शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जम्मू काश्मिरमध्ये ३७०, ३५ ए रद्द झाल्यावर महिलांच्या परिस्थितीत सुधारणा: पंकजा वल्ली

By अनिकेत घमंडी | Updated: March 26, 2023 12:33 IST

पंकजा वल्ली यांना टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचा स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार प्रदान, अदिती सेवा प्रतिष्ठानच्या वतीने २७ वर्षे सेवकार्य

डोंबिवली: दहशतवाद जेव्हा टोकाला पोहोचला होता त्याचे सर्व समाजावर परिणाम झालेच परंतु त्यातही महिला आणि लहान मुले हे सर्वात जास्त पीडित आहेत, असे त्यांनी सांगितले. जम्मू काश्मिरमध्ये ३७० आणि ३५ ए रद्द झाल्यावर महिलांच्या परिस्थितीत सुधारणा होत आहे असे मत किलांबी पंकजा वल्ली यांनी व्यक्त केले. टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळातर्फे दिला जाणारा स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार शनिवारी त्यांना (पंकजा दीदी) यांना मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप घरत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

त्या २७ वर्षे जम्मू काश्मीर मध्ये अदिती सेवा प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून महिला सबलीकरणाद्वारे राष्ट्रीय एकात्मतेसाठी कार्यरत आहेत. स्मृतिचिन्ह, मानपत्र व ५१ हजार रुपये असे त्या पुरस्काराचे स्वरूप होते. या निमित्ताने पंकजा यांची मुलाखत हम संस्थेच्या नंदिनी पित्रे यांनी घेतली. २७ वर्षांचे जम्मू मधील त्यांचे अनुभव पंकजा दीदींनी प्रेक्षकांसमोर मांडले. व्यवसायाभिमुख शिक्षण, आरोग्य व महिला सबलीकरण यातील अनुशेष भरून काढण्यासाठी सर्वांनी हातभार लावावा, असे आवाहन या निमित्ताने पंकजा उपस्थितांना केले.

सावरकर प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते. पुरस्कार प्रदान समारंभामध्ये लोकमान्य गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी जयोस्तुते हे गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशीर्वाद बोंद्रे यांनी केले. पंकजा यांचा विस्तृत परिचय अर्चना जोशी यांनी करून दिला तर कार्याध्यक्ष श्रीकांत पावगी यांनी आभार प्रदर्शन केले. रिद्धी करकरे हिने कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन केले. पुरस्कार प्रदान समारंभाच्या पूर्वी डोंबिवलीतील विविध रोटरी क्लबचे सदस्य, शिक्षण संस्थांचे पदाधिकारी यांच्याशी पंकजा यांनी स्वतंत्रपणे संवाद साधला व त्यांना अदिती सेवा प्रतिष्ठानच्या कार्यास सहकार्य करण्याचे आवाहन केले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकर