शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

पारा ४० अंशांवर, वाहनाचे टायर तपासले का?; हवा भरताना काळजी घ्या, नेहमी देखभाल करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 17:20 IST

- प्रशांत माने कल्याण : वाहनाच्या टायरची योग्य ती काळजी न घेतल्याने धावत्या वाहनाचा टायर फुटून अपघात होण्याचे प्रमाण ...

- प्रशांत माने

कल्याण : वाहनाच्या टायरची योग्य ती काळजी न घेतल्याने धावत्या वाहनाचा टायर फुटून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. दुचाकीपेक्षा चारचाकी वाहनांचे अपघात माेठ्या प्रमाणात होत आहेत. अशा एक ना अनेक घटना राज्यासह देशातही वारंवार घडत असतात. उन्हाळ्याच्या दिवसांत या घटना प्रामुख्याने घडताना दिसतात. मे महिन्यात तापमान साधारण ४० अंशांच्या वर गेल्याचे आजपर्यंत अनुभवास मिळाले आहे. यंदा एप्रिलच्या सुरुवातीलाच ते ४० ते ४४ अंशांवर पोहोचले आहे. त्यामुळे वाहन घेऊन बाहेर पडताना टायर तपासून मगच पुढे निघा, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

उन्हाळ्याच्या दिवसांत वाहन धावत असताना टायरमधील हवेचा दाब अचानक वाढतो. त्यातच सिमेंट आणि डांबराचे रस्ते तापत असल्याने टायरचे घर्षण होते. सिमेंटच्या रस्त्यावर घर्षणाचे प्रमाण सर्वाधिक असते. सातत्याने होणाऱ्या घर्षणातून कमजोर असलेले टायर फुटण्याची शक्यता अधिक असते. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील टायर फुटून भीषण अपघात झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यात अनेकांना आपले जीवही गमवावे लागले आहेत. त्यामुळे शक्यतो बाहेर पडताना टायरमधील हवा तपासून घेणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर वेगावरही नियंत्रण असणे आवश्यक आहे.

तापमान ४० अंशांवर

राजस्थान, गुजरातकडून वाहणाऱ्या अतिउष्ण आणि कोरड्या वाऱ्यामुळे काही दिवस तापमानात वाढ होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडण्याचाही अंदाज आहे. दोन दिवसांपासून शहरातील कमाल तापमान ४० अंशांच्या आसपास आहे.

टायर फुटून अपघात

तीन दिवसांपूर्वीच कल्याण-शीळ रोडवर एका कारचा पुढील टायर फुटून अपघात झाल्याची घटना घडली. यात कोणालाही दुखापत झाली नाही. वेगावर नियंत्रण ठेवण्याबरोबरच वाहनांची तपासणी करणे गरजेचे आहे. कल्याण-शीळ मार्गावर सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांची कामे सुरू आहेत. या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या जेसीबी वाहनांचा टायरही फुटल्याची घटना नुकतीच घडली आहे.

उन्हाळ्यात काळजी कशी घ्याल?

उन्हाळ्यात टायरची काळजी कशी घ्याल? रबराला स्वत:चे एक आयुष्य असते. त्यामुळे वेळीच टायर बदलणे गरजेचे आहे. ४० हजार मैल प्रवास झाल्यास बदलणे गरजेचे आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत नायट्रोजन हवा भरण्यात यावी. कारण ही हवा थंड असते. नियमित व्हील अलायमेंट करावे, वाहनांची वेगमर्यादा पाळणे. वेळोवेळी टायरमधील हवा तपासावी. ती २८, ३०, ३२ या प्रमाणातच असावी. वाहनाच्या मेंटेनन्सकडेही लक्ष द्यावे.

दुपारी वाहन चालवा, पण काळजी घ्या

दुपारी वाहन चालवा, पण दीर्घ प्रवासात विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. उन्हामुळे रस्ते तापलेले असतात टायरचे घर्षण अधिक होते. त्यामुळे वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवा, वाहनांच्या टायरमध्ये हवा योग्य प्रमाणात आहे की नाही, हे नियमितपणे तपासा, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

उन्हाळ्यात शक्यतो टायरमध्ये नायट्रोजन हवा भरावी. वाहनाच्या मेंटेनन्सकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. वेळच्या वेळी व्हील अलायमेंट करावे. टायरमध्ये आवश्यक असणाऱ्या हवेचे प्रमाण योग्य ठेवावे.

- अनिरुद्ध संभूस, व्हेइकल वर्कशॉप चालक, डोंबिवली

टॅग्स :Temperatureतापमान