शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

तुरुंगात होतो तेच बरे होते, जेवण तरी मिळायचे; बलात्काराच्या आरोपात निर्दोष सुटलेल्या आरोपीची व्यथा

By मुरलीधर भवार | Updated: June 18, 2024 13:46 IST

एका महिलेच्या मुलीला कामाला लावतो, असे आमिष दाखवून जयसिंग यांनी बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला. 

मुरलीधर भवार, कल्याण : 'तो' उल्हासनगरच्या लोकमत न्यूज नेटवर्क कामगार रुग्णालयात सफाई कामगार म्हणून कार्यरत होता. त्याच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आणि त्याला अटक झाली. त्याची रवानगी आधारवाडी कारागृहात झाली. त्याला सात वर्षांची शिक्षा झाली. शिक्षा भोगून झाल्यावर त्याच्यावर असलेल्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाली. न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगल्याने त्याचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. कारागृहात गेल्याने कुटुंबाने त्याची साथ सोडली. कारागृहात होतो तेच बरे होते. दोन वेळच्या जेवणासह चहा, नाश्त्याची सोय होती, अशी व्यथा सात वर्षे सात महिने कारागृहात राहून निर्दोष सुटलेल्या जयसिंग भास्कर (६५) यांनी 'लोकमत'कडे मांडली. उल्हासनगरातील टिळकनगरात जयसिंग राहत होते. एका महिलेच्या मुलीला कामाला लावतो, असे आमिष दाखवून जयसिंग यांनी बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला. 

या प्रकरणी पीडितेने पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज केला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून जयसिंग यांना २६ जून २०१६ रोजी अटक केली. जामीन न मिळाल्याने जयसिंग यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली. त्यांच्यावर जे आरोप ठेवण्यात आले होते, त्यासाठी सात वर्षे शिक्षेची तरतूद होती. ते न्यायालयीन कोठडीत असतानाच अॅड. गणेश घोलप यांची कारागृहात त्या ंच्याशी ओळख झाली. जयसिंग यांनी घोलप यांना सर्व हकिकत सांगितली आणि या प्रकरणाला कलाटणी मिळाली.

अटकेमुळे निवृत्तीच्या वेतनापासून वंचित

अटक झाल्यामुळे जयसिंग यांना निवृत्तीचे वेतन मिळाले नाही. त्यांचे थकीत आणि सेवानिवृत्तीच्या वेतनासाठी अॅड. घोलप कामगार आयुक्त आणि औद्योगिक न्यायालयात पाठपुरावा करत आहेत. कारागृहातून बाहेर आल्यावर जयसिंग यांना मित्राने आधार दिला आहे. ते दहा रुपयांची शिवभोजन थाळी खाऊन दिवस काढतात.

त्यांचीही झाली निर्दोष मुक्तता...

जयसिंग यांच्याप्रमाणेच विपुल नारकर, शत्रुघ्न चव्हाण, सागर रक्षे, मणिकंडन नाडर, वामन वाघे, सुरेश खाडे आणि सलीम शेख यांच्यावरही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले होते. गुन्ह्यातील शिक्षा भोगून झाल्यावर त्यांचीही निर्दोष मुक्तता झाली आहे. या प्रकरणांमध्येही अॅड. घोलप यांनीच कामकाज पाहिले.

गुन्हा घडलाच नव्हता, वैद्यकीय अहवाल शून्य होता

या प्रकरणाची न्यायालयात  सुनावणी होत नव्हती तर दुसरीकडे जयसिंग यांच्यावरील आरोपानुसार ७ वर्षांची शिक्षा त्यांनी आरोप सिद्ध होण्यापूर्वीच भोगली. या घटनेचा वैद्यकीय अहवाल शून्य होता. 

या प्रकरणात कल्याण जिल्हा सत्र न्यायाधीश अमोल हरणे यांनी अॅड. घोलप यांची नियुक्ती केली. घोलप यांनी पीडिता, तिची मैत्रीण, साक्षी-पुरावे तपासून सर्व न्यायालयापुढे मांडले.

या घटनेचा वैद्यकीय अहवाल शून्य होता. जयसिंग पीडितेस कधीच भेटले नव्हते. त्यांच्यात बोलणेही झाले नव्हते.

न्यायाधीश हरणे यांच्यासमोर साक्षीपुरावे आल्यानंतर जयसिंगची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

 

 

टॅग्स :kalyanकल्याण