शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

कल्याण-कसारा रेल्वेच्या चौथ्या मार्गिकेसाठी एनआरसी कंपनीची जमीन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 07:19 IST

कंपनीची ४४५ एकर जागा आहे. ही जागा एनआरसी कंपनीकडून अदानी उद्योग समूहाने लिलावात घेतली.

कल्याण : कल्याण-कसारा रेल्वेच्या चौथ्या मार्गिकेचे काम मध्य रेल्वे प्रशासनाकडून लवकर हाती घेतले जाणार आहे. या चौथ्या मार्गिकेसाठी राज्य सरकारच्या महसूल विभागाला भूसंपादन करावे लागणार आहे. या मार्गिकेमुळे आंबिवली नजीकच्या एनआरसी कंपनीची जागा बाधित होणार आहे. ही जागा अदानी कंपनीने खरेदी केली असल्याने संपादित करण्यासाठी महसूल विभागाला कसरत करावी लागणार आहे. 

एनआरसी कंपनी आर्थिक डबघाईला आल्याचे कारण पुढे करीत कंपनी प्रशासनाने २००९ साली कंपनीत टाळेबंदी लागू केली. या कंपनीत काम करणाऱ्या चार हजार कामगारांच्या थकीत देण्याचा प्रश्न दिल्लीतील नॅशनल कंपनी लॉ लवादाकडे न्यायप्रविष्ट आहे. 

कंपनीची ४४५ एकर जागा आहे. ही जागा एनआरसी कंपनीकडून अदानी उद्योग समूहाने लिलावात घेतली. कंपनीच्या जागेचा लिलाव झाला असला तरी जागा अद्याप एनआरसी कंपनीच्या नावे आहे. कंपनीकडून कल्याण डोंबिवली महापालिकेस मालमत्ता कराच्या थकबाकीपोटी १५० कोटी येणे बाकी आहे. त्यामुळे कंपनीच्या सातबारावर महसूल खात्याकडून महापालिकेचे नाव लावण्याची प्रक्रिया महसूल खात्याकडे प्रलंबित आहे. कंपनीची जागा रेल्वेच्या चौथ्या मार्गिकेच्या प्रकल्पात बाधित होणार आहे. 

१११ कोटींच्या मोबदल्याचे वाटपमहसूल विभागाने कल्याण ते कसारा या तिसऱ्या मार्गिकेच्या  प्रकल्पाकरिता लागणारी भूसंपादनाची प्रक्रिया यापूर्वीच पूर्ण केली आहे. बाधितांचे न्यायनिवाडे केले असून बाधितांना १११ कोटी रुपयांच्या मोबदल्याचे वाटपही केले आहे. तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम मार्च २०२० मध्ये पूर्ण करण्याचे उद्दिष्ट रेल्वेने ठेवले होते. मात्र त्याची पूर्तता झाली नाही. कारण भूसंपादनाचा विषय मार्गी लावणे बाकी होते. आता चौथ्या मार्गिकेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून त्याकरिता लागणाऱ्या जमिनीची मोजणी प्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया केली जाईल. भूसंपादनासाठी बाधितांच्या मोबदल्याच्या रकमेची तरतूद आवश्यक आहे.  तरतूद होताच भूसंपादनाची प्रक्रिया गतीने सुरू करता येईल, असे  महसूल विभागाकडून सांगण्यात आले.