शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

शहरांतर्गत बस सेवा चालविली नाही तर केडीएमटीला टाळे ठोकू; शिवसेना ठाकरे गटाचा केडीएमटीला इशारा

By मुरलीधर भवार | Updated: October 31, 2023 15:01 IST

ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने परिवहन व्यवस्थापक दीपक सावंत यांची भेट घेतली.

कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेचा परिवहन उपक्रम आहे. मात्र उपक्रमातील बसेस पनवेल, नवी मुंबई आणि भिवंडी मार्गावर चालविल्या जातात. या बसेसचा शहरातील नागरीकांना उपयोग होणार नसल्यास केडीएमटी कार्यालयास टाळे ठोकू असा इशारा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आज देण्यात आला आहे. ठाकरे गटाने आज केडीएमटी कार्यालयावर धडक दिली.

ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विजय साळवी यांच्यासह शहर प्रमुख सचिन बासरे, पदाधिकारी रविंद्र कपोते, विजया पोटे, अरविंद पोटे, विजय काटकर, हर्षवर्धन पालांडे, दत्तात्रय खंंडागळे आदी उपस्थित होते. ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने परिवहन व्यवस्थापक दीपक सावंत यांची भेट घेतली. जिल्हाप्रमुख साळवी यांनी सांगितले की, नुकतेच गणपती, नवरात्र सण झाले. लोकांचे हाल होते. रिक्षा वारेमाप भाडे आकारतात. परिवहन समिती ज्या साठी स्थापन केली आहे. लोकांना परिवहनची सेवा मिळावी. स्वस्त दरात प्रवास उपलब्ध व्हावा. आत्चाी परिस्थिती अशी आहे. सध्या शहरात कोणतीही बस सुरु नाही. सर्व बसेस पनवेल, भिवंडी, वाशी नवी मुंबई याठिकाणी चालविल्या जातात.

२०१७ साली चार ते पाच लाख उत्पन्न होते. तेच उत्पन्न आजही आहे. महापालिका कर्मचाऱ््यांचे पगार देते. डिझेल महापालिका पुरविते. हे सर्व मिळत असताना २०० पैकी ६० बसेस रस्त्यावर चालविल्या जातात. १४० बसेस पडून आहेत. २०० चालक वाहक आहेत. त्यापैकी केवळ ६० चालक वाहकांचा वापर केला जात आहे. बाकी कर्मचाऱ््यांना काय फूकटचा पगार दिला जातो का ? पहिवहन सेवा दिली नाही तर परिवहन कार्यालयास आम्ही टाळे ठोकू. पांढरा हत्ती पोसायचा कशाला ? नागरीकांनी भरलेल्या करातून केडीएमटी कामगारांना पगार दिला जातो. लोकांना सेवा कुठे मिळते. अनेक लोक कामानिमित्त कल्याणला येतात. सामान्य लोकांना रिक्षाचे भाडे परवडत नाही. त्यांनीही परिवहन सेवा बसेस उललब्ध करुन देत नाही.

परिवहनचे व्यवस्थापक दीपक सावंत यांनी सांगितले की, आमच्याकडे शिष्टमंडळ आले होते. शहरातील नागरीकांना परिवहन सेवा जास्तीत जास्त उपलब्ध करावी अशी मागणी केली आहे. नवे मार्ग सुचविले आहे. जे पूर्वी चालू होते. जे काही कालावधीपासून बंद आहे. ते मार्ग सुरु करण्यावर आमची सकारात्मक चर्चा झाली आहे. ते मार्ग आम्ही सुुरु करणार आहोत. २०१७ मध्ये असलेली बसेसची संख्या आणि आजची बसेस संख्या यात कमालीचा फरक आहे. आमच्याकडे ९० बसेस आहेत. त्यापैकी ८० बसेस रस्त्यावर धावतात. त्यापासून ५ लाख रुपयांचे आहे. 

टॅग्स :kalyanकल्याणShiv Senaशिवसेना