शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

पाण्याच्या बैठकीस मला बोलावले नाही, मनसे आमदार राजू पाटील यांची नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 16:24 IST

मी मागणी करुन मला वेळ दिली नाही. बैठकही बोलाविली नाही, राजू पाटील यांनी व्यक्त केली नाराजी.

कल्याण-डोंबिवलीनजीक संदप भोपर येथील खदाणीत पाणी टंचाईमुळे पाच जणांचा बुडून मृत्यू झाला. पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी नगरविकास व पालकमंत्र्यांकडे वारंवार मागणी बैठकीची मागणी केली. मात्र आज बोलाविण्यात आलेल्या पाण्याच्या बैठकीस मला बोलविले नाही, यावर मनसे आमदार राजू पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

“मी मागणी करुन मला वेळ दिली नाही. बैठकही बोलाविली नाही. खासदारांनी मागणी करताच बैठक आयोजित केली. बैठक आज आयोजित केल्याची माहिती मला काल कळली. त्यासाठी नगरविकास खात्याच्या सचिव प्रतिभा पाटील यांच्याकडे मी विचारणा केली असता त्यांनी मला बोलविले नसल्याचे सांगितले. मी या भागाचा लोकप्रतिनिधी आहे. मलाच डावलण्यात आले आहे. मला साधे सूचित देखील केले गेले नाही. पालकमंत्र्यांकडून पाणी प्रश्न सुटला तर मला आनंदच आहे. प्रश्न सोडवितील अशी मला आपेक्षा आहे,” असे राजू पाटील यांनी सांगितले.

२७ गावातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठीची उपाययोजना तात्पुरती आहे. बड्या गृहसंकुलांना पाणी दिले जाते. त्यांना पाणी देण्यास माझा विरोध नाही. पण आमच्या टंचाईग्रस्त गावांना पाणी कोण देणार असा प्रश्न महापालिका प्रशासनाकडे आहे. दिव्यात ठाणे महापालिकेकडून २०० कोटी रुपयांची पाणी योजना राबविली जात आहे. दिव्यात पाणी कोटा आहे. पण योजना राबविणाऱ्या ठेकेदाराचे ७० कोटींचे ड्यू आहेत. २०० कोटी खर्च करण्यापेक्षा केंद्र सरकारची अमृत योजना राबविली पाहिजे होती याकडे आमदार पाटील यांनी लक्ष वेधले.

कल्याण डोंबिवलीत नालेसफाईचा बोजवारा उडाला आहे. पहिल्या पावसात अनेक भागात पाणी साचले. महापालिकेचे अधिकारी गेंड्याच्या कातडीचे आहेत. त्यामुळे यावेळी नालेसफाईचा पाहणी दौरा मी केलाच नाही. महापालिका आयुक्त प्रशासक म्हणून त्यांच्याच धुंदीत आहेत. त्यांना डोंबिवली शहराची पूर्ण माहितीही नसेल. स्मार्ट सिटी अंतर्गत केवळ कल्याण पश्चिमेतील स्टेशन परीसराचा विकास केला जात आहे. कल्याण पूर्व आणि डोंबिवलीचा त्यात समावेश नसल्याचा मुद्दाही आमदार पाटील यांनी उपस्थित केला.

टॅग्स :MNSमनसेRaju Patilराजू पाटील