शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

भारत देश तुटलेला नसताना जोडायला निघाले आणि आता हात कुठे जोडणार ?, केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील यांचा सवाल

By मुरलीधर भवार | Updated: January 24, 2023 19:18 IST

त्यांना कशाचा हात कुठे जोडायचा याचे उत्तर ते देऊ शकत नाहीत. सगळे नवीनच काहीतरी. भारत देश तुटलेला नसताना जोडायला निघाले आणि आता हात जाेडाे अभियान राबविणार आहेत.

कल्याण- त्यांना कशाचा हात कुठे जोडायचा याचे उत्तर ते देऊ शकत नाहीत. सगळे नवीनच काहीतरी. भारत देश तुटलेला नसताना जोडायला निघाले आणि आता हात जाेडाे अभियान राबविणार आहेत. तर हात कुठे जोडणार ? असा सवाल केंद्रिय मंत्री कपिल पाटील यांनी उपस्थित केला आहे. केंद्रीय मंत्री पाटील आज कल्याणमध्ये एका खाजगी कार्यक्रमानिमित्त आले होते. यावेळी त्यांनी उपराेक्त टिका काॅंग्रेसच्या भारत जाेडाे आंदाेलनावर केली. भारत जाेडाे आंदाेलनासह आत्ता नव्याने सुरु करण्यात येणाऱ्या काॅंग्रेसच्या हात जाेडाे आंदाेलनाची पाटील यांनी खिल्ली उडविली.

सपाचे नेते स्वामीप्रसाद मौर्या यांनी रामचरित मानस तुळशीदासचे रामायण बॅन करा असे वादग्रस्त विधान केले होते यावर मंत्री पाटील यांनी त्यांच्या या विधानाला त्यांच्या पक्षाने देखील पाठिबा दिलेला नसून ते त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. वास्तविक रामचरित मानस भारतातल्या प्रत्येक माणसाच्या हृदयात भिनलेले आहे. रामायण टीव्हीवर लागताच रस्ते सुनसान व्हायचे. ५ हजार वर्षापूर्वीची पुराणातली देवाची परंपरा त्याद्वारे उभी केली आहे. आमच्या ह्रदयात राम वसलेले आहेत. त्यांच्या बद्दल असे वक्तव्य करणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

संजय राऊत यांच्या शिवसेना वंचितच्या आघाडीवर चार चाकाची वेगवान गाडी असे बालेले जात आहे. त्यावर मंत्री पाटील यांनी वंचितच्या नेत्यांनी अद्यापि आपले कॉंगेस आघाडीबरोबर बोलणे व्हायचे असल्याचे म्हटल्याची आठवण देत वंचित आघाडीबरोबर युती म्हणजे अजूनही दोनच चाके आहेत, ती तीन सुद्धा झालेली नाहीत. आघाडीचा याबाबतचा निर्णय झालेला नसताना घोषणा कशाला ? असा याकडे पाटील यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :kalyanकल्याण