शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

'मनसेला ‘कोणीही’ गृहित धरू नये'; राजू पाटील संतापले, ठाकरे सरकारला दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 15:44 IST

कल्याण डोंबिवलीमध्ये  पुलांवरून आधीच राजकीय पक्षांमध्ये कलगीतुरा सुरू आहे.

कल्याण: कल्याणडोंबिवलीतील पूल अर्धवट असल्याने 1 एप्रिल रोजी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकुर्ली उड्डाणपूलावर केक कापून अनोखे आंदोलन केले होते. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे  कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू  पाटील यांचा पारा चांगलाच वाढला आहे. एकीकडे मनसेवर गुन्हे दाखल होतात मग कोपर पुलाचे गर्डर   लॉचिंग व वडवली पुलाच्या उद्घाटनाला गर्दी करणा-यांवर कधी गुन्हे दाखल होणार? असा सवाल पाटील यांनी  उपस्थित केला आहे. यासंदर्भात ट्वीट करत  त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. 

अर्धवट पुलांच्या निषेधार्थ मनसेने "एप्रिल फुल डब्बा गुल , कधी होणार कल्याण डोंबिवलीतील पूल " अशा घोषणा दिल्या होत्या. महापालिकेने आखून दिलेल्या निर्बंधाचे उल्लंघन केले म्हणून पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. मात्र यावर पाटील यांनी थेट आक्षेप घेत मनसेला कोणी गृहीत धरू नये, असा इशारा दिला आहे.

प्रशासनाने सत्ताधा-यांच्या हातातले बाहुले बनू नये तसेच पोलिसांनीही पक्षपातीपणा करू नये. पोलिसांबद्दल नेहमीच  आदर आहे,  असे देखील मत पाटील यांनी व्यक्त केलं आहे. आयुक्त आणि डीसीपी यांच्या उपस्थितीत वडवली पुलाचे उद्घाटन झाले मग यावेळी गर्दी करणा-यांवर गुन्हा कधी दाखल होणार?  असा प्रतिसवाल करत पाटील यांनी पालिका प्रशासन , पोलीस प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. 

कल्याण डोंबिवलीमध्ये  पुलांवरून आधीच राजकीय पक्षांमध्ये कलगीतुरा सुरू आहे. अर्धवट पुलांच्या कामाचा निषेध केला म्हणून गुन्हे  दाखल करण्यात आल्यामुळे पुलांचा वाद आणखीनच चिघळला आहे. दरम्यान  मनसेने आंदोलन करताना  सोशल  डीस्टंसिंगचे पालन केले होते.तसेच  आमच्याकडून पण तीव्र प्रतिक्रिया उमटतील असे पाटील यांनी  "लोकमतशी" बोलताना सांगितले आहे. त्यामुळे येणा-या काळातही पुलांवरून आणखी राजकीय फटाके  फूटतील यात काही शंका नाही.

टॅग्स :Raju Patilराजू पाटीलMNSमनसेkalyanकल्याणdombivaliडोंबिवली