शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

या रस्त्यांचीच नाही तर शहरांचीही जबाबदारी तुमची; आमदार राजू पाटील यांचं टीकास्त्र

By अनिकेत घमंडी | Updated: October 13, 2022 20:02 IST

या रस्त्यांचीच नाही तर शहरांचीही जबाबदारी सरकारची असल्याचे मनसे आमदार राजू पाटील यांनी म्हटले. 

डोंबिवली: कल्याणडोंबिवली मधील रस्त्यांची जबाबदारी आमची असल्याचे नेते मंडळी नागरिकांना सांगत आहे. नवरात्रीच्या कालखंडात फक्त रस्त्यांची घेतलेली जबाबदारी आता नेते देखील विसरून गेले आहेत. गुरुवारी काही वेळ झालेल्या पावसात नांदीवली परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी मनसे आमदार राजू पाटील यांनी परिस्थितीचा आढावा घेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात असलेल्या २७ गावांची दुर्दशा झाली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून नांदीवली परिसरात साचणाऱ्या पाण्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या परिसरात नाले नसल्याने नाल्यांतील पाणी थेट रस्त्यावर येत आहे. सतत पाणी रस्त्यावर येत असल्याने आमदार राजू पाटील यांनी या परिसरासाठी तीन पंप पाणी निचरा करण्यासाठी आपल्या आमदार फंडातून दिले होते. मात्र त्यामधील दोन पंप मनपा प्रशासनाने ताब्यात घेऊन एकच या परिसरात ठेवून धन्यता मानली आहे. या परिसरात नागरिकांचे होत असलेले दररोजचे हाल लक्षात घेता मनसे आमदार राजू पाटील यांनी या परिसरात जाऊन पुन्हा एकदा नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. 

वारंवार समस्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देखील लक्ष देत नसल्याने नागरिक संतापले होते. यावेळी नागरिकांनी रस्त्यावर उतरण्याचा देखील इशारा दिला. मात्र आता नागरिक रस्त्यावर उतरण्याआधी मी रस्त्यावर उतरून आंदोलनाच नेतृत्व करेल अस आमदार पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळी कल्याण ग्रामीण विधानसभा मनसे अध्यक्ष विनोद पाटील, सचिव अरुण जांभळे, विभाग अध्यक्ष रक्षित गायकर, संदीप म्हात्रे,ओम लोके यांसह परिसरात नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कल्याण डोंबिवली मधील रस्त्यांची जबाबदारी घेणारे आता शहरांची जबाबदारी घेऊन समस्यांवर मात करणार का? हे पाहणं देखील महत्वाच ठरणार आहे.

 

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीMNSमनसेRaju Patilराजू पाटील