शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"कोरोनात मेलो असतो तर बरे झाले असते"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2021 01:55 IST

कल्याणमधील रिक्षाचालकाची व्यथा; कमाई घटल्याने घरखर्च चालविणे कठीण

कल्याण : ‘दोन वेळच्या जेवणासाठी किराणा भरणे, घरखर्च चालविणे कठीण होऊन बसले आहे. रिक्षाव्यवसाय निम्म्यावर आला आहे. त्यामुळे कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा. पैसे उसने घेऊन किती दिवस चालणार,’ अशी व्यथा कल्याणमधील रिक्षाचालक पुरुषोत्तम सोनवणे यांनी मांडली आहे.सोनवणे यांनी सांगितलेली व्यथा ही त्यांच्या एकट्याचीच नाही. तर अन्य रिक्षाचालकही हीच गोष्ट सांगत आहेत. कोरोना काळात मार्च ते जूनदरम्यान रिक्षा बंद असल्याने रिक्षाचालक घरीच होते. अनलॉकमध्ये रिक्षा सुरू झाल्या असल्या तरी त्यासाठी नियमावली होती. दोन प्रवासी घेऊन जाताना भाड्यासाठी कसरत करावी लागत होती. मुलांचे शिक्षण कोरोना काळात ऑनलाइनद्वारे होते. आता शाळा सुरू झाल्याने मुलांची फी भरण्यासाठी शाळांकडून विचारणा केली जात आहे. त्यातच विजेचे वाढीव बिल आले आहे. ते कुठून भरायचे, असा प्रश्न आहे, असे ते म्हणाले.अनलॉकमध्ये रिक्षा चालविणे जिकिरीचे होते. त्यानंतर आता लोकलसेवा सुरू झाली आहे. सर्वसामान्य प्रवाशांसाठी रेल्वेने वेळ ठरवून दिली आहे. त्यामुळे रिक्षाचालकांना अपेक्षित प्रवासी भाडी मिळत नाहीत. त्यामुळे एक तास रिक्षाच्या रांगेत उभे राहून एक भाडे मिळते. रात्री ९ नंतर तर भाडे मिळत नाही. दुपारी घरी जेवायला जावे, तर आर्थिक विवंचनेमुळे भाकरीचा घास गळ्याच्या खाली उतरत नाही. पैसा कुठून आणायचा. कोरोनात मेलो असतो तर बरे झाले असते. ही विवंचना संपली असती, असे सांगताना सोनवणे यांच्या  डोळ्यात पाणी आले.‘मदतीचा हात द्या’रिक्षाचालकांना दिलासा देण्यासाठी लोकल सेवेचे वेळापत्रक बदलले जावे. तसेच रिक्षाचालकांना सरकारने मदतीचा हात दिला पाहिजे. रिक्षाचालकांच्या कल्याणकारी योजनेसाठी जो निधी ठेवला होता, तो खर्च केला पाहिजे, अशी मागणी रिक्षाचालकांकडून केली जात आहे.