शहरं
Join us  
Trending Stories
1
गौतम गंभीरने पिचशी छेडछाड थांबवावी अन् मी सांगतोय ते ऐकावं...; सौरव गांगुलीचा थेट सल्ला
2
बांगलादेश कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर शेख हसीना यांची पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाल्या? 
3
किरकोळ गुंतवणूकदारांनी 'या' १० शेअर्समध्ये टाकले ₹१८,००० कोटी! सुजलॉन त्यापैकी एक, आणखी नावं कोणती?
4
"राहुल गांधी पंतप्रधान होवोत अथवा न होवोत, आमचा हेतू...!" बिहार निवडणुकीसंदर्भात बोलताना काय म्हणाले रॉबर्ट वाड्रा? 
5
क्रिप्टो मार्केटमध्ये हाहाकार! बिटकॉइन १५ लाख तर इथर १.३५ लाखानं कोसळला; ही आहेत कारणं
6
दिल्लीतील स्फोटात बुटाचा वापर, उमरने TATP स्फोटकांचा केला वापर; NIA च्या तपासात खळबळजनक माहिती
7
MLA Disqualification Case: 'आमदारांचं प्रकरण दोन आठवड्यात निकाली काढा, नाहीतर...'; सर्वोच्च न्यायालय विधानसभा अध्यक्षांवर संतापले
8
दिल्ली स्फोट तपास: कोडवर्ड, 'वुल्फ आवर' आणि महिला दहशतवाद्यांचे 'ऑरोरा-लूना' पथक!
9
ओवेसींच्या पाठिंब्यामुळे प्रतिष्ठेच्या पोटनिवडणुकीत मारली बाजी, कोण आहेत काँग्रेसचे आमदार नवीन यादव?
10
Delhi Blast : नेपाळमध्ये खरेदी केले ७ सेकंड-हँड फोन, कानपूरमधून ६ सिमकार्ड; दिल्ली स्फोटात मोठा खुलासा
11
निशस्त्र आंदोलकांवर गोळीबार, बॉम्ब टाकण्याचे आदेश, शेख हसीना दोषी, कोर्टाने सुनावली फाशीची शिक्षा 
12
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; Gold २ हजारांपेक्षा अधिकनं झालं स्वस्त, Silver मध्ये ६५०० ची घसरण
13
भाजपाचा यू टर्न! काशिनाथ चौधरींच्या पक्षप्रवेशाला स्थगिती; पालघर साधू हत्याकांडात झाले होते आरोप
14
Video: माकडाच्या उडीने REEL मध्ये आलं वेगळंच 'थ्रिल' !! घाबरलेल्या मुलीने पुढे काय केलं बघा
15
चाणक्यनीती: कोणी त्रास देत असेल तर अशा हितशत्रूंशी लढण्यासाठी वापरा 'या' ३ गुप्त रणनीती! |
16
Yuvraj Singh Father Yograj Singh : "मी मरायला तयार आहे, अनोळखी लोकांनी दिलेल्या अन्नावर जगतोय"; युवीच्या वडिलांना भावना अनावर
17
भारत सरकार शेख हसीना यांना बांगलादेशात परत पाठवणार? नियम काय सांगतात?
18
भाजपानं तिकीट नाकारल्यानं RSS कार्यकर्त्यांनं उचललं टोकाचं पाऊल?; अखेरच्या क्षणी केला होता शिवसेनेशी संपर्क
19
ATM मध्ये दोनदा 'कॅन्सल' बटन दाबल्यास तुमचे पैसे सुरक्षित राहतात? व्हायरल दाव्याचे सत्य काय?
20
Bihar CM: नितीश कुमारच होणार बिहारचे मुख्यमंत्री! भाजप प्रदेशाध्यक्षांनीच गोंधळ थांबवला; म्हणाले, "फक्त..."
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन म्हटले की पोटात गोळा येतो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 00:12 IST

वर्ष झाले हाताला काम नाही : कुटुंबाच्या गरजा भागवायच्या कशा?

अनिकेत घमंडीलोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : हाताला काम नाही, पण घरच्यांच्या अपेक्षा काय कमी असतात का? सरकारला काय ऊठसूट लॉकडाऊन घ्यायला जाते. सामान्यांची अर्थव्यवस्था कोणी बघायची? सरकारी फतवा काढून थोडेच पोट भरते. आता वर्ष झाले हाताला काम नाही. त्यामुळे लॉकडाऊन म्हटले की पोटात गोळा येतो. कोणाकडे दाद मागायची? कोणीच मदतीला येत नाही. त्यामुळे पुन्हा कडक लॉकडाऊन, बाहेर पडायचे नाही हे चालणार नाही. आम्हाला संसार आहे. त्यामुळे ताे चालविण्यासाठी कामधंदा हवाच, असे मत घरकाम करून कुटुंबाची गुजराण करणाऱ्या महिलांनी व्यक्त केले.गतवर्षी न भूतो असा लॉकडाऊन अगदी मार्चपासून नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत चालला. त्यानंतर अनलॉकचे नियम असे काहीना काही सुरूच आहे, त्यातून मार्ग निघत नाही ताेच लगेच आता पुन्हा लॉकडाऊन, संचारबंदी सुरू झाली हे योग्य नाही, असे मत महिलांनी व्यक्त केले.सरकार धान्य देण्याचे म्हणते, पण ते मिळविताना किती अडचणी येतात.  महागाई वाढत चालली, मुले शाळा नसल्याने शिक्षणाविना मोठी होत आहेत, त्यासोबत त्यांच्या अपेक्षा वाढत असतात. nआईवडिलांकडे नाही तर कोणाकडे ते मागणार? सरकार थोडेच येते गरजा भागवायला. त्यामुळे यापुढे कोरोना असो नसो. लॉकडाऊन नको, असा पवित्रा महिलांनी व्यक्त केला.nशहरात बहुतांशी इमारतींच्या ठिकाणी घरातील धुणी-भांडी, लादी-पोछा करण्यासाठी प्रति कामाचे ५०० ते ७०० रुपये घेतले जातात, साधारणपणे ५ घरांचे काम काही महिला करतात.nअसे करून महिन्याला १० ते १२ हजार रुपये कमावतात. पण, त्यांची ही कमाई वर्ष झाले बंद झाली आहे. त्यात लॉकडाऊन म्हटले की समस्यांत वाढ होणार असल्याने सामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

लॉकडाऊन नको, हाताला काम द्या. वर्ष, दीड वर्ष झाले उत्पन्न बंद झाले. मुलाबाळांच्या अपेक्षा, त्यांच्या गरजा पूर्ण कशा करायच्या? सरकार काही देत नाही, एक दोन वेळा अन्नधान्य दिले म्हणजे प्रश्न सुटले असे होत नसते.    - संजना पांचाळमला लॉकडाऊनआधी सुमारे २० हजार रुपये पगारवाली नोकरी होती. पण आता ते काम मिळत नाही. कामाला लावायचे म्हटले तरी काही जण पैसे मागतात. ते कुठून द्यायचे. कसे बसे दिल्यावर पुन्हा लॉकडाऊन लागले आणि नोकरी सुटली तर काय करायचे. खूप तणाव येतो. बस झाले लॉकडाऊन वगैरे. उपाययोजना करा आणि यातून सोडवा.    - सुप्रिया पाटीलसुरुवातीला लॉकडाऊनचे काही वाटले नाही, पण आता दडपण येते. घरात मुली, नवरा आहेत. मुले सगळे माेठे होत आहेत. त्यांना पण परिस्थितीचे गांभीर्य आहे. पण तरीही अपेक्षा असतातच ना? हाताला काम मिळायला हवे. वर्ष झाले. आर्थिक नुकसान कसे भरून काढायचे? सरकार थोडी येणार आहे त्यासाठी.    - वंदना जोशीकर