शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत पहिल्या विधी महाविद्यालयाचा शुभारंभ; ६० विद्यार्थी क्षमता असलेले कॉलेज

By अनिकेत घमंडी | Updated: October 19, 2023 15:46 IST

राज्याच्या विविध भागातील ६४ ठिकाणी नव्याने न्यायालये उभी राहत आहेत.

डोंबिवली: राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या पुढाकाराने डोंबिवलीत कायद्याचे शिक्षण देणारे विधी महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. या विधी महाविद्यालयाचे उद्घाटन बुधवारी करण्यात आले. ६० विद्यार्थ्यांची क्षमता असणारे हे कल्याण, डोंबिवली परिसरातील पहिले विधी महाविद्यालय आहे. राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या डोंबिवली पूर्वेतील दत्तनगर मधील स्वामी विवेकानंद शाळेच्या इमारतीत हे महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे.

या महाविद्यालयाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डाॅ. रवींद्र कुलकर्णी, संस्था अध्यक्ष संजय कुलकर्णी, कार्यवाह शिरीष फडके यांच्या उपस्थितीत झाले. महाराष्ट्र शासन, भारतीय विधिज्ञ परिषद यांच्या मान्यतेने विधी महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. हे महाविद्यालय मुंबई विद्यापीठाशी संलग्नित असणार आहे. कल्याण न्यायालय सुविधांच्या बाबतीत गैरसोयीचे झाले आहे. वकिल, आशिलांची संख्या वाढतेय त्याप्रमाणात न्यायालयाच्या वास्तुत पुरेशा सुविधा नाहीत. वकील, आशिलांना न्यायालय आवारात वाहने उभी करण्यास पुरेशी जागा नाही. अशीच परिस्थिती भिवंडी न्यायालयाची आहे.

राज्याच्या विविध भागातील ६४ ठिकाणी नव्याने न्यायालये उभी राहत आहेत. कल्याण न्यायालयाची इमारत भूस्तरावर वाढू शकत नाही. सार्वजनिक बांधकाम खाते आपणाकडे आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कल्याण न्यायालयाच्या विस्तारासाठी अनुकूल आहेत. तेव्हा कल्याण न्यायालयातील वकिलांनी नवीन इमारत उभारण्याचा प्रस्ताव दिला तर त्याचा प्राधान्याने विचार केला जाईल, असे आश्वासन मंत्री चव्हाण यांनी उपस्थित वकील संघटनेच्या पदाधिकऱ्यांना दिले. ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात बहुशाखा शिक्षण पद्धती आहे. त्यामुळे वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी कायद्याच्या अभ्यासा बरोबर डिजिटल, कृत्रिम बुध्दिमत्तेचे शिक्षण घेण्यासाठी पुढाकार घ्यावा.

स्वामी विवेकानंद यांच्या नावाने चालणाऱ्या या संस्थेत नक्कीच विद्यार्थ्यांना सचोटीचे धडे मिळतील. कायद्याचे ज्ञान घेऊन बाहेर पडलेले या महाविद्यालयातील विद्यार्थी ताठ बाण्याने समाजाचे, अन्याय-अत्याचाराचे, शहर हिताचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतील,’ असा विश्वास कुलगुरू डाॅ. कुलकर्णी यांनी व्यक्त केला. डोबिवलीत व्यवस्थापन, क्रीडा, कला महाविद्यालय सुरू करण्याची गरज आहे, असे अध्यक्ष संजय कुलकर्णी यांनी सांगितले. विनाअडथळा मंत्री चव्हाण यांच्या प्रयत्नाने या महाविद्यालयाला परवानगी मिळाल्याचे, प्रवेश पूर्ण झाल्याचे अध्यक्ष कुलकर्णी यांनी सांगितले. सूत्रसंचालन प्रा. डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई यांनी केले