शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

... म्हणून संतापलेल्या रिक्षाचालकांनी घातला वाहतूक पोलिसांना घेराव, वाचा नक्की काय घडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 14:14 IST

रिक्षाचालकांचा पारा चांगलाच चढल्याचं दिसून आलं होतं.

मयुरी चव्हाण 

कल्याणडोंबिवली शहरात रिक्षाचालक, प्रवासी आणि वाहतूक पोलीस यांच्यात नेहमीच शाब्दीक चकमक उडत असते. त्यातच आता ई चलान प्रक्रियेमुळे नवीन वाद  निर्माण होताना दिसत आहेत. मंगळवारी  सकाळी  डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा चौक परिसरात रिक्षा चालकांनी  वाहतूक पोलिसांना घेराव घातल्याचं पाहायला मिळालं. एका रिक्षाचालकाला दोन तासात एकाच वाहतूक कर्मचाऱ्याने दोन फाईन मारल्यानं रिक्षाचालकांचा पारा चांगलाचं वाढला होता. काही काळ या ठिकाणी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर रिक्षाचालकांनी आपला मोर्चा वाहतूक शाखेच्या कार्यालयात वळवला. मार्च एडिंगमुळे अशा कारवाया होतात असा आरोपही रिक्षा चालकांकडून करण्यात आला.दिनेश मेहता नावाच्या रिक्षाचालकाला दोन तासात दोन फाईन ई चलान प्रक्रियेच्या माध्यमातून आकारण्यात आले. यानंतर मंगळवारी सर्व रिक्षाचालक इंदिरा चौकात जमा झाले. यावेळी उपस्थित असलेल्या  वाहतूक कर्मचाऱ्यांना घेराव घालून दंडाबद्दल जाब विचारण्यात आला. रिक्षाचालकांच्या बाजू कोणीच विचारात घेत नाहीत अशी खंत ही यावेळी व्यक्त करण्यात आली. त्यानंतर वाहतूक विभागाच्या कार्यालयात रिक्षाचालकांनी आपला  मोर्चा वळवला. 

ई चलान बाबत अनेक तक्रारी यावेळी मांडण्यात आल्या. तसेच  फ्रंट सीटचा नियम केवळ सकाळी लागू केला जातो. संध्याकाळी गर्दी असल्याने डोळेझाक केली जाते. मग सकाळी वेगळा नियम गर्दी असल्यावर वेगळा नियम का? असा सवालही विचारण्यात आला. अशा पद्धतीने फाईन लावला गेला तर आम्ही कमवायचा किती ? घर कसं चालवायचं आणि  फाईन तरी किती भरायचा? अशा एक ना अनेक प्रश्नांची सरबत्ती यावेळी करण्यात आली.  

दोन तासात एकाच कर्मचाऱ्याकडून एका रिक्षाचालकाला दोन फाईन मारण्यात आले. कमवायचे किती आणि दंड भरायचा तरी किती? हे सर्व थांबलं नाही तर वाहतूक शाखेवर  मोर्चा काढू. केवळ मार्च एडिंगचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी हा सर्व खटाटोप सुरू आहे. दत्ता माळेकर,  भाजप प्रणित रिक्षाचालक मालक संघटना 

ई चलानबाबत जनजागृती करण्यासाठी एक मेळावा आयोजित करण्यात येईल. डिजिटल प्रक्रिया असल्याने फाईन सोबत फोटोही जोडला जातो. तरी याबाबत अधिक चौकशी करून पुढील कार्यवाही केली जाईल. उमेश गित्ते पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीauto rickshawऑटो रिक्षा