शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

पाणी साचल्यामुळे कल्याण-बदलापूर राज्य महामार्ग वाहतुकीसाठी बंद!

By पंकज पाटील | Updated: July 19, 2023 12:57 IST

प्रत्येक पावसात कल्याण बदलापूर राज्य महामार्ग पाण्याखाली येत असताना देखील प्रशासन त्याबाबत कोणतीही ठोस उपाययोजना करताना दिसत नाही.

अंबरनाथ: अंबरनाथ शहरातून जाणारा कल्याण बदलापूर राज्य महामार्ग पुन्हा एकदा पाण्याखाली आला आहे. रस्त्याच्या शेजारी असलेल्या कंपन्यांनी मोठा नाला बुजवल्यामुळे सर्व पाणी राज्य महामार्गाच्या एका मार्गीकेवर अडून राहिलं होतं. त्यामुळे हा राज्य महामार्ग काही काळासाठी बंद ठेवावा लागला. प्रत्येक पावसात कल्याण बदलापूर राज्य महामार्ग पाण्याखाली येत असताना देखील प्रशासन त्याबाबत कोणतीही ठोस उपाययोजना करताना दिसत नाही. याउलट या राज्य महामार्गाच्या बाजूला असलेल्या कंपन्या राजरोसपणे मुख्य नाला अरुंद करण्याचे काम करीत आहे. 

एवढेच नव्हे तर काही कंपन्याने थेट नालाच वळवल्याने सर्व पाणी राज्य महामार्गावर येत आहे. जे पाणी नाल्यातून वाहून जाणे गरजेचे आहे ते पाणी रस्त्यावरून वाहत असल्यामुळे राज्य महामार्गालाच नाल्याचे स्वरूप आले होते. बदलापूर दिशेकडील एक मार्ग पूर्णपणे बंद करण्याची वेळ वाहतूक विभागावर आली होती. तर दुसऱ्या मार्गिकेवरून संथ गतीने वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती.

पाण्याचा प्रवाह एवढा जास्त होता की या पाण्यात काही वाहने बंद देखील पडले होते. तर काही वाहनांनी या भर पाण्यातून मार्ग काढत बदलापूर गाठले. प्रत्येक पावसात हा राज्य महामार्ग बंद होत असला तरी यंदा या महामार्गावर तब्बल चार फुटावून अधिक पाणी साचल्याने प्रशासन किती कुचकामी आहे याचा प्रत्यय नागरिकांना अनुभवता आला.

टॅग्स :kalyanकल्याणRainपाऊस