शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
2
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
3
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
4
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
5
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
6
"सरकार निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचे काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
7
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
8
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
9
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
10
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
11
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
12
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
13
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
14
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
15
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
16
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
17
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
18
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
19
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
20
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!

उल्हासनगर महापालिकेच्या जलकुंभाला गळती; लाखो लिटर पाण्याची नासाडी

By सदानंद नाईक | Updated: June 2, 2024 19:16 IST

एकीकडे विविध भागात पाणीटंचाई असतांना उंच व भूमिगत जलकुंभला गळती लागली आहे. 

उल्हासनगर : शहरातील विविध भागात पाणीबानी निर्माण झाली असतांना महापालिकेच्या जलकुंभाला गळती लागून लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. याबाबत स्थानिक नेते व सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी आवाज उठवूनही महापालिकेने काहीएक कारवाई केली नसल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते प्रशांत चंदनशिवे यांनी दिली आहे. 

उल्हासनगर महापालिकेने नागरिकांना समप्रमाणात पाणी पुरवठा होण्यासाठी उंच जलकुंभ व दोन ठिकाणी भूमिगत पाणी साठवण टाक्या बांधल्या आहेत. तसेच त्याच्या दिमतीला पंपिंग स्टेशन उभारले आहेत. असे असतांनाही शहरात असमान पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप होत आहे. उच्चभ्रू वस्तीत दिवसाला दोन वेळा तर झोपडपट्टी भागात दिवसाला अर्धा तास तर काही परिसरात दिवसाआड रात्री बेरात्री पाणी पुरवठा होतो. याबाबत झोपडपट्टीतील माजी नगरसेवकांनी आवाज उठवूनही पाणी पुरवठा समान झाला नसल्याचे चित्र आहे. एकीकडे विविध भागात पाणीटंचाई असतांना उंच व भूमिगत जलकुंभला गळती लागली आहे. 

कॅम्प नं-५ येथील नेताजी चौक परिसरात ३ उंच तर एक भूमिगत जलकुंभ आहे. त्यापैकी भूमिगत जलकुंभा भोवती विविध झाडे उगविली असून अनेक ठिकाणी गळती लागून लाखो लिटर पाण्याची गळती होत आहे. तसेच डम्पिंग ग्राऊंड येथील उंच जलकुंभालाही गळती लागली आहे. कॅम्प नं-४, येथील तक्षशिला शाळा शेजारी दोन उंच जलकुंभा पैकी एका जलकुंभाला गळती लागली आहे. महापालिका पाणी पुरवठा विभागाने एखादी दुर्घटना होण्यापूर्वी उंच व भूमिगत जलकुंभाचे सर्वेक्षण करून त्वरित उपाययोजना करण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे. जलकुंभाच्या पाणी गळतीमुळे होणारी पाण्याची नासाडी प्रथम थांबविणे गरजेचे आहे. तसेच जलवाहिन्याला लागलेली गळतीवर उपाययोजना केल्यास लाखो लिटर पाण्याची बचत होणार आहे. 

टॅग्स :kalyanकल्याणulhasnagarउल्हासनगर