शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

केडीएमसी मुख्यालयावर मनसेचा मोर्चा; प्रशासनाला दिला १५ दिवसांचा अल्टीमेटम

By मुरलीधर भवार | Updated: March 7, 2024 16:07 IST

मंजूर झालेल्या जलककुंभाची कामे त्वरित सुरू करा. रुक्मिणीबाई रुग्णालयात अतिदक्षता विभाग सुरू करा.

कल्याण - विविध मागण्याकरीता मनसेने आज कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी महापालिका प्रशासनाची मनसेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. येत्या १५ दिवसात या समस्या सुटल्या नाही तर जिलेबी सारख्या गोल असलेल्या प्रशासनाला सूतासारखे सरळ करु अशा इशारा मनसेच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला आहे.

या मोर्चात मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर, जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, डोंबिवली शहराध्यक्ष राहूल कामत, महिला शहराध्यक्षा कस्तूरी देसाई, उर्मिला तांबे, चेतना रामचंद्रन आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. मनसेने आयुक्त इंदूराणी यांची भेट घेतली. कल्याण जवळ टिटवाळा ,मांडा, बल्यानी भागात दूषित पाणीपुरवठा केला जातो. ग्रामीण भागात बेकायदा नळ जोडण्या आहेत. अधिकृत नळ जोडणीधारकाना पाणी मिळत नाही. त्यांना पाण्याचे बिल जास्तीचे पाठविले जाते. पाठविलेले बिल वेळत पाठविले जात नाही. बिल भरले नाही म्हणून महापालिकेकडून नोटिसा बजावल्या जातात. शहरातील विविध मैदाने आणि उद्यानांमध्ये स्वच्छता ठेवली पाहिजे. स्मशानभूमीत मोफत लाकडे पुरविली पाहिजेत.

मंजूर झालेल्या जलककुंभाची कामे त्वरित सुरू करा. रुक्मिणीबाई रुग्णालयात अतिदक्षता विभाग सुरू करा. काळा तलाव परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावा,. दुर्गाडीचे टिटवाळा रिंग रोडचे काम लवकर पूर्ण करा, अशा मागण्या महापालिका आयुक्तांकडे केल्या . यावेळी महापालिका प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर मागण्या मार्गी लावण्यात येतील असे आश्वासन दिले आहे. या बैठकीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी येत्या १५ दिवसात प्रशासनाकडून दिलेल्या आश्वासानाची पूर्तता झाली नाही तर जिलेबी सारख्या गोल प्रशासनाला सूतासारखे सरळ करु असा इसारा जिल्हाध्यक्ष भोईर यांनी दिला आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाMNSमनसे