शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

एनआरसी कंपनीकडून १५० कोटी रुपये मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी विधी विभागाचा सल्ला घ्यावा, उद्योगमंत्र्यांची सूचना

By मुरलीधर भवार | Updated: March 17, 2023 18:32 IST

एनआरसी कंपनीत ४ हजार पेक्षा जास्त कामगार काम करीत होते.

कल्याण -मोहने आंबिवली नजीक असलेल्या एनआरसी कंपनीकडून मालमत्ता कराच्या थकबाकी पोटी कल्याण डोंबिवली महापालिकेस दीडशे कोटी रुपये येणो बाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी विधी विभागाचा सल्ला घेऊन पूढील कार्यवाही केली जावी अशी सूचना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली आहे.

एनआरसी कंपनीत ४ हजार पेक्षा जास्त कामगार काम करीत होते. ही कंपनी आर्थिक डबघाईला आल्याचे सांगून कंपनी व्यवस्थापनाने टाळेबंदी केली. टाळेबंदी २००९ साली झाली. तेव्हापासून कंपनीच्या कामगारांची थकीत देणी दिलेली नाही. ही देण्यासाठी कामगारांचा न्यायालयीन लढा सुरु आहे. दरम्यान ४२५ एकर कंपनीची जागा अदानी उद्योग समूहाने लिलावात घेतली आहे. कामगारांची देणी थकीत आहे. अदानी उद्योग समूहाकडून कंपनीच्या जागेवर लॉजिस्टीक पार्क उभारण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. मालमत्ता कर थकविला असताना त्याठिकाणी महापालिकेकडून बांधकाम परवानगी कशाच्या आधारे दिली.

दीडशे कोटी थकीत मालमत्ता करापैकी १ कोटी ६० लाख रुपये भरलेले आहेत. या प्रकरणी काय कार्यवाही केली गेली असा प्रश्न विधान परिषदेत आमदार मनिषा कायंदे यांनी उपस्थीत केल्यावर काल उद्योग मंत्री सामंत यांनी बैठक घेतली. या बैठकीला आमदार कायंदे यांच्यासह महापालिकेचे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे हे देखील उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उर्वरीत थकबाकी वसूल केली जात नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. मात्र आमदार कायंदे यांनी उद्योग मंत्री सामंत यांच्या निदर्शनास एक बाब आणून दिली की, कंपनीने अन्य थकबाकीदारांच्या विरोधातही न्यायालयीन दावे दाखल केले आहे. कंपनीचा जागा एनआरसीकडून अदानी उद्योग समुहाने लिलावात घेतली असली तरी एनआरसीने दीडशे कोटीचा मालमत्ता कर थकविला आहे.

कंपनीचा सातबारा हा अद्याप एनआरसीच्या नावेच आहे. त्यामुळे सातबारावर थकीत मालमत्ता कराचा बोजा चढविण्याचा विषय कल्याण तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे प्रलंबित आहे. ही सगळी पाश्र्वभूमी पाहता या प्रकरणी विधी विभागाचे मत घेऊन पुढील कार्यवाही केली जावी. त्याचबरोबर कंपनीच्या जागेवर आणखीनही काम केले जाणार असल्याने त्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र, परवानग्या देण्याचा विषय महापालिकेसह राज्य सरकारकडे येणार आहे. त्यावेळी महापालिकेच्या मालमत्ता थकबाकीसह कामगारांची थकीत देणी दिल्याशिवाय पवानगी अथवा ना हरकत दाखला दिला जाऊ नये याकडे आमदार कायंदे यांनी लक्ष वेधले असून त्याला उद्योग मंत्र्यांनी सहमती दर्शविली असल्याचे कायंदे यांनी सांगितले.

 

टॅग्स :kalyanकल्याण