शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

रस्ते बाधितांच्या घरासाठी जागरुक नागरीक फाऊंडेशनचे केडीएमसीसमोर बेमुदत उपोषण

By मुरलीधर भवार | Updated: February 12, 2024 14:06 IST

फाऊंडेशनचे प्रमुख घाणेकर यांनी सांगितले की, महापालिका मुख्यालय ते बाजारपेठ रस्त्याचे २००० साली रुंदीकरण करण्यात आले.

कल्याण- कल्याण डोंबिवली महापालिका ते बाजारपेठ रस्त्यात २४ वर्षापूर्वी बाधित झालेल्यांचे पुनर्वसन करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र त्या आदेशाची अंमलबजावणी महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही. या मागणीसाठी जागरुक नागरीक फाऊंडेशनच्या वतीने सात वेळा उपोषण  आणि धरणे आंदोलन करण्यात आले. तरी देखील महापालिका प्रशासनाकडून त्याची पूर्तता केली जात नाही. जोपर्यंत बाधिताचे पुनर्वसन केल जात नाही. तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा इशारा फाऊंडेशनच प्रमुख श्रीनिवास घाणेकर यांनी महापालिका प्रशासनास दिला आहे. आजपासून महापालिका मुख्यालयासमोर फाऊंडेशने बेमुदत उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या उपोषणास म्युन्सीपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाळ हरदास यांनी पाठिंबा दिला आहे.

फाऊंडेशनचे प्रमुख घाणेकर यांनी सांगितले की, महापालिका मुख्यालय ते बाजारपेठ रस्त्याचे २००० साली रुंदीकरण करण्यात आले. या रस्ता रुंदीकरणात १५४ जण बाधित झाले हाेते. बाधितांची घरे आणि दुकाने रस्ता रुंदीकरणात तोडण्यात आली होती. त्यांच्या पुनर्वसनाची मागणी करण्यात आली होती. तत्कालीन आयुक्तांनी त्या मागणीची दखल घेतली नाही. महापालिकेच्या कारवाईच्या विरोधात रस्ते बाधितांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने त्यावर महापालिकेस आदेस दिले होते की, बाधितांना घरे दिली जावीत. ती कोणत्या ठिकाणी द्यावीत. त्याचे किती वेळेत पुनर्वसन करावे  हे देखील सांगितले होते. महापालिकेने २४ वर्षे उलटून गेली तरी न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केली नाही. तसेच बाधितांना घरे दिली नाहीत. आज महापालिका मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापालिकेच्या रस्ते प्रकल्पात बाधितांना बीएसयूपी योजनेतील घरे वाटप करण्यात येणार आहेत. महापालिकेने रस्ते प्रकल्पातील बाधितांना घरे देण्याच्या कार्यक्रमास फाऊंडेशनचा विरोध नाही. मात्र २४ वर्षापूर्वी रस्ते प्रकल्पात बाधित झालेल्याना पुनर्वसनापासून वंचित ठेवणे. त्याना घरे न देणे, न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणे या बाबी गंभीर आहे. महापालिकेची कृती बाजारपेठ रस्ते बाधितांवर अन्याय करणारी आणि दुजाभाव दर्शविणारी असल्याचा आरोप घाणेकर यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी आमच्या उपोषणाला भेट दिली तर त्यांना ही बाब सांगूच पण महापालिका प्रशासनाने आमच्या उपोषणाची दखल घेऊन प्रश्न मार्गी लावला नाही तर उपोषण मागे घेतले जाणार नाही असे घाणेकर यांनी सांगितले.माहिती अधिकार कार्यकर्ते विनोद तिवारी यांनीही महापालिका मुख्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. बेकायदा बांधकाम प्रकरणात आणि बेकायदा होर्डिंग प्रकरणात दाखल याचिका करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी उच्च न्यायालयाने महापालिकेस दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी केली जात नाही. न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी न केल्या प्रकरणी महापालिका अधिकाऱ््यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात यावेत.  या मागणीकरीता तिवारी यांनी उपोषण सुरु केले आहे.

टॅग्स :kalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिका