शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

ताजा विषय : इस शहर में हर शख्स परेशान सा क्यूँ है...

By संदीप प्रधान | Updated: December 19, 2022 08:19 IST

शहरातील सुजाण, सुशिक्षित व संवेदनशील नागरिकांना अस्वस्थ करणारी आकडेवारी उघड झाली आहे.

संदीप प्रधान,वरिष्ठ सहायक संपादक

डोंबिवली, ठाणे ही शहरे सांस्कृतिकदृष्ट्या गेल्या पंधरा वर्षांतील केंद्रे. अनेक जिनियस या शहरांत राहतात. एकेकाळी गिरगाव, दादर येथे होणारे साहित्यिक, सांस्कृतिक सोहळे आता याच शहरांत होतात. या शहरातील सुजाण, सुशिक्षित व संवेदनशील नागरिकांना अस्वस्थ करणारी आकडेवारी उघड झाली आहे. थुंकताना अंगावर थुंकी उडाली म्हणून जीव घेतला. मोटारसायकल उभी करताना धक्का लागला म्हणून जबर जखमी केला, अशा घटना डोंबिवलीत वाढल्या आहेत. ठाण्यातही अशा घटनांची कमतरता नाही. डोंबिवलीत ११ महिन्यांत किरकोळ वादावादीतून जिवावर उठण्याचे किंवा हिंस्र प्रतिक्रिया देण्याचे ३९९ गुन्हे नोंदले गेले. ठाण्यातील पोलिसांनी आकडेवारी जाहीर केली नसली तरी डोंबिवलीसारखीच परिस्थिती आहे. त्यामुळे येथील लोकांना नेमके झाले आहे काय, असा प्रश्न पडतो.

डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर व ठाण्यातील दूरचा परिसर हा डॉर्मेटरी सिटी असाच आहे. येथे वास्तव्य करणारी ९५ टक्के माणसे पोटासाठी मुंबईकडे जातात. रात्री पाठ टेकायला परत येतात. काहींना तर अगदी बदलापूर, डोंबिवलीहून बोरिवली, दहिसरला रोज जावे लागते. ही माणसे दिवसातील किमान साडेतीन ते चार तास रेल्वे, बस, रिक्षा, टॅक्सी असा प्रवास करतात. मध्य रेल्वेचे रडगाणे बाराही महिने सुरू असते. किरकोळ कारणामुळेही रेल्वे वाहतूक अर्धा तास उशिरा सुरू असते. फलाटावर येणाऱ्या गाडीत प्रवेश मिळवण्यापासून मारामारी सुरू होते. गर्दीमुळे दरवाजातून पडून लोकांचे दररोज दोन-तीन मृत्यू होतात. कोरोनाने गेल्या अडीच वर्षांत तर माणसाचे जीवन बदलून टाकले.

कोरोना काळात मोठ्या प्रमाणावर रोजगार गेले. त्यामुळे बेरोजगारी वाढली व अल्प वेतनात काम करायला कर्मचारीवर्ग उपलब्ध झाला. साहजिकच इतकी यातायात करून चाकरी केल्यावर गरजा भागवण्याएवढे वेतन मिळत नाही, याची सल या परिसरात राहणाऱ्यांच्या मनात कायम असते. डोंबिवली, कल्याणसारख्या शहरात काही लाखांत मिळणाऱ्या घरांची किंमत आता कोटीकोटींची उड्डाणे घेऊ लागलीत. ठाणे शहर तर केव्हाच सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. त्यामुळे अनेक जण उपनगरातही स्वत:चे हक्काचे घर घेऊ शकत नाहीत. 

मध्यमवर्गाची ही कहाणी तर कोरोना काळात उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड येथे पायी गेलेला गोरगरीब मजूर वर्ग या परिसरात मोठ्या संख्येने आहे. हा वर्ग रेल्वेमार्गालगत झोपड्यांत, रस्त्यावर राहतो. कल्याण रेल्वेस्थानकाजवळील एका टॉवरबाहेर रस्त्यावर राहणाऱ्या नऊ वर्षांच्या मुलीला एका अशाच बेघर मवाल्याने अलीकडेच उचलून नेले व टॉवरच्या परिसरात बलात्कार करून हत्या केली. 

परराज्यात गुन्हे असलेले, तडीपारीचे आदेश निघालेले अनेक जण ठाणे-डोंबिवली शहरांत येतात. कुठेही, कसेही वास्तव्य करतात. मात्र मूळ गुन्हेगारी पिंड उचल खातो. कोरोनानंतर माणसांची शरीरे दुबळी झाली तशी मनेही कमकुवत झालीत. पारा चढताच ती काटा काढून मोकळी होतात...

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवली