शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

लॉकडाऊन म्हटले की पोटात गोळा येतो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 00:12 IST

वर्ष झाले हाताला काम नाही : कुटुंबाच्या गरजा भागवायच्या कशा?

अनिकेत घमंडीलोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : हाताला काम नाही, पण घरच्यांच्या अपेक्षा काय कमी असतात का? सरकारला काय ऊठसूट लॉकडाऊन घ्यायला जाते. सामान्यांची अर्थव्यवस्था कोणी बघायची? सरकारी फतवा काढून थोडेच पोट भरते. आता वर्ष झाले हाताला काम नाही. त्यामुळे लॉकडाऊन म्हटले की पोटात गोळा येतो. कोणाकडे दाद मागायची? कोणीच मदतीला येत नाही. त्यामुळे पुन्हा कडक लॉकडाऊन, बाहेर पडायचे नाही हे चालणार नाही. आम्हाला संसार आहे. त्यामुळे ताे चालविण्यासाठी कामधंदा हवाच, असे मत घरकाम करून कुटुंबाची गुजराण करणाऱ्या महिलांनी व्यक्त केले.गतवर्षी न भूतो असा लॉकडाऊन अगदी मार्चपासून नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत चालला. त्यानंतर अनलॉकचे नियम असे काहीना काही सुरूच आहे, त्यातून मार्ग निघत नाही ताेच लगेच आता पुन्हा लॉकडाऊन, संचारबंदी सुरू झाली हे योग्य नाही, असे मत महिलांनी व्यक्त केले.सरकार धान्य देण्याचे म्हणते, पण ते मिळविताना किती अडचणी येतात.  महागाई वाढत चालली, मुले शाळा नसल्याने शिक्षणाविना मोठी होत आहेत, त्यासोबत त्यांच्या अपेक्षा वाढत असतात. nआईवडिलांकडे नाही तर कोणाकडे ते मागणार? सरकार थोडेच येते गरजा भागवायला. त्यामुळे यापुढे कोरोना असो नसो. लॉकडाऊन नको, असा पवित्रा महिलांनी व्यक्त केला.nशहरात बहुतांशी इमारतींच्या ठिकाणी घरातील धुणी-भांडी, लादी-पोछा करण्यासाठी प्रति कामाचे ५०० ते ७०० रुपये घेतले जातात, साधारणपणे ५ घरांचे काम काही महिला करतात.nअसे करून महिन्याला १० ते १२ हजार रुपये कमावतात. पण, त्यांची ही कमाई वर्ष झाले बंद झाली आहे. त्यात लॉकडाऊन म्हटले की समस्यांत वाढ होणार असल्याने सामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

लॉकडाऊन नको, हाताला काम द्या. वर्ष, दीड वर्ष झाले उत्पन्न बंद झाले. मुलाबाळांच्या अपेक्षा, त्यांच्या गरजा पूर्ण कशा करायच्या? सरकार काही देत नाही, एक दोन वेळा अन्नधान्य दिले म्हणजे प्रश्न सुटले असे होत नसते.    - संजना पांचाळमला लॉकडाऊनआधी सुमारे २० हजार रुपये पगारवाली नोकरी होती. पण आता ते काम मिळत नाही. कामाला लावायचे म्हटले तरी काही जण पैसे मागतात. ते कुठून द्यायचे. कसे बसे दिल्यावर पुन्हा लॉकडाऊन लागले आणि नोकरी सुटली तर काय करायचे. खूप तणाव येतो. बस झाले लॉकडाऊन वगैरे. उपाययोजना करा आणि यातून सोडवा.    - सुप्रिया पाटीलसुरुवातीला लॉकडाऊनचे काही वाटले नाही, पण आता दडपण येते. घरात मुली, नवरा आहेत. मुले सगळे माेठे होत आहेत. त्यांना पण परिस्थितीचे गांभीर्य आहे. पण तरीही अपेक्षा असतातच ना? हाताला काम मिळायला हवे. वर्ष झाले. आर्थिक नुकसान कसे भरून काढायचे? सरकार थोडी येणार आहे त्यासाठी.    - वंदना जोशीकर