शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
3
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
4
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
5
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
6
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
7
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
8
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
9
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
10
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
11
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
12
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
13
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
14
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
15
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
16
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
17
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
18
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
19
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
20
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...

पाणी साचल्यामुळे कल्याण-बदलापूर राज्य महामार्ग वाहतुकीसाठी बंद!

By पंकज पाटील | Updated: July 19, 2023 12:57 IST

प्रत्येक पावसात कल्याण बदलापूर राज्य महामार्ग पाण्याखाली येत असताना देखील प्रशासन त्याबाबत कोणतीही ठोस उपाययोजना करताना दिसत नाही.

अंबरनाथ: अंबरनाथ शहरातून जाणारा कल्याण बदलापूर राज्य महामार्ग पुन्हा एकदा पाण्याखाली आला आहे. रस्त्याच्या शेजारी असलेल्या कंपन्यांनी मोठा नाला बुजवल्यामुळे सर्व पाणी राज्य महामार्गाच्या एका मार्गीकेवर अडून राहिलं होतं. त्यामुळे हा राज्य महामार्ग काही काळासाठी बंद ठेवावा लागला. प्रत्येक पावसात कल्याण बदलापूर राज्य महामार्ग पाण्याखाली येत असताना देखील प्रशासन त्याबाबत कोणतीही ठोस उपाययोजना करताना दिसत नाही. याउलट या राज्य महामार्गाच्या बाजूला असलेल्या कंपन्या राजरोसपणे मुख्य नाला अरुंद करण्याचे काम करीत आहे. 

एवढेच नव्हे तर काही कंपन्याने थेट नालाच वळवल्याने सर्व पाणी राज्य महामार्गावर येत आहे. जे पाणी नाल्यातून वाहून जाणे गरजेचे आहे ते पाणी रस्त्यावरून वाहत असल्यामुळे राज्य महामार्गालाच नाल्याचे स्वरूप आले होते. बदलापूर दिशेकडील एक मार्ग पूर्णपणे बंद करण्याची वेळ वाहतूक विभागावर आली होती. तर दुसऱ्या मार्गिकेवरून संथ गतीने वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती.

पाण्याचा प्रवाह एवढा जास्त होता की या पाण्यात काही वाहने बंद देखील पडले होते. तर काही वाहनांनी या भर पाण्यातून मार्ग काढत बदलापूर गाठले. प्रत्येक पावसात हा राज्य महामार्ग बंद होत असला तरी यंदा या महामार्गावर तब्बल चार फुटावून अधिक पाणी साचल्याने प्रशासन किती कुचकामी आहे याचा प्रत्यय नागरिकांना अनुभवता आला.

टॅग्स :kalyanकल्याणRainपाऊस