शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
2
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
3
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
4
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
5
पंचायत निवडणुकीत उतरले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर; लाखो फॉलोअर्स पण पडलेली मते एकदा पाहाच
6
जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार?
7
PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट
8
चोर तर चोर वर शिरजोर! दागिन्यांच्या दुकानातून अंगठी चोरली, पोलिसांनी पकडल्यावर गुंडगिरी
9
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
10
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
11
Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना
12
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
13
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
14
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
15
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
16
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
17
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
18
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
19
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू

...अजून किती दिवस पाण्यासाठी वणवण करायची? मनसे आमदारांनी वेधले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष

By प्रशांत माने | Updated: May 5, 2023 19:07 IST

राज्य सरकारने केडीएमसीसाठी मंजूर केलेला १४० व अमृत योजनेसाठी आरक्षित असलेला १०५ एमएलडी पाणी कोटा अद्याप देण्यात आलेला नाही.

कल्याण: राज्य सरकारने केडीएमसीसाठी मंजूर केलेला १४० व अमृत योजनेसाठी आरक्षित असलेला १०५ एमएलडी पाणी कोटा अद्याप देण्यात आलेला नाही. परिणामी पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. या संदर्भात वेळोवेळी पाठपुरावा करून देखील लक्ष दिले गेलेले नाही. त्याची झळ सोसावी लागत असून अजून किती दिवस पाण्यासाठी वणवण करायची? असा सवाल मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंद आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलाआहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा देशात पर्जन्यमान कमी होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा हा ३१ ऑगस्टपर्यंत पुरण्यासाठी ३२ टक्के तूट येत आहे. ही तूट भरून काढण्यासाठी ठाणे लघुपाटबंधारे विभागाने उल्हास नदीतील पाणी नियोजनासाठी मंगळवार पासून आठवड्याच्या दर मंगळवारी २४ तास सोमवारी रात्री १२ वाजल्यापासून मंगळवारी रात्री १२ पर्यंत केडीएमसी क्षेत्रात पाणी पूरवठा बंद असणार आहे. यामध्ये बारावे,मोहाली ,नेतीवली व टिटवाळा जलशुद्धीकरण क्षेत्रातून कल्याण पूर्व व पश्चिम,कल्याण ग्रामीण(शहाड,वडवली,आंबिवली टिटवाळा ) डोंबिवली पूर्व पश्चिम परिसरात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. 

दरम्यान केडीएमसीसाठी मंजूर आणि आरक्षित असलेला हक्काचा पाणी पुरवठा सुरु झाला नसल्याने कल्याण डोंबिवली परिसराला पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. ही परिस्थिती ओढावू नये म्हणून मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील याबाबत लक्षवेधी मांडली होती. मात्र त्याकडे देखील दुर्लक्ष झाल्याने आता कल्याण डोंबिवलीकरांना पाणी टंचाईच्या दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत असल्याकडे आमदार पाटील यांनी लक्ष वेधत फडणवीस यांना आज पुन्हा एकदा पत्रव्यवहार केला आहे. कल्याण डोंबिवलीकरांनी अजून किती दिवस पाण्यासाठी वणवण करायची असा सवाल पाटील यांनी व्टीटच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना केला आहे. 

टॅग्स :kalyanकल्याणRaju Patilराजू पाटीलMNSमनसे