शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
2
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
3
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
4
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
5
गौरी खानचं 'टोरी' रेस्टॉरंट : ₹१५०० चे मोमोज, ₹११०० चं सॅलड; मॅश बटाट्याची किंमत ऐकून अवाक् व्हाल
6
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 
7
रोहित आर्याबाबत मोठा खुलासा! कोथरुडचा घरमालक उलटे १.७५ लाख द्यायला तयार झालेला; शेवटी...
8
मारुतीच्या 'या' SUV नं स्पर्धकांचं टेन्शन वाढवलं, मिळाली 5 स्टार सेफ्टी रेटिंग; ASEAN NCAP क्रॅश टेस्टमध्ये केली कमाल
9
जीएसटी कपात, दसरा अन् दिवाळी; ऑक्टोबरमध्ये पडला 'वाहनांचाही पाऊस'! महिंद्रा, ह्युंदाई, टाटानेच नाही तर स्कोडानेही...
10
दोस्तीतच कुस्ती! ६ महिन्यांपूर्वी लग्न झाले, ५ मिनिटांत घरी पोहोचणार होता; पण रस्त्यातच मित्रांनी संपवले
11
जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला...
12
8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय रे भाऊ? नवीन वेतन कसं ठरणार? जाणून घ्या
13
Retirement: स्टार खेळाडूनं चाहत्यांना दिला मोठा धक्का, अचानक केली निवृत्तीची घोषणा!
14
प्रबोधिनी एकादशी २०२५: देवउठनी एकादशीला विष्णू खरोखरच ४ महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात का?
15
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
16
पाच वर्षांत अफाट परतावा देणारे शेअर्स कोणते, गुंतवणूकदारांसाठी संकेत काय? तुमच्याकडे आहे का?
17
BCCI: "आणखी दोन-तीन दिवस वाट पाहू, जर ट्रॉफी परत मिळाली नाही तर...", बीसीसीआयची कडवी भूमिका
18
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
19
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
20
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट

या रस्त्यांचीच नाही तर शहरांचीही जबाबदारी तुमची; आमदार राजू पाटील यांचं टीकास्त्र

By अनिकेत घमंडी | Updated: October 13, 2022 20:02 IST

या रस्त्यांचीच नाही तर शहरांचीही जबाबदारी सरकारची असल्याचे मनसे आमदार राजू पाटील यांनी म्हटले. 

डोंबिवली: कल्याणडोंबिवली मधील रस्त्यांची जबाबदारी आमची असल्याचे नेते मंडळी नागरिकांना सांगत आहे. नवरात्रीच्या कालखंडात फक्त रस्त्यांची घेतलेली जबाबदारी आता नेते देखील विसरून गेले आहेत. गुरुवारी काही वेळ झालेल्या पावसात नांदीवली परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी मनसे आमदार राजू पाटील यांनी परिस्थितीचा आढावा घेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात असलेल्या २७ गावांची दुर्दशा झाली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून नांदीवली परिसरात साचणाऱ्या पाण्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या परिसरात नाले नसल्याने नाल्यांतील पाणी थेट रस्त्यावर येत आहे. सतत पाणी रस्त्यावर येत असल्याने आमदार राजू पाटील यांनी या परिसरासाठी तीन पंप पाणी निचरा करण्यासाठी आपल्या आमदार फंडातून दिले होते. मात्र त्यामधील दोन पंप मनपा प्रशासनाने ताब्यात घेऊन एकच या परिसरात ठेवून धन्यता मानली आहे. या परिसरात नागरिकांचे होत असलेले दररोजचे हाल लक्षात घेता मनसे आमदार राजू पाटील यांनी या परिसरात जाऊन पुन्हा एकदा नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. 

वारंवार समस्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देखील लक्ष देत नसल्याने नागरिक संतापले होते. यावेळी नागरिकांनी रस्त्यावर उतरण्याचा देखील इशारा दिला. मात्र आता नागरिक रस्त्यावर उतरण्याआधी मी रस्त्यावर उतरून आंदोलनाच नेतृत्व करेल अस आमदार पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळी कल्याण ग्रामीण विधानसभा मनसे अध्यक्ष विनोद पाटील, सचिव अरुण जांभळे, विभाग अध्यक्ष रक्षित गायकर, संदीप म्हात्रे,ओम लोके यांसह परिसरात नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कल्याण डोंबिवली मधील रस्त्यांची जबाबदारी घेणारे आता शहरांची जबाबदारी घेऊन समस्यांवर मात करणार का? हे पाहणं देखील महत्वाच ठरणार आहे.

 

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीMNSमनसेRaju Patilराजू पाटील