शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

"महाराष्ट्रात विरोधकांनी एकही जागा जिंकली तरी त्यांच्या मोठे यश असेल"

By मुरलीधर भवार | Updated: April 13, 2024 18:48 IST

उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांचा दावा

कल्याण-महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि परिवार वादी यांच्यात निवडणूक होत आहे. महाराष्ट्रात मोदी मॅजिक बोलत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक वातावरण आहे की, जनता निवडणूका लढवित आहेत. राजकीय पक्ष निवडणूका लढवित नाहीत. निवडणूकीची दोरी जनतेच्या हाती आहे. या निवडणूकीत देशात पुन्हा मोदी लाट असेल. महाराष्ट्रात विरोधकांनी एकही जागा जिंकली तरी त्यांच्या मोठे यश असेल असा दावा उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री आणि लोकसभा प्रभारी दिनेश शर्मा यांनी आज येथे केला आहे.

भिवंडी लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार कपील पाटील यांच्या प्रचारासाठी सुपर वॉरियर्स मेळावा कल्याण पश्चिमतेली वायले नगरातील साई सभागृहात पार पडला. याप्रसंगी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत प्रभारी शर्मा यांनी उपरोक्त दावा केला. शर्मा यांनी सांगितले की, विराेधक नकारात्मक मानसिकता आहे.विरोधी मोदी विरोधाच्या आधारे अपशब्द उच्चारले जातात. संजय राऊत हे मोदी आणि शहा यांना विनाशकारी म्हणतात. मी म्हणतो विनाशकाले विपरीत बुद्धी. शिवसेना समर्थन करणारे संजय राऊत बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली आहे. राम आणि आंबेडकरांचा विराेध करणाऱ्या काँग्रेसच्या सोबत आहेत. उद्धव यांची शिवसेनेने रामनामाचा नकली पोषाख परिधान केला आहे.

तुमची लढाई काेणासोबत आहे असा सवाल शर्म यांना विचारला असता त्यांनी सांगितेल की, भाजपची लढाई कोणाशी नाही. भाजपसमोर विरोधक विखुरलेले आहेत. मी समजतो की, एनसीपी शरद पवार यांची लढाई शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. उद्धव ठाकरे हे काँग्रेसला नष्ट करण्यासाठी पुढे आले आहेत. तर काँग्रेस उद्धव ठाकरे यांना संपविण्याचे काम करीत आहे. विरोधकांकडे निती, नियत आणि नेतृत्व नाही. ४ जून नंतर सगळ्यात पहिले शिवसेना का’ंग्रेस वेगळी करेल. का’ग्रेसपासून राष्ट्रवादी वेगळी होईल. हे तिन्ही पक्ष परस्परांचे सगळ्यात कट्टर विरोधक असतील असा दावा शर्मा यांनी केला आहे.

राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राहिले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. त्यांनी स्वत: म्हटले आहे की, बाळासाहेबांचे सिद्धांत भाजपचे मोदी पूर्ण करीत आहेत. त्यामुळे मनसेने मन से समर्थन दिले आहे. त्यामुळे त्यांचे मी त्यांना मनसे धन्यवाद देतो असे शर्मा यांनी सांगितले.