शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

डोंबिवलीत पहिल्या विधी महाविद्यालयाचा शुभारंभ; ६० विद्यार्थी क्षमता असलेले कॉलेज

By अनिकेत घमंडी | Updated: October 19, 2023 15:46 IST

राज्याच्या विविध भागातील ६४ ठिकाणी नव्याने न्यायालये उभी राहत आहेत.

डोंबिवली: राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या पुढाकाराने डोंबिवलीत कायद्याचे शिक्षण देणारे विधी महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. या विधी महाविद्यालयाचे उद्घाटन बुधवारी करण्यात आले. ६० विद्यार्थ्यांची क्षमता असणारे हे कल्याण, डोंबिवली परिसरातील पहिले विधी महाविद्यालय आहे. राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या डोंबिवली पूर्वेतील दत्तनगर मधील स्वामी विवेकानंद शाळेच्या इमारतीत हे महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे.

या महाविद्यालयाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डाॅ. रवींद्र कुलकर्णी, संस्था अध्यक्ष संजय कुलकर्णी, कार्यवाह शिरीष फडके यांच्या उपस्थितीत झाले. महाराष्ट्र शासन, भारतीय विधिज्ञ परिषद यांच्या मान्यतेने विधी महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. हे महाविद्यालय मुंबई विद्यापीठाशी संलग्नित असणार आहे. कल्याण न्यायालय सुविधांच्या बाबतीत गैरसोयीचे झाले आहे. वकिल, आशिलांची संख्या वाढतेय त्याप्रमाणात न्यायालयाच्या वास्तुत पुरेशा सुविधा नाहीत. वकील, आशिलांना न्यायालय आवारात वाहने उभी करण्यास पुरेशी जागा नाही. अशीच परिस्थिती भिवंडी न्यायालयाची आहे.

राज्याच्या विविध भागातील ६४ ठिकाणी नव्याने न्यायालये उभी राहत आहेत. कल्याण न्यायालयाची इमारत भूस्तरावर वाढू शकत नाही. सार्वजनिक बांधकाम खाते आपणाकडे आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कल्याण न्यायालयाच्या विस्तारासाठी अनुकूल आहेत. तेव्हा कल्याण न्यायालयातील वकिलांनी नवीन इमारत उभारण्याचा प्रस्ताव दिला तर त्याचा प्राधान्याने विचार केला जाईल, असे आश्वासन मंत्री चव्हाण यांनी उपस्थित वकील संघटनेच्या पदाधिकऱ्यांना दिले. ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात बहुशाखा शिक्षण पद्धती आहे. त्यामुळे वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी कायद्याच्या अभ्यासा बरोबर डिजिटल, कृत्रिम बुध्दिमत्तेचे शिक्षण घेण्यासाठी पुढाकार घ्यावा.

स्वामी विवेकानंद यांच्या नावाने चालणाऱ्या या संस्थेत नक्कीच विद्यार्थ्यांना सचोटीचे धडे मिळतील. कायद्याचे ज्ञान घेऊन बाहेर पडलेले या महाविद्यालयातील विद्यार्थी ताठ बाण्याने समाजाचे, अन्याय-अत्याचाराचे, शहर हिताचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतील,’ असा विश्वास कुलगुरू डाॅ. कुलकर्णी यांनी व्यक्त केला. डोबिवलीत व्यवस्थापन, क्रीडा, कला महाविद्यालय सुरू करण्याची गरज आहे, असे अध्यक्ष संजय कुलकर्णी यांनी सांगितले. विनाअडथळा मंत्री चव्हाण यांच्या प्रयत्नाने या महाविद्यालयाला परवानगी मिळाल्याचे, प्रवेश पूर्ण झाल्याचे अध्यक्ष कुलकर्णी यांनी सांगितले. सूत्रसंचालन प्रा. डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई यांनी केले