शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

"पक्षाने मला सांगितल्यास वाट्टेल त्या उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवेन"

By मुरलीधर भवार | Updated: February 28, 2024 15:51 IST

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांचे वक्तव्य

कल्याण - शिवसेना ठाकरे गटाकडून कल्याण लोकसभा मतदार संघातून सुषमा अंधारे यांना उमेदवारी दिली जाणा अशी चर्चा आहे. याविषयी शिवसेना नेत्या सुषणा अंधारे यांनी सांगितेल की, माझे नाव चर्चेत आहे. पण मला त्याबाबत अधिकृत निरोप नाही. मला फक्त काम करायचे आहे. पक्षाने मला सांगितले तर वाट्टेल त्या उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढविणार, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले.

शिवसेना नेत्या अंधारे यांची मुक्त संवाद यात्रा सुरु आहे. या निमित्त त्या कल्याणला आल्या होत्या. त्यांनी प्रथम विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी कोळसेवाडी शिवसेना शाखेतील पदाधिकाऱ््यांची भेटीगाठी घेतल्या. यावेळी अंधारे यांनी शाखेत पत्रकार परिषद घेतली. पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला तेव्हा त्यांनी आव्हान पेलण्यास तयार आहे. पक्षाकडून होणार आला पाहिजे असेच सूचक विधान केले.

अंधारे म्हणाल्या की, श्रीकांत शिंदे म्हणजे फार मोठा अडचणीचा डोंगर असे वाटत नाही. आम्हाला त्यांच्याशी समोर सामोरे जाताना फार मोठा आव्हान आहे असे वाटत नाही. कल्याणमध्ये शिंदे गटाचा शहर प्रमुखावर भाजप आमदार अंधारात नाही तर भर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतात. हे दोघेही सरकार पक्षातले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील वितुष्ट हे गॅंगवारचे स्वरूप घेत असल्याचा आरोप अंधारे यांनी केला आहे.

सरकारने मनोज जरांगे पाटील प्रकरणी एसआयटी चौकशी लावण्याचे आदेश दिलेत याबाबत बोलताना सरकारने ही चौकशी करायला हरकत नाही. मात्र, त्यासोबतच मराठा आरक्षण,ओबीसी आरक्षण, एसटी आरक्षणाच्या लढ्यात जे तीन-चारशे लोक मेलेत त्यांची एसआयटी चौकशी सरकार लावणार आहे का ? सरकारला जर एसआयटी चौकशी लावण्याचे हौस असेल, तर भीमा कोरेगावच्या एसआयटी चौकशीचे काय झाले ? यावर सरकारने उत्तर दिले पाहिजे. आत्तापर्यंत अफरातफरी गोंगाट आणि गोंधळ झाल्यामुळे अनेक लोकांचे जीव गेले. त्याचे एसआयटी चौकशीचा काय समृद्धी महामार्गावर भीषण अपघातामध्ये जे २८ ते ३० लोक गेले. एकाच वेळेला हे सगळे अपघात होतात याचे एखादे चौकशी सरकारी लावणार आहे का ? असा सवाल केला. एसआयटी चौकशी लावण्याचा जे काही नाटक सरकारकडून सुरू आहे ,फडणवीस साहेबांनी कही पे निगाहे, कही पे निशाणा करू नये फडणवीस साहेबांचा निशाणा जर थेट शिंदे साहेबांवर असेल तर ते थेट सभागृहात बोलावे. आडून-अडून राजेश टोपे ,पवार साहेब किंवा उद्धव ठाकरे असे नावे न घेता थेट निशाणा साधावा. थेट बोलावे कारण जर तुमचे काही आक्षेप असतील तर मला असे वाटते की त्या सगळ्या घडामोडींमध्ये मंगेश चिवटे सारख्या माणसाचा वावर पण फार महत्त्वाचा होता त्यामुळे फडणवीस साहेबांनी थेट निशाणे साधावेत हे आमचे अपेक्षा असल्याचे अंधारे यांनी सांगितले

कल्याण वाढती गुन्हेगारी ,वाढती ठेकेदारी यामुळे नागरिकांसह पोलीस यंत्रणा सुद्धा दहशतीखाली आहे. दस्तूर खुद्द भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे साहेबांच्या शहर प्रमुखाला गोळ्या घालाव्यात. याचा अर्थ सत्ताधाऱ्यांमधला अंतर्गत गॅंगवार किती टोकाला पोहोचला हे दिसून येते. या परिस्थितीत निश्चितपणे वाटते येणारी निवडणूक श्रीकांत शिंदे यांच्यासाठी इतकी सोपी असणार नाही. जितकी सोपी त्यांना मुख्यमंत्री पुत्र म्हणून वाटत आहे . मुख्यमंत्री स्वतःचे प्रोजेक्शन शेतकरी पुत्र म्हणून करत असले तरी श्रीकांत शिंदे यांचा प्रोजेक्शन शेतकरी पुत्र म्हणून करू शकणार नाहीत. श्रीकांत शिंदे हे अत्यंत गर्भ श्रीमंत आणि पक्ष फोडण्यात तरबेज असणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहेत अशी टीका अंधारे यांनी केली.

टॅग्स :kalyanकल्याणSushma Andhareसुषमा अंधारेShiv Senaशिवसेना