शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

शहरांतर्गत बस सेवा चालविली नाही तर केडीएमटीला टाळे ठोकू; शिवसेना ठाकरे गटाचा केडीएमटीला इशारा

By मुरलीधर भवार | Updated: October 31, 2023 15:01 IST

ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने परिवहन व्यवस्थापक दीपक सावंत यांची भेट घेतली.

कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेचा परिवहन उपक्रम आहे. मात्र उपक्रमातील बसेस पनवेल, नवी मुंबई आणि भिवंडी मार्गावर चालविल्या जातात. या बसेसचा शहरातील नागरीकांना उपयोग होणार नसल्यास केडीएमटी कार्यालयास टाळे ठोकू असा इशारा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आज देण्यात आला आहे. ठाकरे गटाने आज केडीएमटी कार्यालयावर धडक दिली.

ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विजय साळवी यांच्यासह शहर प्रमुख सचिन बासरे, पदाधिकारी रविंद्र कपोते, विजया पोटे, अरविंद पोटे, विजय काटकर, हर्षवर्धन पालांडे, दत्तात्रय खंंडागळे आदी उपस्थित होते. ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने परिवहन व्यवस्थापक दीपक सावंत यांची भेट घेतली. जिल्हाप्रमुख साळवी यांनी सांगितले की, नुकतेच गणपती, नवरात्र सण झाले. लोकांचे हाल होते. रिक्षा वारेमाप भाडे आकारतात. परिवहन समिती ज्या साठी स्थापन केली आहे. लोकांना परिवहनची सेवा मिळावी. स्वस्त दरात प्रवास उपलब्ध व्हावा. आत्चाी परिस्थिती अशी आहे. सध्या शहरात कोणतीही बस सुरु नाही. सर्व बसेस पनवेल, भिवंडी, वाशी नवी मुंबई याठिकाणी चालविल्या जातात.

२०१७ साली चार ते पाच लाख उत्पन्न होते. तेच उत्पन्न आजही आहे. महापालिका कर्मचाऱ््यांचे पगार देते. डिझेल महापालिका पुरविते. हे सर्व मिळत असताना २०० पैकी ६० बसेस रस्त्यावर चालविल्या जातात. १४० बसेस पडून आहेत. २०० चालक वाहक आहेत. त्यापैकी केवळ ६० चालक वाहकांचा वापर केला जात आहे. बाकी कर्मचाऱ््यांना काय फूकटचा पगार दिला जातो का ? पहिवहन सेवा दिली नाही तर परिवहन कार्यालयास आम्ही टाळे ठोकू. पांढरा हत्ती पोसायचा कशाला ? नागरीकांनी भरलेल्या करातून केडीएमटी कामगारांना पगार दिला जातो. लोकांना सेवा कुठे मिळते. अनेक लोक कामानिमित्त कल्याणला येतात. सामान्य लोकांना रिक्षाचे भाडे परवडत नाही. त्यांनीही परिवहन सेवा बसेस उललब्ध करुन देत नाही.

परिवहनचे व्यवस्थापक दीपक सावंत यांनी सांगितले की, आमच्याकडे शिष्टमंडळ आले होते. शहरातील नागरीकांना परिवहन सेवा जास्तीत जास्त उपलब्ध करावी अशी मागणी केली आहे. नवे मार्ग सुचविले आहे. जे पूर्वी चालू होते. जे काही कालावधीपासून बंद आहे. ते मार्ग सुरु करण्यावर आमची सकारात्मक चर्चा झाली आहे. ते मार्ग आम्ही सुुरु करणार आहोत. २०१७ मध्ये असलेली बसेसची संख्या आणि आजची बसेस संख्या यात कमालीचा फरक आहे. आमच्याकडे ९० बसेस आहेत. त्यापैकी ८० बसेस रस्त्यावर धावतात. त्यापासून ५ लाख रुपयांचे आहे. 

टॅग्स :kalyanकल्याणShiv Senaशिवसेना