शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
5
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
6
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
7
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
8
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
9
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
10
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
11
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
12
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
13
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
14
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
15
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
16
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
17
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
18
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
19
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
20
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

...अजून किती दिवस पाण्यासाठी वणवण करायची? मनसे आमदारांनी वेधले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष

By प्रशांत माने | Updated: May 5, 2023 19:07 IST

राज्य सरकारने केडीएमसीसाठी मंजूर केलेला १४० व अमृत योजनेसाठी आरक्षित असलेला १०५ एमएलडी पाणी कोटा अद्याप देण्यात आलेला नाही.

कल्याण: राज्य सरकारने केडीएमसीसाठी मंजूर केलेला १४० व अमृत योजनेसाठी आरक्षित असलेला १०५ एमएलडी पाणी कोटा अद्याप देण्यात आलेला नाही. परिणामी पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. या संदर्भात वेळोवेळी पाठपुरावा करून देखील लक्ष दिले गेलेले नाही. त्याची झळ सोसावी लागत असून अजून किती दिवस पाण्यासाठी वणवण करायची? असा सवाल मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंद आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलाआहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा देशात पर्जन्यमान कमी होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा हा ३१ ऑगस्टपर्यंत पुरण्यासाठी ३२ टक्के तूट येत आहे. ही तूट भरून काढण्यासाठी ठाणे लघुपाटबंधारे विभागाने उल्हास नदीतील पाणी नियोजनासाठी मंगळवार पासून आठवड्याच्या दर मंगळवारी २४ तास सोमवारी रात्री १२ वाजल्यापासून मंगळवारी रात्री १२ पर्यंत केडीएमसी क्षेत्रात पाणी पूरवठा बंद असणार आहे. यामध्ये बारावे,मोहाली ,नेतीवली व टिटवाळा जलशुद्धीकरण क्षेत्रातून कल्याण पूर्व व पश्चिम,कल्याण ग्रामीण(शहाड,वडवली,आंबिवली टिटवाळा ) डोंबिवली पूर्व पश्चिम परिसरात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. 

दरम्यान केडीएमसीसाठी मंजूर आणि आरक्षित असलेला हक्काचा पाणी पुरवठा सुरु झाला नसल्याने कल्याण डोंबिवली परिसराला पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. ही परिस्थिती ओढावू नये म्हणून मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील याबाबत लक्षवेधी मांडली होती. मात्र त्याकडे देखील दुर्लक्ष झाल्याने आता कल्याण डोंबिवलीकरांना पाणी टंचाईच्या दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत असल्याकडे आमदार पाटील यांनी लक्ष वेधत फडणवीस यांना आज पुन्हा एकदा पत्रव्यवहार केला आहे. कल्याण डोंबिवलीकरांनी अजून किती दिवस पाण्यासाठी वणवण करायची असा सवाल पाटील यांनी व्टीटच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना केला आहे. 

टॅग्स :kalyanकल्याणRaju Patilराजू पाटीलMNSमनसे