शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

एमआयडीसीमधील मिलापनगर तलावात ऑक्सिजन अभावे जलप्राणी संकटात; पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली चिंता 

By अनिकेत घमंडी | Updated: February 10, 2024 12:09 IST

जलप्राणी काठावर येऊन ऑक्सिजनसाठी धडपडतात ज्येष्ठ नागरिक

डोंबिवली: एमआयडीसी मधील मिलापनगर तलावातील पाणी खराब/गढूळ झाल्याने त्यातील असंख्य मासे, कासव यांना नीट तळाशी ऑक्सिजन मिळत नसल्याने ते सकाळी सूर्यप्रकाशात सदर तळ्याच्या पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन ऑक्सिजन मिळण्यासाठी धडपड करीत दिसत असल्याने सकाळी फिरायला आलेल्या पादचाऱ्यांनी चिंता व्यक्त केली.

तेथील दक्ष नागरिक राजू नलावडे यांनी त्याबाबत माहिती देताना सांगितले की, जलप्राण्यांना तलावाचा तळाशी पण ऑक्सिजन मिळाला पाहिजे पण या खराब/गढूळ पाण्याअभावी ऑक्सिजन मिळत नाही असे वारंवार निदर्शनास आले असल्याचे ते म्हणाले. आता उन्हाळा सुरू असल्याने जर पुढे अजूनच पाणी खराब झाले तर आणि जलप्राण्यांना यापुढे योग्य ऑक्सिजन मिळाला नाही तर ते सर्व जलप्राणी मरण पावण्याची शक्यता पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे. काही वर्षांपूर्वी याच तलावात अनेक वेळा मासे, कासव मृत्युमुखी पडल्याचे दिसून आले होते. त्या तलावाचा सुशोभीकरणसाठी आणि साफसफाईसाठी अनेक वेळा लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत.

गेल्या महिन्यातच या तलावाची साफसफाई करण्यात आली होती. त्यावेळी अर्धे अधिक तलावातील खराब पाणी बाहेर काढण्यात आले होते. परंतु तलावातील तळाचा गाळ काढला नव्हता. त्या तलावाच्या मध्यभागी एखादी उंच सपाट जागा तयार करून ठेवली तर त्यावर उन प्रकाशात कासवे येऊन बसतील. कासवांच्या पाठीला चांगला सूर्यप्रकाश मिळणे आवश्यक आहे. त्या तलावात काही बेजबाबदार नागरिकांकडून निर्माल्य, कचरा फेकला जात असल्याने तलावातील पाणी खराब होण्यास भर पडत असल्याचे नलावडे म्हणाले. एकूणच तो तलाव काही वर्षात नामशेष होण्याची भीती असून वेळीच कल्याण डोंबिवली महापालिकेने यावर लक्ष देऊन एखादा कंत्राटी सुरक्षा रक्षक ठेवणे आवश्यक असल्याची मागणी मिलापनगर रहिवाशी करत असल्याचे नलावडे म्हणाले. 

टॅग्स :dombivaliडोंबिवली