शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
2
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
3
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
4
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
5
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल चामखीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
8
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
9
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
10
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
11
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
12
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
13
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
14
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
15
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
16
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
17
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
18
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
19
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
20
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...

पारा ४० अंशांवर, वाहनाचे टायर तपासले का?; हवा भरताना काळजी घ्या, नेहमी देखभाल करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 17:20 IST

- प्रशांत माने कल्याण : वाहनाच्या टायरची योग्य ती काळजी न घेतल्याने धावत्या वाहनाचा टायर फुटून अपघात होण्याचे प्रमाण ...

- प्रशांत माने

कल्याण : वाहनाच्या टायरची योग्य ती काळजी न घेतल्याने धावत्या वाहनाचा टायर फुटून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. दुचाकीपेक्षा चारचाकी वाहनांचे अपघात माेठ्या प्रमाणात होत आहेत. अशा एक ना अनेक घटना राज्यासह देशातही वारंवार घडत असतात. उन्हाळ्याच्या दिवसांत या घटना प्रामुख्याने घडताना दिसतात. मे महिन्यात तापमान साधारण ४० अंशांच्या वर गेल्याचे आजपर्यंत अनुभवास मिळाले आहे. यंदा एप्रिलच्या सुरुवातीलाच ते ४० ते ४४ अंशांवर पोहोचले आहे. त्यामुळे वाहन घेऊन बाहेर पडताना टायर तपासून मगच पुढे निघा, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

उन्हाळ्याच्या दिवसांत वाहन धावत असताना टायरमधील हवेचा दाब अचानक वाढतो. त्यातच सिमेंट आणि डांबराचे रस्ते तापत असल्याने टायरचे घर्षण होते. सिमेंटच्या रस्त्यावर घर्षणाचे प्रमाण सर्वाधिक असते. सातत्याने होणाऱ्या घर्षणातून कमजोर असलेले टायर फुटण्याची शक्यता अधिक असते. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील टायर फुटून भीषण अपघात झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यात अनेकांना आपले जीवही गमवावे लागले आहेत. त्यामुळे शक्यतो बाहेर पडताना टायरमधील हवा तपासून घेणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर वेगावरही नियंत्रण असणे आवश्यक आहे.

तापमान ४० अंशांवर

राजस्थान, गुजरातकडून वाहणाऱ्या अतिउष्ण आणि कोरड्या वाऱ्यामुळे काही दिवस तापमानात वाढ होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडण्याचाही अंदाज आहे. दोन दिवसांपासून शहरातील कमाल तापमान ४० अंशांच्या आसपास आहे.

टायर फुटून अपघात

तीन दिवसांपूर्वीच कल्याण-शीळ रोडवर एका कारचा पुढील टायर फुटून अपघात झाल्याची घटना घडली. यात कोणालाही दुखापत झाली नाही. वेगावर नियंत्रण ठेवण्याबरोबरच वाहनांची तपासणी करणे गरजेचे आहे. कल्याण-शीळ मार्गावर सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांची कामे सुरू आहेत. या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या जेसीबी वाहनांचा टायरही फुटल्याची घटना नुकतीच घडली आहे.

उन्हाळ्यात काळजी कशी घ्याल?

उन्हाळ्यात टायरची काळजी कशी घ्याल? रबराला स्वत:चे एक आयुष्य असते. त्यामुळे वेळीच टायर बदलणे गरजेचे आहे. ४० हजार मैल प्रवास झाल्यास बदलणे गरजेचे आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत नायट्रोजन हवा भरण्यात यावी. कारण ही हवा थंड असते. नियमित व्हील अलायमेंट करावे, वाहनांची वेगमर्यादा पाळणे. वेळोवेळी टायरमधील हवा तपासावी. ती २८, ३०, ३२ या प्रमाणातच असावी. वाहनाच्या मेंटेनन्सकडेही लक्ष द्यावे.

दुपारी वाहन चालवा, पण काळजी घ्या

दुपारी वाहन चालवा, पण दीर्घ प्रवासात विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. उन्हामुळे रस्ते तापलेले असतात टायरचे घर्षण अधिक होते. त्यामुळे वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवा, वाहनांच्या टायरमध्ये हवा योग्य प्रमाणात आहे की नाही, हे नियमितपणे तपासा, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

उन्हाळ्यात शक्यतो टायरमध्ये नायट्रोजन हवा भरावी. वाहनाच्या मेंटेनन्सकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. वेळच्या वेळी व्हील अलायमेंट करावे. टायरमध्ये आवश्यक असणाऱ्या हवेचे प्रमाण योग्य ठेवावे.

- अनिरुद्ध संभूस, व्हेइकल वर्कशॉप चालक, डोंबिवली

टॅग्स :Temperatureतापमान