शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

पारा ४० अंशांवर, वाहनाचे टायर तपासले का?; हवा भरताना काळजी घ्या, नेहमी देखभाल करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 17:20 IST

- प्रशांत माने कल्याण : वाहनाच्या टायरची योग्य ती काळजी न घेतल्याने धावत्या वाहनाचा टायर फुटून अपघात होण्याचे प्रमाण ...

- प्रशांत माने

कल्याण : वाहनाच्या टायरची योग्य ती काळजी न घेतल्याने धावत्या वाहनाचा टायर फुटून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. दुचाकीपेक्षा चारचाकी वाहनांचे अपघात माेठ्या प्रमाणात होत आहेत. अशा एक ना अनेक घटना राज्यासह देशातही वारंवार घडत असतात. उन्हाळ्याच्या दिवसांत या घटना प्रामुख्याने घडताना दिसतात. मे महिन्यात तापमान साधारण ४० अंशांच्या वर गेल्याचे आजपर्यंत अनुभवास मिळाले आहे. यंदा एप्रिलच्या सुरुवातीलाच ते ४० ते ४४ अंशांवर पोहोचले आहे. त्यामुळे वाहन घेऊन बाहेर पडताना टायर तपासून मगच पुढे निघा, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

उन्हाळ्याच्या दिवसांत वाहन धावत असताना टायरमधील हवेचा दाब अचानक वाढतो. त्यातच सिमेंट आणि डांबराचे रस्ते तापत असल्याने टायरचे घर्षण होते. सिमेंटच्या रस्त्यावर घर्षणाचे प्रमाण सर्वाधिक असते. सातत्याने होणाऱ्या घर्षणातून कमजोर असलेले टायर फुटण्याची शक्यता अधिक असते. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील टायर फुटून भीषण अपघात झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यात अनेकांना आपले जीवही गमवावे लागले आहेत. त्यामुळे शक्यतो बाहेर पडताना टायरमधील हवा तपासून घेणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर वेगावरही नियंत्रण असणे आवश्यक आहे.

तापमान ४० अंशांवर

राजस्थान, गुजरातकडून वाहणाऱ्या अतिउष्ण आणि कोरड्या वाऱ्यामुळे काही दिवस तापमानात वाढ होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडण्याचाही अंदाज आहे. दोन दिवसांपासून शहरातील कमाल तापमान ४० अंशांच्या आसपास आहे.

टायर फुटून अपघात

तीन दिवसांपूर्वीच कल्याण-शीळ रोडवर एका कारचा पुढील टायर फुटून अपघात झाल्याची घटना घडली. यात कोणालाही दुखापत झाली नाही. वेगावर नियंत्रण ठेवण्याबरोबरच वाहनांची तपासणी करणे गरजेचे आहे. कल्याण-शीळ मार्गावर सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांची कामे सुरू आहेत. या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या जेसीबी वाहनांचा टायरही फुटल्याची घटना नुकतीच घडली आहे.

उन्हाळ्यात काळजी कशी घ्याल?

उन्हाळ्यात टायरची काळजी कशी घ्याल? रबराला स्वत:चे एक आयुष्य असते. त्यामुळे वेळीच टायर बदलणे गरजेचे आहे. ४० हजार मैल प्रवास झाल्यास बदलणे गरजेचे आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत नायट्रोजन हवा भरण्यात यावी. कारण ही हवा थंड असते. नियमित व्हील अलायमेंट करावे, वाहनांची वेगमर्यादा पाळणे. वेळोवेळी टायरमधील हवा तपासावी. ती २८, ३०, ३२ या प्रमाणातच असावी. वाहनाच्या मेंटेनन्सकडेही लक्ष द्यावे.

दुपारी वाहन चालवा, पण काळजी घ्या

दुपारी वाहन चालवा, पण दीर्घ प्रवासात विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. उन्हामुळे रस्ते तापलेले असतात टायरचे घर्षण अधिक होते. त्यामुळे वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवा, वाहनांच्या टायरमध्ये हवा योग्य प्रमाणात आहे की नाही, हे नियमितपणे तपासा, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

उन्हाळ्यात शक्यतो टायरमध्ये नायट्रोजन हवा भरावी. वाहनाच्या मेंटेनन्सकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. वेळच्या वेळी व्हील अलायमेंट करावे. टायरमध्ये आवश्यक असणाऱ्या हवेचे प्रमाण योग्य ठेवावे.

- अनिरुद्ध संभूस, व्हेइकल वर्कशॉप चालक, डोंबिवली

टॅग्स :Temperatureतापमान