शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शहरांतर्गत बस सेवा चालविली नाही तर केडीएमटीला टाळे ठोकू; शिवसेना ठाकरे गटाचा केडीएमटीला इशारा

By मुरलीधर भवार | Updated: October 31, 2023 15:01 IST

ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने परिवहन व्यवस्थापक दीपक सावंत यांची भेट घेतली.

कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेचा परिवहन उपक्रम आहे. मात्र उपक्रमातील बसेस पनवेल, नवी मुंबई आणि भिवंडी मार्गावर चालविल्या जातात. या बसेसचा शहरातील नागरीकांना उपयोग होणार नसल्यास केडीएमटी कार्यालयास टाळे ठोकू असा इशारा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आज देण्यात आला आहे. ठाकरे गटाने आज केडीएमटी कार्यालयावर धडक दिली.

ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विजय साळवी यांच्यासह शहर प्रमुख सचिन बासरे, पदाधिकारी रविंद्र कपोते, विजया पोटे, अरविंद पोटे, विजय काटकर, हर्षवर्धन पालांडे, दत्तात्रय खंंडागळे आदी उपस्थित होते. ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने परिवहन व्यवस्थापक दीपक सावंत यांची भेट घेतली. जिल्हाप्रमुख साळवी यांनी सांगितले की, नुकतेच गणपती, नवरात्र सण झाले. लोकांचे हाल होते. रिक्षा वारेमाप भाडे आकारतात. परिवहन समिती ज्या साठी स्थापन केली आहे. लोकांना परिवहनची सेवा मिळावी. स्वस्त दरात प्रवास उपलब्ध व्हावा. आत्चाी परिस्थिती अशी आहे. सध्या शहरात कोणतीही बस सुरु नाही. सर्व बसेस पनवेल, भिवंडी, वाशी नवी मुंबई याठिकाणी चालविल्या जातात.

२०१७ साली चार ते पाच लाख उत्पन्न होते. तेच उत्पन्न आजही आहे. महापालिका कर्मचाऱ््यांचे पगार देते. डिझेल महापालिका पुरविते. हे सर्व मिळत असताना २०० पैकी ६० बसेस रस्त्यावर चालविल्या जातात. १४० बसेस पडून आहेत. २०० चालक वाहक आहेत. त्यापैकी केवळ ६० चालक वाहकांचा वापर केला जात आहे. बाकी कर्मचाऱ््यांना काय फूकटचा पगार दिला जातो का ? पहिवहन सेवा दिली नाही तर परिवहन कार्यालयास आम्ही टाळे ठोकू. पांढरा हत्ती पोसायचा कशाला ? नागरीकांनी भरलेल्या करातून केडीएमटी कामगारांना पगार दिला जातो. लोकांना सेवा कुठे मिळते. अनेक लोक कामानिमित्त कल्याणला येतात. सामान्य लोकांना रिक्षाचे भाडे परवडत नाही. त्यांनीही परिवहन सेवा बसेस उललब्ध करुन देत नाही.

परिवहनचे व्यवस्थापक दीपक सावंत यांनी सांगितले की, आमच्याकडे शिष्टमंडळ आले होते. शहरातील नागरीकांना परिवहन सेवा जास्तीत जास्त उपलब्ध करावी अशी मागणी केली आहे. नवे मार्ग सुचविले आहे. जे पूर्वी चालू होते. जे काही कालावधीपासून बंद आहे. ते मार्ग सुरु करण्यावर आमची सकारात्मक चर्चा झाली आहे. ते मार्ग आम्ही सुुरु करणार आहोत. २०१७ मध्ये असलेली बसेसची संख्या आणि आजची बसेस संख्या यात कमालीचा फरक आहे. आमच्याकडे ९० बसेस आहेत. त्यापैकी ८० बसेस रस्त्यावर धावतात. त्यापासून ५ लाख रुपयांचे आहे. 

टॅग्स :kalyanकल्याणShiv Senaशिवसेना