शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
5
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
6
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
7
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
8
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
9
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
10
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
11
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
12
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
13
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
14
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
15
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
16
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
17
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
18
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
19
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
20
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन

तुरुंगात होतो तेच बरे होते, जेवण तरी मिळायचे; बलात्काराच्या आरोपात निर्दोष सुटलेल्या आरोपीची व्यथा

By मुरलीधर भवार | Updated: June 18, 2024 13:46 IST

एका महिलेच्या मुलीला कामाला लावतो, असे आमिष दाखवून जयसिंग यांनी बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला. 

मुरलीधर भवार, कल्याण : 'तो' उल्हासनगरच्या लोकमत न्यूज नेटवर्क कामगार रुग्णालयात सफाई कामगार म्हणून कार्यरत होता. त्याच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आणि त्याला अटक झाली. त्याची रवानगी आधारवाडी कारागृहात झाली. त्याला सात वर्षांची शिक्षा झाली. शिक्षा भोगून झाल्यावर त्याच्यावर असलेल्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाली. न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगल्याने त्याचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. कारागृहात गेल्याने कुटुंबाने त्याची साथ सोडली. कारागृहात होतो तेच बरे होते. दोन वेळच्या जेवणासह चहा, नाश्त्याची सोय होती, अशी व्यथा सात वर्षे सात महिने कारागृहात राहून निर्दोष सुटलेल्या जयसिंग भास्कर (६५) यांनी 'लोकमत'कडे मांडली. उल्हासनगरातील टिळकनगरात जयसिंग राहत होते. एका महिलेच्या मुलीला कामाला लावतो, असे आमिष दाखवून जयसिंग यांनी बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला. 

या प्रकरणी पीडितेने पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज केला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून जयसिंग यांना २६ जून २०१६ रोजी अटक केली. जामीन न मिळाल्याने जयसिंग यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली. त्यांच्यावर जे आरोप ठेवण्यात आले होते, त्यासाठी सात वर्षे शिक्षेची तरतूद होती. ते न्यायालयीन कोठडीत असतानाच अॅड. गणेश घोलप यांची कारागृहात त्या ंच्याशी ओळख झाली. जयसिंग यांनी घोलप यांना सर्व हकिकत सांगितली आणि या प्रकरणाला कलाटणी मिळाली.

अटकेमुळे निवृत्तीच्या वेतनापासून वंचित

अटक झाल्यामुळे जयसिंग यांना निवृत्तीचे वेतन मिळाले नाही. त्यांचे थकीत आणि सेवानिवृत्तीच्या वेतनासाठी अॅड. घोलप कामगार आयुक्त आणि औद्योगिक न्यायालयात पाठपुरावा करत आहेत. कारागृहातून बाहेर आल्यावर जयसिंग यांना मित्राने आधार दिला आहे. ते दहा रुपयांची शिवभोजन थाळी खाऊन दिवस काढतात.

त्यांचीही झाली निर्दोष मुक्तता...

जयसिंग यांच्याप्रमाणेच विपुल नारकर, शत्रुघ्न चव्हाण, सागर रक्षे, मणिकंडन नाडर, वामन वाघे, सुरेश खाडे आणि सलीम शेख यांच्यावरही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले होते. गुन्ह्यातील शिक्षा भोगून झाल्यावर त्यांचीही निर्दोष मुक्तता झाली आहे. या प्रकरणांमध्येही अॅड. घोलप यांनीच कामकाज पाहिले.

गुन्हा घडलाच नव्हता, वैद्यकीय अहवाल शून्य होता

या प्रकरणाची न्यायालयात  सुनावणी होत नव्हती तर दुसरीकडे जयसिंग यांच्यावरील आरोपानुसार ७ वर्षांची शिक्षा त्यांनी आरोप सिद्ध होण्यापूर्वीच भोगली. या घटनेचा वैद्यकीय अहवाल शून्य होता. 

या प्रकरणात कल्याण जिल्हा सत्र न्यायाधीश अमोल हरणे यांनी अॅड. घोलप यांची नियुक्ती केली. घोलप यांनी पीडिता, तिची मैत्रीण, साक्षी-पुरावे तपासून सर्व न्यायालयापुढे मांडले.

या घटनेचा वैद्यकीय अहवाल शून्य होता. जयसिंग पीडितेस कधीच भेटले नव्हते. त्यांच्यात बोलणेही झाले नव्हते.

न्यायाधीश हरणे यांच्यासमोर साक्षीपुरावे आल्यानंतर जयसिंगची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

 

 

टॅग्स :kalyanकल्याण