शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

१४ गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करा, सर्व पक्षीय विकास समितीच्या मागणीला मनसेचा पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2021 16:41 IST

MNS News : १४ गावांचा विकास झालेला नसल्याने पाच ग्रामपंचायती अंतर्गत येणा-या १४ गावांनी ग्रामपंचायत निवडणूकीवर बहिष्कार टाकला आहे.

कल्याण-१४ गावे यापूर्वी नवी मुंबई महापालिकेत होती. ही गावे पुन्हा नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्याची मागणी सर्व पक्षीय विकास समितीच्या वतीने काल पुन्हा एकदा करण्यात आली आहे. या मागणीस मनसेने जाहिर पाठिंबा दिला असून मनसेचे आमदार राजू पाटील यांनी ही मागणी सरकार दरबारी मांडली जाईल असे आश्वासन १४ गावातील ग्रामस्थांना दिले आहे.१४ गावांचा विकास झालेला नसल्याने पाच ग्रामपंचायती अंतर्गत येणा:या १४ गावांनी ग्रामपंचायत निवडणूकीवर बहिष्कार टाकला आहे. सर्व पक्षीय विकास समितीने हा बहिष्काराचा निर्णय घेतला होता. बहिष्कार यशस्वी झाला आहे. त्या पाश्र्वमीवर दहिसर येथे काशी विश्वेश्वर मंदिरात १४ गावांची एक बैठक पार पडली. या बैठकीस आमदार पाटील हे उपस्थित होते. त्याचबरोबर सर्व पक्षीय विकास समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील हे उपस्थित होते. यावेळी १४ गावातील खासदार, आमदार आमचे असताना गावे महापालिकेत समाविष्ट केली जात नाही. यावर ग्रामस्थांनी जोर दिला. या गावांच्या विकासाकरीता ही गावे नवी मुंबईत समाविष्ट केली जावीत. ही गावे महापालिकेत समाविष्ट न करण्यामागचे सबळ कारण कोणी तरी द्यावे असा सवालही यावेळी आमदार पाटील यांनी उपस्थित केला. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते आहे. त्यामुळे त्यांना हा निर्णय घेणे सहज शक्य आहे. २७ गावे समाविष्ट करण्याचा ठराव नसताना ही गावे कल्याण डोंबिनलीत समाविष्ट केली. मात्र १४ गावच्या ग्रामपंचायतीनी ठराव करुन त्यांना नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्याची मागणी केली आहे. नवी मुंबई महापालिकेचाही अशासकीय ठराव आहे. मग ही गावे महापालिकेत समाविष्ट केला केली जात नाही  हा गावे महापालिकेत समाविष्ट करण्याची मागणी राज्य सरकार दरबारी लावून धरणार असून त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली जाणार असल्याचे आश्वासन आमदार पाटील यांनी ग्रामस्थांना दिले आहे.सर्व पक्षीय विकास समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी सांगितले की, ग्रामपंचायत निवडणूकीवर तीन वेळा बहिष्कार टाकला आहे. बहिष्कार यशस्वी झाला आहे. त्यामुळे १४ गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा. 

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीNavi Mumbaiनवी मुंबईMNSमनसे