शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

५० चाळींना केडीएमसीची नोटीस, कचरा उघड्यावर टाकल्यास दंड वसूल करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 17:55 IST

कल्याण डोंबिवलीत राबवली जातेय शून्य कचरा मोहीम. कचरा उघड्यावर टाकल्यास दंड आकारणार, पालिकेचा इशारा.

ठळक मुद्देकल्याण डोंबिवलीत राबवली जातेय शून्य कचरा मोहीम.कचरा उघड्यावर टाकल्यास दंड आकारणार, पालिकेचा इशारा.

कल्याण-कल्याणडोंबिवली महापालिकेकडून शून्य कचरा मोहिम राबविली जात आहे. मात्र अनेक ठिकाणी चाळीत राहणारे नागरिक कचरा वर्गीकरण करुन घंडा गाडीकडे देत नाही. कचरा उघड्यावर टाकतात. कचरा उघडय़ावर टाकल्यास दंड आकारण्यात येईल असा इशारा महापलिकेच्या घनकचरा विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. महापालिकेने ५० चाळींना कारवाईचा इशारा देणारी नोटीस बजावली आहे.

महापालिकने मे २०२० शून्य कचरा मोहिम सुरु केली. ही मोहिम सुरु केली तेव्हा महापालिकेच्या घनकचरा विभागाने विविध ठिकाणच्या कचरा कुंड्या काढल्या. कचरा गाडीकडे जमा केला पाहिजे. तो कुंडीत टाकता कामा नये असा त्यामागचा उद्देश होता. अनेक बड्या सोसायट्यांना ओल्या कचऱ्यापासून खत तयार करण्याचे प्रकल्प सोसायटी पातळीवर सुरु करा असे सांगितले. त्याचबरोबर कचरा वर्गीकरणासाठी वेगवेगळ्या युक्त्या अवंलबिल्या. कपडे स्वरुपातील कचरा गोळा वेगळ्य़ा प्रकारे गोळा करुन वापरण्याजोग्या कपडय़ातून कापडी पिशव्या तयार केल्या. त्यातून महिला बचत गटांच्या हाताला काम मिळाले. 

रबर,  प्लास्टीक, काचा आदी वेगळे गोळा करण्याचे वार ठरवून दिले. प्लास्टीक कचरा वेगळ्य़ा पद्धतीने गोळा करुन तो रियकलींगला दिला. तसेच माणूसकीच्या भिंतीचा उपक्रम सुरु केला. हे सगळे सुरु असताना अखेरीस आधारवाडी डंपिंग ग्राऊंड बंद करण्याच्या उद्दीष्टापर्यंत महापालिका पोहचली. आत्ता महापालिकेने चाळीतील घरांमधून गोळा होणारा कचरा वर्गीकरण करुन येत नाही. तो उघडय़ावर टाकला जातो. तो उघडय़ावर टाकण्याऐवजी चाळीत राहणाऱ्या नागरिकांनी त्यांच्या घरातील कचरा वर्गीकरण करुन तो घंडागाडीकडे जमा केला पाहिजे. घंडागाडी दोन वेळा चाळ परिसरात येणार आहे. गाडी येऊनही कचरा उघडय़ावर टाकल्यास कचरा उघड्यावर टाकणाऱ्यास सुरुवातीला प्रत्येकी दंड आकारला जाईल अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी दिली आहे. ही कारवाई करण्यासाठी कल्याण पश्चिमेतील आणि डोंबिवली पश्चिमेतील जवळपास ५० चाळींना नोटीसा देऊन कारवाईचा इशारा दिला आहे.

ग्रामीण भागात कचरा पडूनचकल्याण डोंबिवली महापालिकेतील २७ गावांमधील कचरा उचलला जात नाही. तो ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला पडून असतो. ग्रामीण भागात शून्य कचरा मोहिम राबविली जात नसल्याचे चित्र पाहावयास मिळते. त्याठिकाणी महापालिकेकडून कचरा उचलला जात नाही अशी माहिती माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी दिली आहे.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवली