शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

एनआरसी कंपनीकडून १५० कोटी रुपये मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी विधी विभागाचा सल्ला घ्यावा, उद्योगमंत्र्यांची सूचना

By मुरलीधर भवार | Updated: March 17, 2023 18:32 IST

एनआरसी कंपनीत ४ हजार पेक्षा जास्त कामगार काम करीत होते.

कल्याण -मोहने आंबिवली नजीक असलेल्या एनआरसी कंपनीकडून मालमत्ता कराच्या थकबाकी पोटी कल्याण डोंबिवली महापालिकेस दीडशे कोटी रुपये येणो बाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी विधी विभागाचा सल्ला घेऊन पूढील कार्यवाही केली जावी अशी सूचना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली आहे.

एनआरसी कंपनीत ४ हजार पेक्षा जास्त कामगार काम करीत होते. ही कंपनी आर्थिक डबघाईला आल्याचे सांगून कंपनी व्यवस्थापनाने टाळेबंदी केली. टाळेबंदी २००९ साली झाली. तेव्हापासून कंपनीच्या कामगारांची थकीत देणी दिलेली नाही. ही देण्यासाठी कामगारांचा न्यायालयीन लढा सुरु आहे. दरम्यान ४२५ एकर कंपनीची जागा अदानी उद्योग समूहाने लिलावात घेतली आहे. कामगारांची देणी थकीत आहे. अदानी उद्योग समूहाकडून कंपनीच्या जागेवर लॉजिस्टीक पार्क उभारण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. मालमत्ता कर थकविला असताना त्याठिकाणी महापालिकेकडून बांधकाम परवानगी कशाच्या आधारे दिली.

दीडशे कोटी थकीत मालमत्ता करापैकी १ कोटी ६० लाख रुपये भरलेले आहेत. या प्रकरणी काय कार्यवाही केली गेली असा प्रश्न विधान परिषदेत आमदार मनिषा कायंदे यांनी उपस्थीत केल्यावर काल उद्योग मंत्री सामंत यांनी बैठक घेतली. या बैठकीला आमदार कायंदे यांच्यासह महापालिकेचे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे हे देखील उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उर्वरीत थकबाकी वसूल केली जात नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. मात्र आमदार कायंदे यांनी उद्योग मंत्री सामंत यांच्या निदर्शनास एक बाब आणून दिली की, कंपनीने अन्य थकबाकीदारांच्या विरोधातही न्यायालयीन दावे दाखल केले आहे. कंपनीचा जागा एनआरसीकडून अदानी उद्योग समुहाने लिलावात घेतली असली तरी एनआरसीने दीडशे कोटीचा मालमत्ता कर थकविला आहे.

कंपनीचा सातबारा हा अद्याप एनआरसीच्या नावेच आहे. त्यामुळे सातबारावर थकीत मालमत्ता कराचा बोजा चढविण्याचा विषय कल्याण तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे प्रलंबित आहे. ही सगळी पाश्र्वभूमी पाहता या प्रकरणी विधी विभागाचे मत घेऊन पुढील कार्यवाही केली जावी. त्याचबरोबर कंपनीच्या जागेवर आणखीनही काम केले जाणार असल्याने त्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र, परवानग्या देण्याचा विषय महापालिकेसह राज्य सरकारकडे येणार आहे. त्यावेळी महापालिकेच्या मालमत्ता थकबाकीसह कामगारांची थकीत देणी दिल्याशिवाय पवानगी अथवा ना हरकत दाखला दिला जाऊ नये याकडे आमदार कायंदे यांनी लक्ष वेधले असून त्याला उद्योग मंत्र्यांनी सहमती दर्शविली असल्याचे कायंदे यांनी सांगितले.

 

टॅग्स :kalyanकल्याण