शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

उल्हासनगर महापालिकेच्या जलकुंभाला गळती; लाखो लिटर पाण्याची नासाडी

By सदानंद नाईक | Updated: June 2, 2024 19:16 IST

एकीकडे विविध भागात पाणीटंचाई असतांना उंच व भूमिगत जलकुंभला गळती लागली आहे. 

उल्हासनगर : शहरातील विविध भागात पाणीबानी निर्माण झाली असतांना महापालिकेच्या जलकुंभाला गळती लागून लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. याबाबत स्थानिक नेते व सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी आवाज उठवूनही महापालिकेने काहीएक कारवाई केली नसल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते प्रशांत चंदनशिवे यांनी दिली आहे. 

उल्हासनगर महापालिकेने नागरिकांना समप्रमाणात पाणी पुरवठा होण्यासाठी उंच जलकुंभ व दोन ठिकाणी भूमिगत पाणी साठवण टाक्या बांधल्या आहेत. तसेच त्याच्या दिमतीला पंपिंग स्टेशन उभारले आहेत. असे असतांनाही शहरात असमान पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप होत आहे. उच्चभ्रू वस्तीत दिवसाला दोन वेळा तर झोपडपट्टी भागात दिवसाला अर्धा तास तर काही परिसरात दिवसाआड रात्री बेरात्री पाणी पुरवठा होतो. याबाबत झोपडपट्टीतील माजी नगरसेवकांनी आवाज उठवूनही पाणी पुरवठा समान झाला नसल्याचे चित्र आहे. एकीकडे विविध भागात पाणीटंचाई असतांना उंच व भूमिगत जलकुंभला गळती लागली आहे. 

कॅम्प नं-५ येथील नेताजी चौक परिसरात ३ उंच तर एक भूमिगत जलकुंभ आहे. त्यापैकी भूमिगत जलकुंभा भोवती विविध झाडे उगविली असून अनेक ठिकाणी गळती लागून लाखो लिटर पाण्याची गळती होत आहे. तसेच डम्पिंग ग्राऊंड येथील उंच जलकुंभालाही गळती लागली आहे. कॅम्प नं-४, येथील तक्षशिला शाळा शेजारी दोन उंच जलकुंभा पैकी एका जलकुंभाला गळती लागली आहे. महापालिका पाणी पुरवठा विभागाने एखादी दुर्घटना होण्यापूर्वी उंच व भूमिगत जलकुंभाचे सर्वेक्षण करून त्वरित उपाययोजना करण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे. जलकुंभाच्या पाणी गळतीमुळे होणारी पाण्याची नासाडी प्रथम थांबविणे गरजेचे आहे. तसेच जलवाहिन्याला लागलेली गळतीवर उपाययोजना केल्यास लाखो लिटर पाण्याची बचत होणार आहे. 

टॅग्स :kalyanकल्याणulhasnagarउल्हासनगर