शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

टिटवाळ्यातील एकूण ३८ एकर भूखंडावर केडीएमसीने पाणी सोडले का? जागरुक नागरीक फाऊंडेशनचा सवाल

By मुरलीधर भवार | Updated: December 2, 2022 19:23 IST

टिटवाळ्यातील एकूण ३८ एकर भूखंडावर केडीएमसीने पाणी सोडले का असा प्रश्न जागरुक नागरीक फाऊंडेशने विचारला आहे. 

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मालकीचा ३८ एकर आरक्षित भूखंड हा साथरोग नियंत्रण रुग्णालय आणि मेडीकल कॉलेजसाठी आहे. या भूखंडावर महापालिका प्रशासनाने पाणी सोडले आहे का असा संतप्त सवाल जागरुक नागरीक फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आला आहे. जागरुक नागरीक फाऊंडेशन येत्या ५ डिसेंबरपासून विविध मागण्यासाठी पुन्हा एकदा बेमुदत उपोषण महापालिका मुख्यालयासमोर करणार असल्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.

फाऊंडेशनचे प्रमुख श्रीनिवास घाणेकर यांनी सांगितले की, सेवा नाही तर कर भरणार नाही असे आंदोलन जागरुक नागरीकतर्फे चालविले गेले. विविध १८ मागण्याकरीता मे २०१८ मध्ये उपोषण केले गेले. त्यावेळी भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांच्या मध्यस्थीने पाच दिवसानंतर उपोषण मागे घेतले गेले. मात्र आजपर्यंत या १८ मागण्यांची पूर्तता महापालिका प्रशासनाकडून करण्यात आली नाही. मध्यंतरी कोरोना महामारी होती. कोरोना हा साथीचा रोग होता. त्यावेळी महापालिकेकडे पुरेशी आरोग्य यंत्रणा नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली. त्याचवेळी टिटवाळा येथील आरक्षीत ३८ एकर भूखंड हा रुग्णालय आणि मेडिकल कॉलेजकरीता आहे. २०१८ साली ही मागणी करण्यात आली होती. कोरोना आला गेला तरी त्याठिकाणी साथरोग नियंत्रण रुग्णालय आणि मेडिकल कॉलेज उभारण्यात प्रशासनाकडून काही एक हालचाली नाहीत. त्यामुळे हा भूखंड भूमाफिया आणि अतिक्रमण करणा:यांकरीता मोकळा सोडून त्यावर महापालिकेने पाणी सोडले आहे का असा संतप्त सवाल घाणेकर यांनी उपस्थित केला आहे.

त्याचबरोबर महापालिकेने बिल्डरांकरीता ओपन लॅण्ड टॅक्सच्या दर कमी केले. मात्र सामन्यांचा मालमत्ता करात दर कमी केले नाहीत. शहरातील कचरा समस्या कायम आहे. वर्गीकरण केले जात नाही. प्रक्रिया योग्य प्रकारे केली जात नाही. रस्त्यावरील खड्डय़ांचा प्रश्न निकाली निघालेला नाही. पाणी वाटपाचा प्रश्न अनुत्तरीत आहे. महापालिकेने टीडीआर दिलेल्या भूखंडावर अतिक्रमण झाले आहे. अग्यार समितीने दिलेल्या अहवालानुसार महापालिका हद्दीतील ६८ हजार बेकायदा बांधकाम प्रकरणातील ७२ दोषींच्या विरोधात कारवाई केलेली नाही. या सगळया प्रश्नांवर ५ डिसेंबर रोजी जागरुक नागरीकतर्फे बेमुदत उपोषण केले जाणार आहे.

 

टॅग्स :kalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिका