शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

पाण्याच्या बैठकीस मला बोलावले नाही, मनसे आमदार राजू पाटील यांची नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 16:24 IST

मी मागणी करुन मला वेळ दिली नाही. बैठकही बोलाविली नाही, राजू पाटील यांनी व्यक्त केली नाराजी.

कल्याण-डोंबिवलीनजीक संदप भोपर येथील खदाणीत पाणी टंचाईमुळे पाच जणांचा बुडून मृत्यू झाला. पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी नगरविकास व पालकमंत्र्यांकडे वारंवार मागणी बैठकीची मागणी केली. मात्र आज बोलाविण्यात आलेल्या पाण्याच्या बैठकीस मला बोलविले नाही, यावर मनसे आमदार राजू पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

“मी मागणी करुन मला वेळ दिली नाही. बैठकही बोलाविली नाही. खासदारांनी मागणी करताच बैठक आयोजित केली. बैठक आज आयोजित केल्याची माहिती मला काल कळली. त्यासाठी नगरविकास खात्याच्या सचिव प्रतिभा पाटील यांच्याकडे मी विचारणा केली असता त्यांनी मला बोलविले नसल्याचे सांगितले. मी या भागाचा लोकप्रतिनिधी आहे. मलाच डावलण्यात आले आहे. मला साधे सूचित देखील केले गेले नाही. पालकमंत्र्यांकडून पाणी प्रश्न सुटला तर मला आनंदच आहे. प्रश्न सोडवितील अशी मला आपेक्षा आहे,” असे राजू पाटील यांनी सांगितले.

२७ गावातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठीची उपाययोजना तात्पुरती आहे. बड्या गृहसंकुलांना पाणी दिले जाते. त्यांना पाणी देण्यास माझा विरोध नाही. पण आमच्या टंचाईग्रस्त गावांना पाणी कोण देणार असा प्रश्न महापालिका प्रशासनाकडे आहे. दिव्यात ठाणे महापालिकेकडून २०० कोटी रुपयांची पाणी योजना राबविली जात आहे. दिव्यात पाणी कोटा आहे. पण योजना राबविणाऱ्या ठेकेदाराचे ७० कोटींचे ड्यू आहेत. २०० कोटी खर्च करण्यापेक्षा केंद्र सरकारची अमृत योजना राबविली पाहिजे होती याकडे आमदार पाटील यांनी लक्ष वेधले.

कल्याण डोंबिवलीत नालेसफाईचा बोजवारा उडाला आहे. पहिल्या पावसात अनेक भागात पाणी साचले. महापालिकेचे अधिकारी गेंड्याच्या कातडीचे आहेत. त्यामुळे यावेळी नालेसफाईचा पाहणी दौरा मी केलाच नाही. महापालिका आयुक्त प्रशासक म्हणून त्यांच्याच धुंदीत आहेत. त्यांना डोंबिवली शहराची पूर्ण माहितीही नसेल. स्मार्ट सिटी अंतर्गत केवळ कल्याण पश्चिमेतील स्टेशन परीसराचा विकास केला जात आहे. कल्याण पूर्व आणि डोंबिवलीचा त्यात समावेश नसल्याचा मुद्दाही आमदार पाटील यांनी उपस्थित केला.

टॅग्स :MNSमनसेRaju Patilराजू पाटील