शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
3
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
4
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
5
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
6
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
7
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
8
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
9
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
10
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
11
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले १३ हजार अश्लील फोटो, मुंबई पोलिसांनाही बसला धक्का
12
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
13
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
14
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
15
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
16
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
17
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
18
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
19
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
20
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या

भारत देश तुटलेला नसताना जोडायला निघाले आणि आता हात कुठे जोडणार ?, केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील यांचा सवाल

By मुरलीधर भवार | Updated: January 24, 2023 19:18 IST

त्यांना कशाचा हात कुठे जोडायचा याचे उत्तर ते देऊ शकत नाहीत. सगळे नवीनच काहीतरी. भारत देश तुटलेला नसताना जोडायला निघाले आणि आता हात जाेडाे अभियान राबविणार आहेत.

कल्याण- त्यांना कशाचा हात कुठे जोडायचा याचे उत्तर ते देऊ शकत नाहीत. सगळे नवीनच काहीतरी. भारत देश तुटलेला नसताना जोडायला निघाले आणि आता हात जाेडाे अभियान राबविणार आहेत. तर हात कुठे जोडणार ? असा सवाल केंद्रिय मंत्री कपिल पाटील यांनी उपस्थित केला आहे. केंद्रीय मंत्री पाटील आज कल्याणमध्ये एका खाजगी कार्यक्रमानिमित्त आले होते. यावेळी त्यांनी उपराेक्त टिका काॅंग्रेसच्या भारत जाेडाे आंदाेलनावर केली. भारत जाेडाे आंदाेलनासह आत्ता नव्याने सुरु करण्यात येणाऱ्या काॅंग्रेसच्या हात जाेडाे आंदाेलनाची पाटील यांनी खिल्ली उडविली.

सपाचे नेते स्वामीप्रसाद मौर्या यांनी रामचरित मानस तुळशीदासचे रामायण बॅन करा असे वादग्रस्त विधान केले होते यावर मंत्री पाटील यांनी त्यांच्या या विधानाला त्यांच्या पक्षाने देखील पाठिबा दिलेला नसून ते त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. वास्तविक रामचरित मानस भारतातल्या प्रत्येक माणसाच्या हृदयात भिनलेले आहे. रामायण टीव्हीवर लागताच रस्ते सुनसान व्हायचे. ५ हजार वर्षापूर्वीची पुराणातली देवाची परंपरा त्याद्वारे उभी केली आहे. आमच्या ह्रदयात राम वसलेले आहेत. त्यांच्या बद्दल असे वक्तव्य करणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

संजय राऊत यांच्या शिवसेना वंचितच्या आघाडीवर चार चाकाची वेगवान गाडी असे बालेले जात आहे. त्यावर मंत्री पाटील यांनी वंचितच्या नेत्यांनी अद्यापि आपले कॉंगेस आघाडीबरोबर बोलणे व्हायचे असल्याचे म्हटल्याची आठवण देत वंचित आघाडीबरोबर युती म्हणजे अजूनही दोनच चाके आहेत, ती तीन सुद्धा झालेली नाहीत. आघाडीचा याबाबतचा निर्णय झालेला नसताना घोषणा कशाला ? असा याकडे पाटील यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :kalyanकल्याण