शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

'न्यायालयाच्या ताशेऱ्यानंतरही अवैध बांधकामे'; उल्हासनगरात भिंत अंगावर पडून मजुराचा मृत्यू 

By सदानंद नाईक | Updated: April 8, 2025 17:51 IST

जमीन मालक व बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा 

- सदानंद नाईक 

उल्हासनगर : कॅम्प नं-५, सेकशन ३६ येथील एक जुने बांधकाम पाडून नवीन बांधकाम बांधण्याचा ठेका जमीन मालक जितेंद्र सावलानी यांनी तेजस पाटील याला दिला होता. २४ मार्च रोजी जुने बांधकाम तोडताना भिंत अंगावर पडून मजूर कामगार असलेल्या ज्ञानेश्वर सुपडा सोमस याचा मृत्यू झाला. चौकशीअंती याप्रकरणी पाटील व सावलानी यांच्यावर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

उल्हासनगरातील एका अवैध बांधकामांच्या प्रश्नावरून उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात महापालिका आणि पोलिसांना चांगलेच धारेवर धरले. असे अवैध बांधकामे नियमित केल्यास राज्यात अराजकता माजेल. असे निरीक्षण न्यायमूर्ती अजय गडकरी व न्या. कमल खाटा यांच्या खंडपीठाने यासंबंधीची नोंदविले. अवैध बांधकामांवर कारवाई करण्यास महापालिका आणि पोलीस का अपयशी ठरत आहेत? असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केल्याने, शहरातील अवैध बांधकामचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. शहरांत राजकीय नेते व महापालिका अधिकारी यांच्या आशीर्वादाने सर्रासपणे अवैध बांधकामे सुरु असल्याची टीका होत आहे. 

दरम्यान कॅम्प नं-५ येथील जुने बांधकाम पडून नवीन बांधकामचा ठेका जमीन मालक जितेंद्र सावलानी यांनी तेजस लक्ष्मण पाटील याला दिला होता. जुने बांधकाम पाडताना भिंत अंगावर पडून एका कामगारांचा मृत्यू झाल्याचा ठपका पोलिसांनी ठेवून सावलानी व पाटील यांच्यावर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याप्रकाराने पुन्हा एकदा अवैध बांधकामचा प्रश्न ऐरणीवर येऊन उच्च न्यायालयाने नोंदविलेले निरीक्षण महापालिका विचारता घेते की नाही?. असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

नदी किनारी लॉन्स शांतीनगर येथील वालधुनी नदी किनारी शासन भुखंडावर महापालिकेच्या नाकावर टिचून अवैधपणे लॉन्स उभा राहिला आहे. यावर एका वर्षांपूर्वी महापालिकेने कारवाई केली होती. 

महापालिका शाळेच्या भूखंडावर सनद कॅम्प नं-५ येथील महापालिका शाळेच्या मैदानावर सनद काढण्याचा प्रकार उघड झाला. महापालिकेने याबाबत पाठपुरावा केला. मात्र अद्यापही निर्णय आला नाही.

वालधुनी नदी किनारी अवैध अतिक्रमण शहराच्या मधोमध वाहणाऱ्या वालधुनी नदी किनारील मोकळ्या जागेवर प्रांत कार्यालयातून सनद दिल्या जात आहे. भविष्यात याठिकाणी बांधकामे झाल्यास पुराचा सर्वाधिक फटका शहराला बसणार असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर