शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कल्याण ग्रामीणमध्ये मतदारांची नावं गायब

By सचिन सागरे | Updated: May 20, 2024 16:35 IST

Maharashtra lok sabha election 2024 : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील भाल, पिसवली, नेतिवली या सारख्या भागात बहुतांश मतदारांची नावे यादीतून गायब झाल्याने या मतदारांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही.

कल्याणकल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण ग्रामीण भागातील नागरिक मतदानासाठी सकाळीच घराबाहेर पडले खरे, पण मतदान यादीतून नावे डिलीट झाल्याने हजारो नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. तर काही भागात मतदान करण्यासाठी लागणारी कागदपत्रे मतदारांकडे असून देखील त्यांना मतदान करता आले नाही. यासर्व प्रकारामुळे मतदारांनी आपली नाराजी व्यक्त केली. असे असले तरी, मतदान करण्यामध्ये तरुणाईचा उत्साह दिसून आला.

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील भाल, पिसवली, नेतिवली या सारख्या भागात बहुतांश मतदारांची नावे यादीतून गायब झाल्याने या मतदारांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. मतदार याद्यांमधील गोंधळामुळे भाल येथील बहुतांश मतदारांना मनस्ताप सहन करावा लागला. ज्याठिकाणी जिल्हा परिषद सेमी इंग्रजी शाळेत मतदान केंद्र होते. त्याठिकाणी प्रशासनाकडून मंडपाची व्यवस्था करण्यात आली नव्हती. शाळेच्या आत ज्या ठिकाणी रांगा लावून उभे होते त्याठिकाणी ना पंखा होता ना कुलर. तरीही घामाच्या धारेत मतदान करण्यासाठी मतदार रांगेत शांतपणे उभे होते. काही भागात दुपारच्या सुमारास मंडप लावण्याचे काम सुरु होते.

सकाळपासूनच नागरिक मतदानासाठी उत्साहात घराबाहेर पडले होते. ज्या मतदान केंद्रावर ते मतदान करतात. त्या केंद्रावर गेल्यावर अनेकाना त्यांचे नाव मतदार यादीत नसल्याचे आढळून आले. येथे उपस्थित असलेले स्वयंसेवक त्यांची नावे मतदार यादीत शोधण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र, मतदारांच्या पदरी निराशा पडली. आणि बहुतांश मतदारांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागले. आपले नाव कदाचित इतर मतदार संघात वर्ग करण्यात आल्याचा अंदाज असल्याने घरापासून लांब असलेल्या मतदार केंद्रावर जाऊनही मतदान करता न आल्याने मतदारांनी आपली नाराजी व्यक्त केली.

अनेक मतदारांची नावे डोंबिवली, नेतिवली, सागाव अशा भाल गावापासून दहा ते बारा किमी लांब अंतरावर आली आहेत. त्याठिकाणी जाण्यासाठी मतदारांना दोन रिक्षा करून जावे लागले. अनेक मतदार चिठ्ठी या मतदारांपर्यंत न पोचता रस्त्यात देखील फेकून देण्यात आल्याचे भाल येथील ग्रामस्थ अमित चिकनकर यांनी सांगितले.

मागील तीस वर्षांपासून भाल गावात राहत आहोत. यापूर्वी आम्ही मतदान केले आहे. परंतु, यंदा आमच्याकडे सर्व कागदपत्रे आहेत. तरीसुद्धा आमच्या नावापुढे डिलीट असे लिहिण्यात आल्याचे भाल येथील रहिवासी मिन्ता देवी आणि क्रीष्णा तिवारी यांनी सांगितले.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४kalyanकल्याण