शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

पक्षाने ठरवलं तर महाराष्ट्राचा पालक व्हायला आवडेल; माजी लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांचे सूचक विधान

By अनिकेत घमंडी | Updated: January 28, 2023 09:57 IST

डोंबिवलीत पुस्तक आदान..प्रदान महोत्सवात प्रकट मुलाखत

 डोंबिवली: मला पक्षाने ठरवलं तर महाराष्ट्राचा पालक व्हायला निश्चितच आवडेल, परंतू आता वय झाले आहे, त्यातही नेशन आणि पार्टी फर्स्ट असल्याचे सूचक वक्तव्य लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी केले.डोंबिवली येथे आयोजित पहिल्या बहुभाषिक पुस्तक आदान प्रदान सोहळ्यात शुक्रवारी त्यांची प्रकट मुलाखत झाली. आठ वेळा इंदौरच्या खासदार राहिलेल्या लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांची मुलाखत पत्रकार राजेंद्र हुंजे यांनी घेतली. त्या पुढे म्हणाल्या की, स्वामी विवेकानंद यांनी भारत हा विश्वगुरु होणार हे सांगितले आहे. आत्ताची आपल्या देशाची प्रगती याच पथावर आहे.

आंतराष्ट्रीय राजकारणात भारताची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. ठामपणे निर्णय घेतले जात आहेत. त्यामुळे भारताबद्दल आदराची दृष्टी निर्माण झाली असल्याचे गौरवउद्गार या मुलाखतीमध्ये नगरसेविका ते लोकसभा अध्यक्षपदाचा त्यांचा प्रवास उलगडला. या मुलाखतीमध्ये त्यांच्या साधी राहणी उच्चा विचारसरणीने उपस्थितांची मने जिंकली. पै फ्रेण्डस लायब्ररीच्या पुढाकारानं आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका, डोबिंवलीकर एक सांस्कृतिक परिवार यांच्या सहकार्यानं आयोजित पहिल्या बहुभाषिक पुस्तक आदान प्रदान सोहळ्याच्या आठव्या दिवशी महाजन यांच्या भेटीचा अभूतपूर्व योग जुळून आला. आठ वेळा इंदौरच्या खासदार राहिलेल्या आणि चिपळूणच्या सुकन्या महाजन यांची मुलाखत पत्रकार राजेंद्र हुंजे यांनी घेतली. यावेळी त्यांनी राजकारण, समाजकारण आणि वाचन संस्कृती याबाबत आपली मते उपस्थितांसमोर व्यक्त केली.

महाजन यांनी लहानपणापासूनचा आपला प्रवास सांगितला. त्या मुलाखतीत त्यांनी वाचन संस्कृती किती महत्त्वाची आहे, हे सांगितले. आता तीन हजारावर पुस्तकांचा संग्रह असलेल्या महाजन म्हणाल्या, माझ्यावर लहानपणापासून वाचनाचे संस्कार होते. संस्कृत भाषा शिकता आली. ज्याला संस्कृत येते, त्याला कोणतीही भाषा अवघड वाटत नाही. त्यामुळेच लोकसभेचे अध्यक्षपद भुषवतांना वेगवेगळ्या राज्यातील खासदारांबरोबर संवाद साधतांना अडचण वाटली नसल्याचे महाजन यांनी सांगितले. सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत बोलतांना महाजन म्हणाल्या की, देशाची प्रगती करण्याची जबाबदारी फक्त राजकीय नेत्यांची असते असे नाही. जनतेचीही जबाबदारी असते. जर आपण निवडून दिलेला नेता चुकीचे वागत असेल, त्याचे बोलणे आपल्याला आवडत नसेल, तर मतदारांनी नेत्याला त्याची जाणीव करुन दिली पाहिजे. आजकल देवालाही वाटून घेतलं जातं. तसंच मोठ्या माणसांनाही वाटून घेतलं जात आहे, हा चुकीचा पायंडा असल्याचे महाजन यांनी सांगितले.

इंदौरमध्ये होत असलेल्या अहिल्याबाई स्मारकाची माहिती देतांना सुमित्रा महाजन यांनी ज्याचा हाती सत्ता आहे, त्याच्याकडे समर्पणाचा भाव असावा असे सांगितले. अनुभव आणि युवा शक्ती यांचा मिलाप होणे गरजेचे आहे. लोकसभेतील कामकाजाचा अनुभव सांगतांना त्यांनी आजकालच्या राजकारणात स्थैर्य येण्याची गरज असल्याचे सांगितले. लोकसभा अध्यक्षपदाचा पदभार सांभाळल्यावर जबाबदारी वाढली. अशावेळी कशाप्रकारे अभ्यास केला याचाही अनुभव सुमित्रा महाजन यांनी उपस्थितांना सांगितला. नगरसेवक ते लोकसभा अध्यक्षपदापर्यंतचा प्रवास त्यांनी सांगताना महिला म्हणून कतृत्व अधिक सिद्ध करावं लागतं हे सांगितलं. या कार्यक्रमात सुमित्रा महाजन यांचा सत्कार पै फ्रेण्ड्स लायब्ररीतर्फे पुंडलिक पै यांनी केला.

सुमित्रा महाजन यांचे चित्र आणि मानपत्रही त्यांना देण्यात आले. चित्रकार प्रभू कापसे यांनी काढलेले चित्र आणि ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर यांनी लिहिलेले मानपत्र सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते महाजन यांना देण्यात आले. यावेळी माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माधव जोशी, दर्शना सामंत, मधुकर चक्रदेव, पुराणिक, दिपाली काळे, वृंदा भुस्कुटे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार अनिकेत घमंडी यांनी केले. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. 

टॅग्स :Sumitra Mahajanसुमित्रा महाजन