शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

केडीएमसी मुख्यालयावर मनसेचा मोर्चा; प्रशासनाला दिला १५ दिवसांचा अल्टीमेटम

By मुरलीधर भवार | Updated: March 7, 2024 16:07 IST

मंजूर झालेल्या जलककुंभाची कामे त्वरित सुरू करा. रुक्मिणीबाई रुग्णालयात अतिदक्षता विभाग सुरू करा.

कल्याण - विविध मागण्याकरीता मनसेने आज कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी महापालिका प्रशासनाची मनसेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. येत्या १५ दिवसात या समस्या सुटल्या नाही तर जिलेबी सारख्या गोल असलेल्या प्रशासनाला सूतासारखे सरळ करु अशा इशारा मनसेच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला आहे.

या मोर्चात मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर, जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, डोंबिवली शहराध्यक्ष राहूल कामत, महिला शहराध्यक्षा कस्तूरी देसाई, उर्मिला तांबे, चेतना रामचंद्रन आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. मनसेने आयुक्त इंदूराणी यांची भेट घेतली. कल्याण जवळ टिटवाळा ,मांडा, बल्यानी भागात दूषित पाणीपुरवठा केला जातो. ग्रामीण भागात बेकायदा नळ जोडण्या आहेत. अधिकृत नळ जोडणीधारकाना पाणी मिळत नाही. त्यांना पाण्याचे बिल जास्तीचे पाठविले जाते. पाठविलेले बिल वेळत पाठविले जात नाही. बिल भरले नाही म्हणून महापालिकेकडून नोटिसा बजावल्या जातात. शहरातील विविध मैदाने आणि उद्यानांमध्ये स्वच्छता ठेवली पाहिजे. स्मशानभूमीत मोफत लाकडे पुरविली पाहिजेत.

मंजूर झालेल्या जलककुंभाची कामे त्वरित सुरू करा. रुक्मिणीबाई रुग्णालयात अतिदक्षता विभाग सुरू करा. काळा तलाव परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावा,. दुर्गाडीचे टिटवाळा रिंग रोडचे काम लवकर पूर्ण करा, अशा मागण्या महापालिका आयुक्तांकडे केल्या . यावेळी महापालिका प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर मागण्या मार्गी लावण्यात येतील असे आश्वासन दिले आहे. या बैठकीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी येत्या १५ दिवसात प्रशासनाकडून दिलेल्या आश्वासानाची पूर्तता झाली नाही तर जिलेबी सारख्या गोल प्रशासनाला सूतासारखे सरळ करु असा इसारा जिल्हाध्यक्ष भोईर यांनी दिला आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाMNSमनसे