शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

"पक्षाने मला सांगितले तर मी वाट्टेल त्या उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवेन"

By मुरलीधर भवार | Updated: February 28, 2024 15:03 IST

शिवसेना नेत्या सुषमाअंधारे यांचे वक्तव्य, कल्याण वाढती गुन्हेगारी ,वाढती ठेकेदारी यामुळे नागरिकांसह पोलीस यंत्रणा सुद्धा दहशतीखाली आहे

कल्याण-शिवसेना ठाकरे गटाकडून कल्याण लोकसभा मतदार संघातून सुषमा अंधारे यांना उमेदवारी दिली जाणा अशी चर्चा आहे. याविषयी शिवसेना नेत्या सुषणा अंधारे यांनी सांगितेल की, माझे नाव चर्चेत आहे. पण मला त्याबाबत अधिकृत निरोप नाही. मला फक्त काम करायचे आहे. पक्षाने मला सांगितले तर वाट्टेल त्या उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढविणार. शिवसेना नेत्या अंधारे यांची मुक्त संवाद यात्रा सुरु आहे. या निमित्त त्या कल्याणला आल्या होत्या. त्यांनी प्रथम विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

त्यानंतर त्यांनी कोळसेवाडी शिवसेना शाखेतील पदाधिकाऱ्यांची भेटीगाठी घेतल्या. यावेळी अंधारे यांनी शाखेत पत्रकार परिषद घेतली. पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला तेव्हा त्यांनी आव्हान पेलण्यास तयार आहे. पक्षाकडून होणार आला पाहिजे असेच सूचक विधान केले.अंधारे म्हणाल्या की, श्रीकांत शिंदे म्हणजे फार मोठा अडचणीचा डोंगर असे वाटत नाही. आम्हाला त्यांच्याशी समोर सामोरे जाताना फार मोठा आव्हान आहे असे वाटत नाही. कल्याणमध्ये शिंदे गटाचा शहर प्रमुखावर भाजप आमदार अंधारात नाही तर भर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतात. हे दोघेही सरकार पक्षातले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील वितुष्ट हे गॅंगवारचे स्वरूप घेत असल्याचा आरोप अंधारे यांनी केला आहे.

सरकारने मनोज जरांगे पाटील प्रकरणी एसआयटी चौकशी लावण्याचे आदेश दिलेत याबाबत बोलताना सरकारने ही चौकशी करायला हरकत नाही. मात्र त्यासोबतच मराठा आरक्षण,ओबीसी आरक्षण, एसटी आरक्षणाच्या लढ्यात जे तीन-चारशे लोक मेलेत त्यांची एसआयटी चौकशी सरकार लावणार आहे का ? सरकारला जर एसआयटी चौकशी लावण्याचे हौस असेल, तर भीमा कोरेगावच्या एसआयटी चौकशीचे काय झाले ? यावर सरकारने उत्तर दिले पाहिजे. आत्तापर्यंत अफरातफरी गोंगाट आणि गोंधळ झाल्यामुळे अनेक लोकांचे जीव गेले. त्याचे एसआयटी चौकशीचा काय समृद्धी महामार्गावर भीषण अपघातामध्ये जे २८ ते ३० लोक गेले. एकाच वेळेला हे सगळे अपघात होतात याचे एखादे चौकशी सरकारी लावणार आहे का ? असा सवाल केला.

एसआयटी चौकशी लावण्याचा जे काही नाटक सरकारकडून सुरू आहे ,फडणवीस साहेबांनी कही पे निगाहे, कही पे निशाणा करू नये फडणवीस साहेबांचा निशाणा जर थेट शिंदे साहेबांवर असेल तर ते थेट सभागृहात बोलावे. आडून-अडून राजेश टोपे ,पवार साहेब किंवा उद्धव ठाकरे असे नावे न घेता थेट निशाणा साधावा. थेट बोलावे कारण जर तुमचे काही आक्षेप असतील तर मला असे वाटते की त्या सगळ्या घडामोडींमध्ये मंगेश चिवटे सारख्या माणसाचा वावर पण फार महत्त्वाचा होता त्यामुळे फडणवीस साहेबांनी थेट निशाणे साधावेत हे आमचे अपेक्षा असल्याचे अंधारे यांनी सांगितले

कल्याण वाढती गुन्हेगारी ,वाढती ठेकेदारी यामुळे नागरिकांसह पोलीस यंत्रणा सुद्धा दहशतीखाली आहे. दस्तूर खुद्द भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे साहेबांच्या शहर प्रमुखाला गोळ्या घालाव्यात. याचा अर्थ सत्ताधाऱ्यांमधला अंतर्गत गॅंगवार किती टोकाला पोहोचला हे दिसून येते. या परिस्थितीत निश्चितपणे वाटते येणारी निवडणूक श्रीकांत शिंदे यांच्यासाठी इतकी सोपी असणार नाही. जितकी सोपी त्यांना मुख्यमंत्री पुत्र म्हणून वाटत आहे . मुख्यमंत्री स्वतःचे प्रोजेक्शन शेतकरी पुत्र म्हणून करत असले तरी श्रीकांत शिंदे यांचा प्रोजेक्शन शेतकरी पुत्र म्हणून करू शकणार नाहीत. श्रीकांत शिंदे हे अत्यंत गर्भ श्रीमंत आणि पक्ष फोडण्यात तरबेज असणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहेत अशी टीका अंधारे यांनी केली.

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारे