शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी किती वेळा रास्ता रोको करायचा; पाणी कधी मिळणार संतप्त महिलाचा सवाल

By मुरलीधर भवार | Updated: September 30, 2022 15:20 IST

ग्रामीण भागासह टाटा नाका येथील देशमुख परिसरातील नागरीकांनाही पाण्याचा प्रश्न भेडसावत असतो.

कल्याण- शहराच्या पूर्व भागातील खडेगोळवली आणि माणोरा गाव परिसरात पाणी टंचाईने त्रस्त असलेल्या नागरिकांकडून प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करुन देखील पाणी टंचाईचा प्रश्न सोडविला जात नाही. पाणी कधी मिळणार असा संतप्त सवाल उपस्थित करीत महिला वर्गाने आज आय प्रभाग कार्यालयाच्या समोरच ठिय्या देत रास्ता रोको आंदोलन केले. आत्ता तरी प्रशासनाने आमची दखल घेऊन पाणी प्रश्न सोडवावा अशी आपेक्षा आंदोलन करणाऱ्या महिलांनी व्यक्त केली आहे.

यंदाचा पाऊस चांगला पडल्याने कल्याण डोंबिवली महापालिकेस पाण्याचा प्रश्न उद्धवला नाही पाहिजे. मात्र कल्याण ग्रामीण भागातील दावडी, भोपर भागात पाण्याचा प्रश्न तीव्र आहे. चांगला पाऊस होऊन धरणो भरुन देखील विविध भागात पाण्याची टंचाई जाणवते. त्याचबरोबर दोनच दिवसापूर्वी दावडी परिसरातील नागरीकांनी मंत्री रविंद्र चव्हाण यांची भेट घेऊन पाणी प्रश्न त्यांच्याकडे मांडला होता. त्यावर मंत्री चव्हाण यांनी संताप व्यक्त करीत प्रशासनाचा कारभारच ढिसाळ असल्याचे म्हटले होते. लवकर बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते.

ग्रामीण भागासह टाटा नाका येथील देशमुख परिसरातील नागरीकांनाही पाण्याचा प्रश्न भेडसावत असतो. त्यांचाही प्रश्न अद्याप निकाली निघालेला नाही. ही परिस्थिती असताना आत्ता खडेगोळवली माणोरा गाव परिसरातील नागरीकांना पाणी मिळत नसल्याने संतप्त महिलांनी आय प्रभागासमोर ठिय्या देत महापालिकेच्या विरोधात आंदोलन केले आहे. काही वेळेसाठी महिलांनी रास्ता रोको केला होता.टंचाई ग्रस्त भागाला महापालिकेकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो. मात्र ज्या मालमत्ता धारकाकडून कर थकविला आहे. तसेच ज्या मालमत्ता कर बुडव्या आहे. बेकायदा चाळी, बांधकामे आहे. त्यांना टँकर बंद करण्याचे आदेश दिले आहेत. कारण या टँकरवर दिवसाला एक लाख रुपयांचा खर्च होत होता. हे टँकर बंद केले आहे. आंदोलन करणा:या महिलांनी सांगितले की, आम्ही मालमत्ता कर भरतो. तरी देखील आम्हाला महापालिका पाणी पुरवठा करती नाही. आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयाचा फटका कर भरणाऱ्या नागरिकांनीही बसला असल्याच्या मुद्याकडे महिलांनी लक्ष वेधले.