शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

...अजून किती दिवस पाण्यासाठी वणवण करायची? मनसे आमदारांनी वेधले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष

By प्रशांत माने | Updated: May 5, 2023 19:07 IST

राज्य सरकारने केडीएमसीसाठी मंजूर केलेला १४० व अमृत योजनेसाठी आरक्षित असलेला १०५ एमएलडी पाणी कोटा अद्याप देण्यात आलेला नाही.

कल्याण: राज्य सरकारने केडीएमसीसाठी मंजूर केलेला १४० व अमृत योजनेसाठी आरक्षित असलेला १०५ एमएलडी पाणी कोटा अद्याप देण्यात आलेला नाही. परिणामी पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. या संदर्भात वेळोवेळी पाठपुरावा करून देखील लक्ष दिले गेलेले नाही. त्याची झळ सोसावी लागत असून अजून किती दिवस पाण्यासाठी वणवण करायची? असा सवाल मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंद आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलाआहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा देशात पर्जन्यमान कमी होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा हा ३१ ऑगस्टपर्यंत पुरण्यासाठी ३२ टक्के तूट येत आहे. ही तूट भरून काढण्यासाठी ठाणे लघुपाटबंधारे विभागाने उल्हास नदीतील पाणी नियोजनासाठी मंगळवार पासून आठवड्याच्या दर मंगळवारी २४ तास सोमवारी रात्री १२ वाजल्यापासून मंगळवारी रात्री १२ पर्यंत केडीएमसी क्षेत्रात पाणी पूरवठा बंद असणार आहे. यामध्ये बारावे,मोहाली ,नेतीवली व टिटवाळा जलशुद्धीकरण क्षेत्रातून कल्याण पूर्व व पश्चिम,कल्याण ग्रामीण(शहाड,वडवली,आंबिवली टिटवाळा ) डोंबिवली पूर्व पश्चिम परिसरात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. 

दरम्यान केडीएमसीसाठी मंजूर आणि आरक्षित असलेला हक्काचा पाणी पुरवठा सुरु झाला नसल्याने कल्याण डोंबिवली परिसराला पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. ही परिस्थिती ओढावू नये म्हणून मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील याबाबत लक्षवेधी मांडली होती. मात्र त्याकडे देखील दुर्लक्ष झाल्याने आता कल्याण डोंबिवलीकरांना पाणी टंचाईच्या दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत असल्याकडे आमदार पाटील यांनी लक्ष वेधत फडणवीस यांना आज पुन्हा एकदा पत्रव्यवहार केला आहे. कल्याण डोंबिवलीकरांनी अजून किती दिवस पाण्यासाठी वणवण करायची असा सवाल पाटील यांनी व्टीटच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना केला आहे. 

टॅग्स :kalyanकल्याणRaju Patilराजू पाटीलMNSमनसे