शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

आमदार, मंत्री रुळावर आले हे बरच झालं : राजू पाटील 

By अनिकेत घमंडी | Updated: July 8, 2024 19:48 IST

रेल्वेचे मुंबईसाठी स्वतंत्र बोर्ड असावे जेणेकरून इथले निर्णय इथेच होतील असेही त्यांनी सांगितले.  

डोंबिवली : मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध भागात बरसणाऱ्या तुफान पावसाचा फटका फक्त सर्वसामान्यांनाच नाही, तर लोकप्रतिनिधींनाही बसला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना मनसे आमदार राजू पाटील म्हणाले की, बरच झालं आमदार, मंत्री रेल्वे रुळात अडकले, वाहतूक कोंडीत फसले, निदान आता तरी राज्य शासनाला कळेल की समांतर रस्त्याची मनसेची मागणी किती योग्य आहे, होती. 

तसेच रेल्वेचे मुंबईसाठी स्वतंत्र बोर्ड असावे जेणेकरून इथले निर्णय इथेच होतील असेही त्यांनी सांगितले.  पावसाळी अधिवेशनासाठी निघालेले आमदार आणि मंत्रीच ट्रेनमध्ये अडकले. अखेर रेल्वे रुळांवरुन पायी वाट काढत त्यांना पुढचा प्रवास करावा लागत आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेवरील आमदार अमोल मिटकरी आणि मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांना रेल्वे रुळांवर पायी जावं लागलं. 

यावरच मनसे आमदार राजू पाटील यांनी आपली प्रतिक्रिया देत सांगितले की, आमदार रुळावर आले हे बरं झालं असल्याचा टोला पाटील यांनी लगावला. रेल्वे समांतर रस्ता व्हावा अशी मागणी अनेक वर्षापासून होत आहे. मी ही पाठपुरावा करत होतो, मात्र मागणी पूर्ण होताना दिसत नाही. रेल्वेच्या बाजूने एक पर्यायी मार्ग असायला पाहिजे. महाराष्ट्र हे देशातला एक नंबरच राज्य आहॆ, मात्र दरवेळेस वेळेस रेल्वेचा प्रॉब्लेम येत असल्याने महाराष्ट्रासाठी स्वतंत्र रेल्वे बोर्ड असायला हवे, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. 

रेल्वे समांतर रस्ता हवा ही मागणी मनसेची असून दिवंगत आमदार हरिश्चंद्र पाटील यांनी ते महापौर, आमदार असताना सर्वप्रथम कल्याण डोंबिवली रेल्वे समांतर रस्ता अस्तित्वात आणला, त्याचा वापर सत्ताधार्यांना करता येत नाही हे दुर्दैव आहे म्हणा, आर्थिक विषयावर सगळे अडकले असल्याची टीका त्यांनी केली. 

टॅग्स :Raju Patilराजू पाटीलdombivaliडोंबिवली