शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

ठाणे जिल्ह्यासाठी एकात्मिक परिवहन सेवेचा प्रस्ताव लवकर बैठक बोलाविणार

By मुरलीधर भवार | Updated: June 22, 2023 15:39 IST

खासदारांनी केली मुख्यमंत्र्यांशी चर्चा

मुरलीधर भवार, कल्याण: ठाणे जिल्ह्यासाठी एकच परिवहन सेवा असावी या मागणीवर कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केली. जिल्ह्यातील महापालिका आयुक्त आणि नगरपालिका मुख्याधिकाऱ््यांची लवकरच बैठक बोलाविण्यात येणार आहे.

एकात्मिक परिवहन व्यवस्थेची भूमिका मुख्यमंत्री शिंदे आणि खासदार शिंदे यांनी यापूर्वीच घेतली होती. कल्याण डोंबिवलीच्या पहिवहन समितीचे माजी सभापती राजेश कदम यांनी देखील हीच भूमिका ते सभापती असताना घेतली होती. कल्याण डोंबिवली महापालिकेचा परिवहन उपक्रम हा आर्थिक तोट्यात आहे. उल्हासनगरला परिवहन सेवा नाही.

भिवंडी महापालिकेकडेही परिवहन सेवा उपक्रम नाही. अंबरनाथ आणि बदलापूर पालिका हा उपक्रम चालवू शकत नाही. केवळ ठाणे आणि नवी मुंबई महापालिकांचे परिवहन उपक्रम सक्षम रित्या सुरु आहेत. एकच परिवहन सेवा केल्यास जिल्ह्यातील सर्व महापालिका आणि नगररपालिका हद्दीतील नागरीकांना सार्वजनिक वाहतूकीचा एक सक्षम पर्याय उपलब्ध होऊ शकतो. महानगर निगम प्राधिकरण स्थापन झाल्यास त्यातून बस सेवेचे रस्त्यावरील संचलन वाढीस लागून खाजगी वाहतूकीसाठी आळा बसण्यास मदत होईल. त्याचबरोबर प्रदूषण आणि वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सूटका होण्यास मदत होऊ शकते. सर्व महापालिका आणि नगरपालिकांनी एकात्मिक परिवहन सेवेत सहभागी होण्याचे ठराव करुन सरकार दरबारी पाठविले आहेत. या ठरावाची अंमलबजावणी सरकारकडून केली जावे याकडे खासदार शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी या संदर्भात लवकर सर्व महापालिका आयुक्त आणि नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांची एकत्रित बैठक घेतली जाणार आहे असे सांगितले.

पाण्याचा कोटा वाढवून मिळण्याची मागणी

२७ गावातील नागरीकांना कमी दाबाने पाणी पुरवठा केला जातो. ज्या प्रमाणे गावातील नागरीकांना पाणी कमी दाबाने मिळते. ती स्थिती बड्या गृहसंकुलाची आहे. गोळवली, दावडी, नांदिवली या पट्ट्यात पाणी कमी येते. ही समस्या लक्षात घेता खासदार शिंदे यांच्या आदेशानुसार एमआयडीसी आणि महापालिका अधिकाऱ््यांसाेबत बैठक झाली. या बैठकीस राजेश कदम, प्रफुल्ल देशमुख, बंडू पाटील उपस्थित होते. लांबलेला पावसाळा पाहता पाण्याचे नियोजन करुन एमआयडीसीने पाण्याचे वितरण सम प्रमाणात करावे. पाण्याचा दाब वाढवावा. त्याचबरोबर पाण्याचा कोटा वाढवून देण्याची मागणी खासदार शिंदे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShrikant Shindeश्रीकांत शिंदे