शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

आता आमच्याकडे दुर्लक्ष करा! मनसेने झळकविला बॅनर

By प्रशांत माने | Updated: March 28, 2023 16:58 IST

प्रभागांतर्गत बदल्यांनतरहीफेरीवाला अतिक्रमण जैसे थे

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली: रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त करण्यासाठी मनसेच्या वतीने १५ दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. त्याची मुदत मंगळवारी संपली परंतू फेरीवाला अतिक्रमण जैसे थे राहीले आहे. हे चित्र पाहता मनसेचे आमदार राजू पाटील यांनी स्थानक परिसरात बॅनर झळकावून फेरीवाला मुक्त करण्याची डेडलाईन संपली आता आमच्याकडे दुर्लक्ष करा! असा इशारा केडीएमसीला दिला आहे. त्यामुळे फेरीवाला अतिक्रमणाच्या मुद्यावर पुन्हा एकदा मनसेकडून खळखटयाक होण्याची चिन्हे आहेत.

इतर शहरांप्रमाणो फेरीवाल्यांचे वाढते अतिक्रमण हा नेहमीच कल्याण डोंबिवली शहरांसाठी कळीचा मुद्दा राहीला आहे. एल्फिन्स्टन पुलाच्या दुर्घटनेनंतर तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रेल्वे स्थानकापासून १५० मीटर हद्दीत फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास मज्जाव आहे. पण केडीएमसी प्रशासनाला त्या आदेशाच्या अंमलबजावणीचा विसर पडला आहे. कल्याण असो अथवा डोंबिवली शहरातील रेल्वे स्थानक परिसराला बकालावस्था आली असून, पदपथ आणि रस्ते फेरीवाल्यांच्या अतिक्रमणात हरवले आहेत. दरम्यान डोंबिवली स्थानक परिसरातील फेरीवाल्यांचे वाढते अतिक्रमण पाहता १३ मार्चला मनसेचे आमदार पाटील यांनी महापालिका आयुक्त डॉ भाऊसाहेब दांगडे यांची भेट घेत कारवाई संदर्भात चर्चा केली होती. त्यावेळी आयुक्तांनी कारवाईचे आश्वासन पाटील यांना दिले होते. पंधरा दिवसात फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई केली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा पाटील यांनी दिला होता. दरम्यान १५ दिवसानंतरही फेरीवाल्यांचे अतिक्रमण स्थानक परिसरात जैसे थे राहील्याने डोंबिवली स्थानक पूर्व परिसर फेरीवाला मुक्त करण्याची डेडलाईन संपली आता आमच्याकडे दुर्लक्ष करा असा बॅनर स्थानक परिसरात झळकावून मनसेने एकप्रकारे आंदोलन छेडण्याचा पवित्रा घेतला आहे.

आमदार पाटील यांनी भेट घेतल्यानंतर आयुक्तांनी फेरीवाला विरोधी पथकांमधील कर्मचा-यांच्या प्रभागांतर्गत बदल्या केल्या होत्या. याउपरही अतिक्रमण जैसे थे राहीले असून एका रुग्णवाहिका चालकाला गाडीचा धक्का लागला म्हणून फेरीवाल्यांनी मारहाण केल्याची घटना देखील नुकतीच घडली होती. फेरीवाला अतिक्रमणासह त्यांच्या पुर्नवसनाकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने ही परिस्थिती ओढावली असून पुन्हा एकदा फेरीवाला कारवाईवरून मनसे रस्त्यावर उतरण्याची दाट शक्यता आहे.

एकिकडे फेरीवाला कारवाईच्या मुद्यावरून प्रशासनावर तोंडसुख घेतले जात असताना दुसरीकडे राजकीय दबावापोटी काही ठिकाणी कारवाईला मर्यादा येत असल्याचीही चर्चा आहे. कारवाई करणा-या कर्मचा-याला दूरध्वनी करून तुम्हाला आमचीच माणसे दिसतात का? असे फोनही काही राजकीय पक्षांच्या पदाधिका-यांकडून केले जात आहेत. त्यामुळे दबावात काम कसे करायचे? असा प्रश्नही फेरीवाला विरोधी पथकातील कर्मचा-यांना पडला आहे.

टॅग्स :MNSमनसे