शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

पाणी साचल्यामुळे कल्याण-बदलापूर राज्य महामार्ग वाहतुकीसाठी बंद!

By पंकज पाटील | Updated: July 19, 2023 12:57 IST

प्रत्येक पावसात कल्याण बदलापूर राज्य महामार्ग पाण्याखाली येत असताना देखील प्रशासन त्याबाबत कोणतीही ठोस उपाययोजना करताना दिसत नाही.

अंबरनाथ: अंबरनाथ शहरातून जाणारा कल्याण बदलापूर राज्य महामार्ग पुन्हा एकदा पाण्याखाली आला आहे. रस्त्याच्या शेजारी असलेल्या कंपन्यांनी मोठा नाला बुजवल्यामुळे सर्व पाणी राज्य महामार्गाच्या एका मार्गीकेवर अडून राहिलं होतं. त्यामुळे हा राज्य महामार्ग काही काळासाठी बंद ठेवावा लागला. प्रत्येक पावसात कल्याण बदलापूर राज्य महामार्ग पाण्याखाली येत असताना देखील प्रशासन त्याबाबत कोणतीही ठोस उपाययोजना करताना दिसत नाही. याउलट या राज्य महामार्गाच्या बाजूला असलेल्या कंपन्या राजरोसपणे मुख्य नाला अरुंद करण्याचे काम करीत आहे. 

एवढेच नव्हे तर काही कंपन्याने थेट नालाच वळवल्याने सर्व पाणी राज्य महामार्गावर येत आहे. जे पाणी नाल्यातून वाहून जाणे गरजेचे आहे ते पाणी रस्त्यावरून वाहत असल्यामुळे राज्य महामार्गालाच नाल्याचे स्वरूप आले होते. बदलापूर दिशेकडील एक मार्ग पूर्णपणे बंद करण्याची वेळ वाहतूक विभागावर आली होती. तर दुसऱ्या मार्गिकेवरून संथ गतीने वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती.

पाण्याचा प्रवाह एवढा जास्त होता की या पाण्यात काही वाहने बंद देखील पडले होते. तर काही वाहनांनी या भर पाण्यातून मार्ग काढत बदलापूर गाठले. प्रत्येक पावसात हा राज्य महामार्ग बंद होत असला तरी यंदा या महामार्गावर तब्बल चार फुटावून अधिक पाणी साचल्याने प्रशासन किती कुचकामी आहे याचा प्रत्यय नागरिकांना अनुभवता आला.

टॅग्स :kalyanकल्याणRainपाऊस