शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

फेरीवाला प्रश्न सोडविला नाही तर...; आमदार राजू पाटील यांचा केडीएमसीला इशारा, आयुक्तांची घेतली भेट

By मुरलीधर भवार | Updated: November 2, 2023 16:27 IST

या वेळी विविध विषयावर त्यांनी चर्चा करुन तोडगा काढण्याची मागणी केली आहे.

कल्याण-कल्याण डोंबिवली स्टेशन परिसरात दीडशे मीटरच्या आत फेरीवाले बसतात. त्याचा नागरीकांना त्रास हाेतो. तसेच वाहतूक कोंडी होते. फेरीवाला हटविण्यासाठी महापालिकेने कार्यवाही केली नाही. तर हा प्रश्न आम्ही आमच्या पद्धतीने सोडवू असा इशारा मनसे आमदार राजू पाटील यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे. आज आमदार पाटील यांनी महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांची भेट घेतली. या वेळी विविध विषयावर त्यांनी चर्चा करुन तोडगा काढण्याची मागणी केली आहे.पलावा हा आयटीपी प्रकल्प आहे. या प्रकल्पातील नागरीकांना ६६ टक्के जास्तीचा मालमत्ता कर आकारला जातो. हा कर कमी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच घेतला. त्याबद्दल त्यांचे आमदार पाटील यांनी अभिनंदन केले. त्याचबरोबर आज आयुक्तांची भेट घेतली. तेव्हा आमदार पाटील यांनी या प्रकरणी आयुक्तांचेही अभिनंदन केले. अनेक वेळा आयुक्तांसोबत नागरी प्रश्नावर चर्चा केली आहे. काही प्रश्न सुटले आहे. काही सुटलेले नाहीत. फेरीवाला प्रश्न् सुटला नसल्याने आमदार पाटील यांनी आयु्क्तांकडे तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करीत हा प्रश्न सुटला नाही तर आमच्या पद्धतीने सोडविण्याचा इसारा दिला आहे.डोंबिवली पश्चिमेतील मोठा गाव येथील मोठा गाव ठाकूर्ली ते माणकोली खाडी पूलाच्या जोड आणि पाेहच रस्त्याचे आरेखन चुकले असल्याचा मुद्या आमदार पाटील यांनी आयुक्तांकडे उपस्थित केला. याप्रकरणी लवकरच एमएमआरडीए सोबत एकत्रित बैठक लावण्याचे आयुक्तांनी मान्य केले आहे. याशिवाय ठाकूर्ली रेल्वे उड्डाणपूलाची एक बाजूचे काम अर्धवट आहे. हे काम केव्हा मार्गी लागणार असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर आयुक्तांनी या कामातील बाधितांच्या पूनर्वसनाचा प्रश्न मिटविण्यात आला आहे. त्यामुळे हे काम लवकर सुरु केले जाईल असे आश्वासन दिले आहे.डोंबिवली पश्चिमेला विद्युत उपकेंद्र नाही. कोपर येथून जाणारी पश्चिमेची वीज पुरवठा लाईन काही कारणास्तव तुटल्यास डोंबिवली पश्चिम अंधारात जाऊ शकते. पश्चिमेला वीजेचे उपकेंद्र सुरु करण्यासाठी जागा द्यावी अशी मागणी आमदार पाटील यांनी आयुक्तांकडे केली आहे. या मागणीविषयी आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. 

टॅग्स :Raju Patilराजू पाटीलMNSमनसेMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाhawkersफेरीवाले