शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

उल्हासनगर महापालिकेच्या जलकुंभाला गळती; लाखो लिटर पाण्याची नासाडी

By सदानंद नाईक | Updated: June 2, 2024 19:16 IST

एकीकडे विविध भागात पाणीटंचाई असतांना उंच व भूमिगत जलकुंभला गळती लागली आहे. 

उल्हासनगर : शहरातील विविध भागात पाणीबानी निर्माण झाली असतांना महापालिकेच्या जलकुंभाला गळती लागून लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. याबाबत स्थानिक नेते व सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी आवाज उठवूनही महापालिकेने काहीएक कारवाई केली नसल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते प्रशांत चंदनशिवे यांनी दिली आहे. 

उल्हासनगर महापालिकेने नागरिकांना समप्रमाणात पाणी पुरवठा होण्यासाठी उंच जलकुंभ व दोन ठिकाणी भूमिगत पाणी साठवण टाक्या बांधल्या आहेत. तसेच त्याच्या दिमतीला पंपिंग स्टेशन उभारले आहेत. असे असतांनाही शहरात असमान पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप होत आहे. उच्चभ्रू वस्तीत दिवसाला दोन वेळा तर झोपडपट्टी भागात दिवसाला अर्धा तास तर काही परिसरात दिवसाआड रात्री बेरात्री पाणी पुरवठा होतो. याबाबत झोपडपट्टीतील माजी नगरसेवकांनी आवाज उठवूनही पाणी पुरवठा समान झाला नसल्याचे चित्र आहे. एकीकडे विविध भागात पाणीटंचाई असतांना उंच व भूमिगत जलकुंभला गळती लागली आहे. 

कॅम्प नं-५ येथील नेताजी चौक परिसरात ३ उंच तर एक भूमिगत जलकुंभ आहे. त्यापैकी भूमिगत जलकुंभा भोवती विविध झाडे उगविली असून अनेक ठिकाणी गळती लागून लाखो लिटर पाण्याची गळती होत आहे. तसेच डम्पिंग ग्राऊंड येथील उंच जलकुंभालाही गळती लागली आहे. कॅम्प नं-४, येथील तक्षशिला शाळा शेजारी दोन उंच जलकुंभा पैकी एका जलकुंभाला गळती लागली आहे. महापालिका पाणी पुरवठा विभागाने एखादी दुर्घटना होण्यापूर्वी उंच व भूमिगत जलकुंभाचे सर्वेक्षण करून त्वरित उपाययोजना करण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे. जलकुंभाच्या पाणी गळतीमुळे होणारी पाण्याची नासाडी प्रथम थांबविणे गरजेचे आहे. तसेच जलवाहिन्याला लागलेली गळतीवर उपाययोजना केल्यास लाखो लिटर पाण्याची बचत होणार आहे. 

टॅग्स :kalyanकल्याणulhasnagarउल्हासनगर