शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

केडीएमसी मुख्यालयावर मनसेचा मोर्चा; प्रशासनाला दिला १५ दिवसांचा अल्टीमेटम

By मुरलीधर भवार | Updated: March 7, 2024 16:07 IST

मंजूर झालेल्या जलककुंभाची कामे त्वरित सुरू करा. रुक्मिणीबाई रुग्णालयात अतिदक्षता विभाग सुरू करा.

कल्याण - विविध मागण्याकरीता मनसेने आज कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी महापालिका प्रशासनाची मनसेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. येत्या १५ दिवसात या समस्या सुटल्या नाही तर जिलेबी सारख्या गोल असलेल्या प्रशासनाला सूतासारखे सरळ करु अशा इशारा मनसेच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला आहे.

या मोर्चात मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर, जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, डोंबिवली शहराध्यक्ष राहूल कामत, महिला शहराध्यक्षा कस्तूरी देसाई, उर्मिला तांबे, चेतना रामचंद्रन आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. मनसेने आयुक्त इंदूराणी यांची भेट घेतली. कल्याण जवळ टिटवाळा ,मांडा, बल्यानी भागात दूषित पाणीपुरवठा केला जातो. ग्रामीण भागात बेकायदा नळ जोडण्या आहेत. अधिकृत नळ जोडणीधारकाना पाणी मिळत नाही. त्यांना पाण्याचे बिल जास्तीचे पाठविले जाते. पाठविलेले बिल वेळत पाठविले जात नाही. बिल भरले नाही म्हणून महापालिकेकडून नोटिसा बजावल्या जातात. शहरातील विविध मैदाने आणि उद्यानांमध्ये स्वच्छता ठेवली पाहिजे. स्मशानभूमीत मोफत लाकडे पुरविली पाहिजेत.

मंजूर झालेल्या जलककुंभाची कामे त्वरित सुरू करा. रुक्मिणीबाई रुग्णालयात अतिदक्षता विभाग सुरू करा. काळा तलाव परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावा,. दुर्गाडीचे टिटवाळा रिंग रोडचे काम लवकर पूर्ण करा, अशा मागण्या महापालिका आयुक्तांकडे केल्या . यावेळी महापालिका प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर मागण्या मार्गी लावण्यात येतील असे आश्वासन दिले आहे. या बैठकीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी येत्या १५ दिवसात प्रशासनाकडून दिलेल्या आश्वासानाची पूर्तता झाली नाही तर जिलेबी सारख्या गोल प्रशासनाला सूतासारखे सरळ करु असा इसारा जिल्हाध्यक्ष भोईर यांनी दिला आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाMNSमनसे