शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, गौरीकुंडजवळ अपघात; सात जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
6
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
7
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
8
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
9
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
10
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
11
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
12
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
13
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
14
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
15
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
16
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
17
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
18
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
19
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
20
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा

सत्तेत असताना जनतेचे हित जपले असते, तर दगड भिरकावण्याची वेळ आली नसती; राजू पाटलांची रविंद्र चव्हाण यांच्यावर टीका

By मुरलीधर भवार | Updated: August 22, 2023 20:03 IST

मनसे आमदार राजू पाटील यांचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या पत्राला सडेतोड उत्तर

कल्याण- राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी एक पत्र मनसेला पाठवून ज्यामध्ये मुंबई गोवा महामार्गावर मनसेने केलेल्या आंदोलवर भाष्य केले आहे. कुठला सैनिक आपल्या देशाचे आणि राज्याच्या मालमत्तेची तोडफोड करुन नुकसान करतो ? असा संतप्त सवाल उपस्थित केला होता.

मंत्री चव्हाण यांच्या खरमरी पत्राला मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्वीट करुन उत्तर दिले आहे. जर तुम्ही स्वबुद्धीने राज्याचे हित जपलेत तर आमच्यावर दगड भिरकावण्याची वेळच आली नसती. कोकण महामार्गावर अपघातात गेलेले बळी पाहता. कोकणातील दगडालाही पाझर फुटेल. पण गेली अनेक वर्षे सत्तेत भागीदार असताना किंवा सत्ताधीश असताना तुमचा हा कोकणी स्वाभीमान का जागा झाला नाही ? अशी खोचक टिका केली आहे.

मुंबई गोवा महामार्गाचे काम गेल्या १७ वर्षा पासून सुरु आहे. आत्तापर्यंत हजारो कोटी रुपये खर्च झाले आहे. परंतू हा रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. या रस्त्याची पाहणी खुद्द मनसे प्रमुख राज ठाकरे यानी केली. त्यानंतर याच रस्त्यावरुन त्यांनी सत्ताधारी पक्षाला टिकेचे लक्ष केले. राज ठाकरे यांच्या टिकेपश्चात मनसे कार्यकर्त्यांनी मुंबई गोवा महामार्गावर तीव्र आंदोलन केले. या आंदोलना दरम्यान टोल नाक्याची तोडफोड करण्यात आली. या आंदोलनानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी एका पत्राद्वारे मनसेला उपरोधिक चिमटा काढला. त्यांच्या पत्राला मनसे आमदार पाटील यांनी प्रतिउत्तर दिले.

टॅग्स :Raju Patilराजू पाटीलBJPभाजपा