शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

आमदार, मंत्री रुळावर आले हे बरच झालं : राजू पाटील 

By अनिकेत घमंडी | Updated: July 8, 2024 19:48 IST

रेल्वेचे मुंबईसाठी स्वतंत्र बोर्ड असावे जेणेकरून इथले निर्णय इथेच होतील असेही त्यांनी सांगितले.  

डोंबिवली : मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध भागात बरसणाऱ्या तुफान पावसाचा फटका फक्त सर्वसामान्यांनाच नाही, तर लोकप्रतिनिधींनाही बसला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना मनसे आमदार राजू पाटील म्हणाले की, बरच झालं आमदार, मंत्री रेल्वे रुळात अडकले, वाहतूक कोंडीत फसले, निदान आता तरी राज्य शासनाला कळेल की समांतर रस्त्याची मनसेची मागणी किती योग्य आहे, होती. 

तसेच रेल्वेचे मुंबईसाठी स्वतंत्र बोर्ड असावे जेणेकरून इथले निर्णय इथेच होतील असेही त्यांनी सांगितले.  पावसाळी अधिवेशनासाठी निघालेले आमदार आणि मंत्रीच ट्रेनमध्ये अडकले. अखेर रेल्वे रुळांवरुन पायी वाट काढत त्यांना पुढचा प्रवास करावा लागत आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेवरील आमदार अमोल मिटकरी आणि मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांना रेल्वे रुळांवर पायी जावं लागलं. 

यावरच मनसे आमदार राजू पाटील यांनी आपली प्रतिक्रिया देत सांगितले की, आमदार रुळावर आले हे बरं झालं असल्याचा टोला पाटील यांनी लगावला. रेल्वे समांतर रस्ता व्हावा अशी मागणी अनेक वर्षापासून होत आहे. मी ही पाठपुरावा करत होतो, मात्र मागणी पूर्ण होताना दिसत नाही. रेल्वेच्या बाजूने एक पर्यायी मार्ग असायला पाहिजे. महाराष्ट्र हे देशातला एक नंबरच राज्य आहॆ, मात्र दरवेळेस वेळेस रेल्वेचा प्रॉब्लेम येत असल्याने महाराष्ट्रासाठी स्वतंत्र रेल्वे बोर्ड असायला हवे, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. 

रेल्वे समांतर रस्ता हवा ही मागणी मनसेची असून दिवंगत आमदार हरिश्चंद्र पाटील यांनी ते महापौर, आमदार असताना सर्वप्रथम कल्याण डोंबिवली रेल्वे समांतर रस्ता अस्तित्वात आणला, त्याचा वापर सत्ताधार्यांना करता येत नाही हे दुर्दैव आहे म्हणा, आर्थिक विषयावर सगळे अडकले असल्याची टीका त्यांनी केली. 

टॅग्स :Raju Patilराजू पाटीलdombivaliडोंबिवली