शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं टम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
5
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
6
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
7
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
8
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
9
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
10
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
12
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
13
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
14
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
15
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
16
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
17
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
18
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
19
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
20
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल

कल्याण रेल्वे स्थानकात हरवलेली दागिन्यांची बॅग; अवघ्या अर्ध्यातासात पोलिसांनी लावला शोध

By मुरलीधर भवार | Updated: June 24, 2024 17:43 IST

तपोवन एक्सप्रेसने माहेरी परतत असलेल्या धनश्री धनवटे ही प्रवासी महिला तीन लाख रुपयांचे दागिने असलेली बॅग फलाटावर विसरली होती.

मुरलीधर भवार,कल्याण: तपोवन एक्सप्रेसने माहेरी परतत असलेल्या धनश्री धनवटे ही प्रवासी महिला तीन लाख रुपयांचे दागिने असलेली बॅग फलाटावर विसरली होती. कल्याण रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच दागिन्यांची हरवलेली बॅग शोधून पुन्हा त्यांना परत केली आहे.

डोंबिवली आजदेपाडा येथे राहणाऱ्या धनश्री धनवटे यांचा विवाह अहमदनगर येथे राहणारे आर्मी ऑफिसर मयूर धनवटे यांच्यासोबत झाला आहे. सध्या त्यांचे पती जम्मू येथे कर्तव्यावर आहेत. डोंबिवलीलतील माहेरी परतण्यासाठी काल सायंकाळी त्या अहमदनगरहून नाशिकला बसने आल्या. त्यानंतर संध्याकाळी ६:३० वाजता नाशिकहून तपोवन एक्सप्रेस रेल्वेने निघाल्या. त्या कल्याण रेल्वे स्थानकात रात्री ९;३० च्या सुमारास उतरल्या. त्यांच्याकडे दोन बॅगा होत्या. एका बॅगेमध्ये दागिने होते. त्यांनी कल्याण रेल्वे स्थानकातून डोंबिवली जाण्यासाठी गाडी पकडली. त्यानंतर त्यांच्या लक्षात आले. त्यांची एक बॅग दिसत नाही. ती कुठे विसरलो. हे देखील त्यांच्या लक्षात येत नव्हते. त्यांनी हा प्रकार त्यांच्या पतीला फोनवरुन सांगितला. त्यांनी धीर देत पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा सल्ला दिला. धनश्री यांनी रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस हवालदार विजय माने यांना फलट क्रमांक सहावर काळ्या रंगाची एक अनोळखी बॅग सापडली. तेव्हा त्यांनी याबाबतची माहिती फौजदार रोशनी तिरोले यांना फोनद्वारे कळून त्याचे फोटो त्यांच्या मोबाईलवर पाठवले. याच दरम्यान धनश्री तक्रार देण्यासाठी रेल्वे पोलीस ठाण्यात आल्या होत्या. त्यांना त्यांची हरवलेली दागिन्याची बॅग परत करण्यात आली. अवघ्या अर्ध्या तासातच बॅग परत मिळाल्याने धनश्री यांनी पोलिस व रेल्वे सुरक्षा बलाचे आभार मानले आहेत.

टॅग्स :kalyanकल्याणPoliceपोलिस