शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
2
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
3
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
4
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
5
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
6
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
7
रागाच्या भरात परेश रावल यांनी गमावले भान! म्हणाले, 'एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड...'
8
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो
10
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
11
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
12
Video: लायब्ररीतून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झाडल्या गोळ्या, थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
13
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
14
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
15
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
16
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
17
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
18
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
19
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
20
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...

ताजा विषय : इस शहर में हर शख्स परेशान सा क्यूँ है...

By संदीप प्रधान | Updated: December 19, 2022 08:19 IST

शहरातील सुजाण, सुशिक्षित व संवेदनशील नागरिकांना अस्वस्थ करणारी आकडेवारी उघड झाली आहे.

संदीप प्रधान,वरिष्ठ सहायक संपादक

डोंबिवली, ठाणे ही शहरे सांस्कृतिकदृष्ट्या गेल्या पंधरा वर्षांतील केंद्रे. अनेक जिनियस या शहरांत राहतात. एकेकाळी गिरगाव, दादर येथे होणारे साहित्यिक, सांस्कृतिक सोहळे आता याच शहरांत होतात. या शहरातील सुजाण, सुशिक्षित व संवेदनशील नागरिकांना अस्वस्थ करणारी आकडेवारी उघड झाली आहे. थुंकताना अंगावर थुंकी उडाली म्हणून जीव घेतला. मोटारसायकल उभी करताना धक्का लागला म्हणून जबर जखमी केला, अशा घटना डोंबिवलीत वाढल्या आहेत. ठाण्यातही अशा घटनांची कमतरता नाही. डोंबिवलीत ११ महिन्यांत किरकोळ वादावादीतून जिवावर उठण्याचे किंवा हिंस्र प्रतिक्रिया देण्याचे ३९९ गुन्हे नोंदले गेले. ठाण्यातील पोलिसांनी आकडेवारी जाहीर केली नसली तरी डोंबिवलीसारखीच परिस्थिती आहे. त्यामुळे येथील लोकांना नेमके झाले आहे काय, असा प्रश्न पडतो.

डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर व ठाण्यातील दूरचा परिसर हा डॉर्मेटरी सिटी असाच आहे. येथे वास्तव्य करणारी ९५ टक्के माणसे पोटासाठी मुंबईकडे जातात. रात्री पाठ टेकायला परत येतात. काहींना तर अगदी बदलापूर, डोंबिवलीहून बोरिवली, दहिसरला रोज जावे लागते. ही माणसे दिवसातील किमान साडेतीन ते चार तास रेल्वे, बस, रिक्षा, टॅक्सी असा प्रवास करतात. मध्य रेल्वेचे रडगाणे बाराही महिने सुरू असते. किरकोळ कारणामुळेही रेल्वे वाहतूक अर्धा तास उशिरा सुरू असते. फलाटावर येणाऱ्या गाडीत प्रवेश मिळवण्यापासून मारामारी सुरू होते. गर्दीमुळे दरवाजातून पडून लोकांचे दररोज दोन-तीन मृत्यू होतात. कोरोनाने गेल्या अडीच वर्षांत तर माणसाचे जीवन बदलून टाकले.

कोरोना काळात मोठ्या प्रमाणावर रोजगार गेले. त्यामुळे बेरोजगारी वाढली व अल्प वेतनात काम करायला कर्मचारीवर्ग उपलब्ध झाला. साहजिकच इतकी यातायात करून चाकरी केल्यावर गरजा भागवण्याएवढे वेतन मिळत नाही, याची सल या परिसरात राहणाऱ्यांच्या मनात कायम असते. डोंबिवली, कल्याणसारख्या शहरात काही लाखांत मिळणाऱ्या घरांची किंमत आता कोटीकोटींची उड्डाणे घेऊ लागलीत. ठाणे शहर तर केव्हाच सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. त्यामुळे अनेक जण उपनगरातही स्वत:चे हक्काचे घर घेऊ शकत नाहीत. 

मध्यमवर्गाची ही कहाणी तर कोरोना काळात उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड येथे पायी गेलेला गोरगरीब मजूर वर्ग या परिसरात मोठ्या संख्येने आहे. हा वर्ग रेल्वेमार्गालगत झोपड्यांत, रस्त्यावर राहतो. कल्याण रेल्वेस्थानकाजवळील एका टॉवरबाहेर रस्त्यावर राहणाऱ्या नऊ वर्षांच्या मुलीला एका अशाच बेघर मवाल्याने अलीकडेच उचलून नेले व टॉवरच्या परिसरात बलात्कार करून हत्या केली. 

परराज्यात गुन्हे असलेले, तडीपारीचे आदेश निघालेले अनेक जण ठाणे-डोंबिवली शहरांत येतात. कुठेही, कसेही वास्तव्य करतात. मात्र मूळ गुन्हेगारी पिंड उचल खातो. कोरोनानंतर माणसांची शरीरे दुबळी झाली तशी मनेही कमकुवत झालीत. पारा चढताच ती काटा काढून मोकळी होतात...

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवली