शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बेकायदा बांधकाम प्रकरणी कॅगकडून लेखा परिक्षण करण्यात यावे, हजारो कोटी रुपयाची बुडीत रक्कम निश्चीत करावी

By मुरलीधर भवार | Updated: December 6, 2022 16:42 IST

बुडीत रक्कम निश्चीत करुन विभागनिहाय संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्यात यावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते कौस्तूभ गोखले यांनी राज्याच्या प्रधान सचिवांसह नगरविकास विभागाकडे केली आहे.

कल्याण - कल्याण डोंबिवलीत करण्यात आलेल्या बेकायदा बांधकामामुळे सरकारचा हजारो कोटी रुपयांचा महसूल बुडाला आहे. बेकायदा बांधकाम प्रकरणी कॅगकडून लेखा परिक्षण करण्यात यावे. बुडीत रक्कम निश्चीत करुन विभागनिहाय संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्यात यावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते कौस्तूभ गोखले यांनी राज्याच्या प्रधान सचिवांसह नगरविकास विभागाकडे केली आहे.

महापालिका हद्दीत करण्यात आलेल्या बेकायदा बांधकामातून पैसा निर्माण होतो. मात्र तो सरकारी तिजोरीत जमा होत नाही. बेकायदा बांधकामे ही सरकारी आरक्षित जमिनीवर केली जातात. बेकायदा बांधकाम करणारे महापालिकेस विकास शुल्क देत नाहीत. प्राप्तीकर, आयकर, रुपांतरीत कर, गौण खणीज कर, मुंद्राक शुल्क भरत नाही. त्यामुळे सरकारचा कर स्वरुपातील हजारो कोटीचा महसूल बुडला आहे. बेकायदा बांधकामातून जमा होणारा पैसा हा विविध खात्याच्या अधिका:यांसह लोकप्रतिनिधींमध्ये वाटली जाते. राजकीय कार्यक्रमांना लागणा:या आर्थिक पुरवठय़ाचा मूळ स्त्रोत बेकायदा बांधकामे आहेत.

कोकोडकर समितीच्या अहवालानुसार १९८३ साली महापालिका हद्दीत २ हजार ४३५ बेकायदा बांधकामे होती. इन्स्टीटय़ूट फॉर हॅबीटट अॅण्ड इनव्हायरमेंट सेंटर फॉर डेव्हलमेंट स्टडी अॅण्ड अॅक्टीव्हीटी पुणे या संस्थेच्या अहवालानुसार जुलै १९८३ पर्यंत ३ हजार ७४० बेकायदा बांधकामे होती. २००४ साली उच्च न्यायालयाती याचिकेनुसार अग्यार समितीने दिलेल्या अहवालानुसार महापालिका हद्दीत ६७ हजार २९० बेकायदा बांधकामे होती. २७ गावे महापालिकेत समाविष्ट केली तेव्हा तत्कालीन आयुक्त ई. रविंद्रन यांनी दिलेल्या प्रकटनानुसार ७९ हजार ४६५ बांधकामे होती. त्याची अधिकृतता तपासल्याशिवाय त्याची खरेदी विक्री करुन नये असे स्पष्ट केले होते. महापलिकेच्या माहितीनुसार ३१ मार्च 2022 पर्यंत महापालिका हद्दीत १ लाख ५१ हजार १५ बेकायदा बांधकामे असल्याचे म्हटले होते.

आत्ता बनावट कागदपत्राच्या आधारे महापालिकेची परवानगी मिळविल्याचे भासवून रेरा, राज्य सरकार, महापालिका यांची फसवणूक केल्या प्रकरणी ६५ बिल्डरांच्या विरोधात गुन्हे दाखल आहे. त्याची चौकशी एसआयटी आणि ईडीकडून सुरु आहे. या प्रकराची प्रकरणो ५०० च्या वर असावीत. बहुतांश प्रकरणांची नोंद घेण्यात आलेली नाही. इतकेच नव्हे तर राज्यभरात अशा प्रकारची १ हजार प्रकरणे असावी असा गौप्यस्फोट एमसीएचआयने नुकताच केला होता.

महापालिकेने केंद्र सरकारच्या बीएसयूपी योजने अंतर्गत शहरी गरीबाकरीता उभारलेल्या घरकूल योजनेकरीता 9क्क् कोटी रुपयांचा खर्च केला आहे. मात्र त्याला मान्यता नाही. त्यामुळेच रेल्वेच्या डेडीकेट फ्रेट कॉरीडॉर प्रकल्पातील बाधितांना महापालिकेच्या या योजनेतून घरे दिली जाणार होती. त्यासाठी रेल्वेने ९६ कोटी रुपये भरले होते. आत्ता रेल्वेने घरे घेण्यास नकार दिला आहे. ५०० फूटाच्या घरांना मालमत्ता कर आकारला जात नाही. त्याचा भुर्दुड अधिकत पणो राहणा:या नागरीकांच्या माथी मारला जातो. या सर्व बाबी लक्षात घेता बुडीत रक्कम कॅगने लेखापरिक्षण करुन निश्चीत करावी अशी मागणी गोखले यांनी केली आहे. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाEnchroachmentअतिक्रमण