत फडणवीस यांना आज पुन्हा एकदा पत्रव्यवहार केला आहे. कल्याण डोंबिवलीकरांनी अजून किती दिवस पाण्यासाठी वणवण करायची असा सवाल पाटील यांनी व्टीटच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना केला आहे. 

टॅग्स :kalyanकल्याणRaju Patilराजू पाटीलMNSमनसे