शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

एनआरसी कंपनीकडून १५० कोटी रुपये मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी विधी विभागाचा सल्ला घ्यावा, उद्योगमंत्र्यांची सूचना

By मुरलीधर भवार | Updated: March 17, 2023 18:32 IST

एनआरसी कंपनीत ४ हजार पेक्षा जास्त कामगार काम करीत होते.

कल्याण -मोहने आंबिवली नजीक असलेल्या एनआरसी कंपनीकडून मालमत्ता कराच्या थकबाकी पोटी कल्याण डोंबिवली महापालिकेस दीडशे कोटी रुपये येणो बाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी विधी विभागाचा सल्ला घेऊन पूढील कार्यवाही केली जावी अशी सूचना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली आहे.

एनआरसी कंपनीत ४ हजार पेक्षा जास्त कामगार काम करीत होते. ही कंपनी आर्थिक डबघाईला आल्याचे सांगून कंपनी व्यवस्थापनाने टाळेबंदी केली. टाळेबंदी २००९ साली झाली. तेव्हापासून कंपनीच्या कामगारांची थकीत देणी दिलेली नाही. ही देण्यासाठी कामगारांचा न्यायालयीन लढा सुरु आहे. दरम्यान ४२५ एकर कंपनीची जागा अदानी उद्योग समूहाने लिलावात घेतली आहे. कामगारांची देणी थकीत आहे. अदानी उद्योग समूहाकडून कंपनीच्या जागेवर लॉजिस्टीक पार्क उभारण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. मालमत्ता कर थकविला असताना त्याठिकाणी महापालिकेकडून बांधकाम परवानगी कशाच्या आधारे दिली.

दीडशे कोटी थकीत मालमत्ता करापैकी १ कोटी ६० लाख रुपये भरलेले आहेत. या प्रकरणी काय कार्यवाही केली गेली असा प्रश्न विधान परिषदेत आमदार मनिषा कायंदे यांनी उपस्थीत केल्यावर काल उद्योग मंत्री सामंत यांनी बैठक घेतली. या बैठकीला आमदार कायंदे यांच्यासह महापालिकेचे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे हे देखील उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उर्वरीत थकबाकी वसूल केली जात नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. मात्र आमदार कायंदे यांनी उद्योग मंत्री सामंत यांच्या निदर्शनास एक बाब आणून दिली की, कंपनीने अन्य थकबाकीदारांच्या विरोधातही न्यायालयीन दावे दाखल केले आहे. कंपनीचा जागा एनआरसीकडून अदानी उद्योग समुहाने लिलावात घेतली असली तरी एनआरसीने दीडशे कोटीचा मालमत्ता कर थकविला आहे.

कंपनीचा सातबारा हा अद्याप एनआरसीच्या नावेच आहे. त्यामुळे सातबारावर थकीत मालमत्ता कराचा बोजा चढविण्याचा विषय कल्याण तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे प्रलंबित आहे. ही सगळी पाश्र्वभूमी पाहता या प्रकरणी विधी विभागाचे मत घेऊन पुढील कार्यवाही केली जावी. त्याचबरोबर कंपनीच्या जागेवर आणखीनही काम केले जाणार असल्याने त्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र, परवानग्या देण्याचा विषय महापालिकेसह राज्य सरकारकडे येणार आहे. त्यावेळी महापालिकेच्या मालमत्ता थकबाकीसह कामगारांची थकीत देणी दिल्याशिवाय पवानगी अथवा ना हरकत दाखला दिला जाऊ नये याकडे आमदार कायंदे यांनी लक्ष वेधले असून त्याला उद्योग मंत्र्यांनी सहमती दर्शविली असल्याचे कायंदे यांनी सांगितले.

 

टॅग्स :kalyanकल्याण