शहरं
Join us  
Trending Stories
1
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
2
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
3
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
4
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
5
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
6
"ही भिवंडी आहे, मराठीत कशाला बोलायचं?"; अबु आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, मनसे म्हणाली, "लाज वाटते तर..."
7
गंगाखेडेतमध्ये धनगर आरक्षण आंदोलनात खळबळ; ओबीसी नेते सुरेश बंडगर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
8
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
9
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?
10
"चीन अमेरिकेला मागे टाकणार, तिसरं महायुद्ध, अन्...!"; 2026 साठी बाबा वेंगाची भविष्यवाणी, भारतासह जागात काय-काय घडणार?
11
बाजारात गेलेल्या सुनेचा २ वर्षांनी विहिरीत सापडला सांगाडा; राँग नंबरवरुन सुरू झालेली लव्हस्टोरी
12
जगात पहिल्यांदा 'ड्रोन वॉल' बनणार; रशियाला घाबरुन २७ देशांनी निर्णय घेतला, जाणून घ्या कसे करणार काम
13
'अनेकदा संघाला संपवण्याचे प्रयत्न झाले, तरीही संघ वटवृक्षासारखा ठाम उभा आहे'- PM नरेंद्र मोदी
14
Pune Viral Video: केस पकडले, कमरेत लाथा मारल्या; पुण्यात भररस्त्यात तरुणीला मारहाण; घटनेचा व्हिडीओ व्हायरल
15
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
16
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्तीनिमित्त सरकाने प्रसिद्ध केलं विशेष नाणं आणि टपाल तिकीट, मोदी म्हणाले...
17
Viral Video: मुंबई लोकलमध्ये नवरात्रीचा जल्लोष! 'एक नंबर, तुझी कंबर' गाण्यावर महिलांचा जबरदस्त डान्स
18
'मैत्रीमुळे विचारधारा सोडली, असे होत नाही.. ' संघाच्या निमंत्रण पत्रिकेवर न्यायाधीशांच्या आईचे नाव असल्याने वाद !
19
भोजपुरी अभिनेता पवन सिंह भाजपात; "जीवे मारले तरी मराठी बोलणार नाही", या विधानावरून झाला होता वाद
20
Asia Cup 2025 : ट्रॉफी द्या, अन्यथा..; BCCI ने मोहसिन नकवींना दिला ७२ तासांचा अल्टिमेटम

महिलांनी किती वेळा रास्ता रोको करायचा; पाणी कधी मिळणार संतप्त महिलाचा सवाल

By मुरलीधर भवार | Updated: September 30, 2022 15:20 IST

ग्रामीण भागासह टाटा नाका येथील देशमुख परिसरातील नागरीकांनाही पाण्याचा प्रश्न भेडसावत असतो.

कल्याण- शहराच्या पूर्व भागातील खडेगोळवली आणि माणोरा गाव परिसरात पाणी टंचाईने त्रस्त असलेल्या नागरिकांकडून प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करुन देखील पाणी टंचाईचा प्रश्न सोडविला जात नाही. पाणी कधी मिळणार असा संतप्त सवाल उपस्थित करीत महिला वर्गाने आज आय प्रभाग कार्यालयाच्या समोरच ठिय्या देत रास्ता रोको आंदोलन केले. आत्ता तरी प्रशासनाने आमची दखल घेऊन पाणी प्रश्न सोडवावा अशी आपेक्षा आंदोलन करणाऱ्या महिलांनी व्यक्त केली आहे.

यंदाचा पाऊस चांगला पडल्याने कल्याण डोंबिवली महापालिकेस पाण्याचा प्रश्न उद्धवला नाही पाहिजे. मात्र कल्याण ग्रामीण भागातील दावडी, भोपर भागात पाण्याचा प्रश्न तीव्र आहे. चांगला पाऊस होऊन धरणो भरुन देखील विविध भागात पाण्याची टंचाई जाणवते. त्याचबरोबर दोनच दिवसापूर्वी दावडी परिसरातील नागरीकांनी मंत्री रविंद्र चव्हाण यांची भेट घेऊन पाणी प्रश्न त्यांच्याकडे मांडला होता. त्यावर मंत्री चव्हाण यांनी संताप व्यक्त करीत प्रशासनाचा कारभारच ढिसाळ असल्याचे म्हटले होते. लवकर बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते.

ग्रामीण भागासह टाटा नाका येथील देशमुख परिसरातील नागरीकांनाही पाण्याचा प्रश्न भेडसावत असतो. त्यांचाही प्रश्न अद्याप निकाली निघालेला नाही. ही परिस्थिती असताना आत्ता खडेगोळवली माणोरा गाव परिसरातील नागरीकांना पाणी मिळत नसल्याने संतप्त महिलांनी आय प्रभागासमोर ठिय्या देत महापालिकेच्या विरोधात आंदोलन केले आहे. काही वेळेसाठी महिलांनी रास्ता रोको केला होता.टंचाई ग्रस्त भागाला महापालिकेकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो. मात्र ज्या मालमत्ता धारकाकडून कर थकविला आहे. तसेच ज्या मालमत्ता कर बुडव्या आहे. बेकायदा चाळी, बांधकामे आहे. त्यांना टँकर बंद करण्याचे आदेश दिले आहेत. कारण या टँकरवर दिवसाला एक लाख रुपयांचा खर्च होत होता. हे टँकर बंद केले आहे. आंदोलन करणा:या महिलांनी सांगितले की, आम्ही मालमत्ता कर भरतो. तरी देखील आम्हाला महापालिका पाणी पुरवठा करती नाही. आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयाचा फटका कर भरणाऱ्या नागरिकांनीही बसला असल्याच्या मुद्याकडे महिलांनी लक्ष वेधले.